मुंबईतील ताज हॉटेल
26 11 attack 2008 Mumbai attacks
वास्तवाचं भान बाळगत आजच्या दिवासाबद्दल खूप काही बोलावसं वाटतंय,खरंतर किती योगायोग म्हणावा हा कि आजच्याच दिवशी आंबेडकरांनी देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या वाटेला येणाऱ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता यावा याकरिता संविधान लिहलं आणि याच दिवशी 2008 साली मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला.
आज या घटनेला तब्बल 9 वर्ष पूर्ण झालीत,26 नोंव्हेबर 2018 ला झालेला हा हल्ला मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशदवाद्यांनी केलेला भीषण हल्ला होता,मला आजही आठवत त्यादिवशी जो आक्रोश भारतभरातून निघत होता त्या आक्रोशाने खरंच मन हेलखावे खात होत,कुठंतरी लहान असून देखील मनाला जाणीव होत होती 26 11 attack 2008 Mumbai attacks ती देशासाठी रात्रंदिवस उभ्या राहणाऱ्या जवानांच्या कष्टांची आजही तोच दिवस तीच रात्र असल्याचा भास होतोय ,याच दिवशी भारतमातेने आपली सोन्यासारखी देशसेवेत रुजू असणारी लेकरं गमवली. या हल्ल्यात सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत सतरा पोलीस वीरमरण पावले, तुकाराम ओंबळे हे मुंबईचे सहायक पोलिस उपनिरीक्षक होते,यांनीच कसाबवर झडप घालून त्याला पकडून ठेवलें होत आणि त्याच हल्ल्यात काळाने त्यांना आपना सर्वांपासून हिरावून नेल,यांच्यासह विजय साळसकर ,शशांक शिंदे,मेजर संदीप उन्नीकृष्णान, हेमंत करकरे, अशोक कामटे,हवालदार चंदर, गजेंदर सिंह बिष्ट यांसह अनेक देशसेववत रुजू असणाऱ्या पोलिसांसाहित अनेक कर्मचाऱ्यांनी या हल्ल्यात आपले प्राण गमावलेत. या हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने प्रत्येक मृताच्या नातेवाइकास 5 लाख रुपये आणि जखमींना 50000 रुपये देण्याचे आश्वासन दिले, परंतु तरीदेखील माध्यमांद्वारी आपल्याला ऐकायला मिळाल ते याच कर्मचाऱ्यांच्या बायका आपल्या हक्कासाठी मिळणाऱ्या हक्काच्या पैशासाठी सरकारचे उंबरठे झीजवत होत्या,खरतर आपला देश हा लोकशाही प्रदान देश मानला जातो परंतु तो खरंच लोकशाहीप्रदान राहिलाय का? यावरच आता प्रश्नचिन्ह उभा राहिलाय.जसे दिवस सरले तशी माणसाच्या प्रवृत्तीत बदल होत गेलाय, एकीकडे हल्ल्यात जखमी झालेले पोलीस अधिकारी आणि एकीकडे आताचे पोलीस कर्मचारी ज्यांच्याबद्दल 1 ते 2 आठवढ्यापुर्वीच आपण बातमी या ऐकली कि किती क्रूर पद्धतीने पोलिसांनी एका चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला थर्ड् डिग्री वापरून पार जीव जाईपर्यंत मारलं आणि त्याचा मफुटदेह एकदा सोडून दोनदा जाळला ,पेट्रोल ओतून त्याचा देह जाळला आणि कुणालाही संशय येऊ नाही म्हणून मृतदेह दूर नेऊन फेकला ,किती फरक असतो ना माणसात सुद्धा .व्यक्ती तितक्या प्रकृती ही खरी आहे म्हण. ही बातमी प्रत्येक माध्यमांनी त्या दिवशी उचलून धरली होती किंबहुना त्यांना धरावीच लागली होती कारण या अशा घटनेने कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा सामान्य जनतेचा आवाज हा एखाद्याला जाळायला सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत, खरतर आपली ड्युटी संपली असताना ताज हॉटेलच्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांचे आपल्या सर्वांवरच खूप ऋण आहेत या ऋणातून मुक्त होने तर शक्य नाही आणि ना कधी आपल्याला त्यांच्यासारखं होता येईल ,आजही प्रत्येक क्षणाला भारताचे जवान सीमेवर मरणाला हसतमुखाने सामोरे जातात खरोखरच धन्य असतात ते आईवडील सुद्धा ज्यांच्या पोटी असे सुपुत्र जन्म घेतात…आज खरतर आंबेडकर आणि आपल्या जवानांना मनापासून अभिवादन करून आयुष्यात आपण देखील काहीतरी सत्कार्य करून आपल्या देशाच्या विकासास हातभार लावण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.हे सगळं अवतीभोवतींच वातावरण पाहून खूप दारुण दुःख होत कि आपल्या हातून काहीच इतरांसाठी घडत नाही …..परंतु यापुढं प्रयत्न मात्र नक्की करावा प्रत्येक नागरिकांनी,खूप काही बोलण्यासारखं आहे आज इथं पण शब्दच अपुरे पडत असून डोळ्यात पाणी उभा राहतय….
शेवटी एकच या वीरपुत्रांसाठी म्हनेलं
काय वदावे कौतुकाचे बोल ,इथे शब्दही होताहेत अबोल.26 11 attack 2008 Mumbai attacks
-प्रियंका पुंड.
Leave a Reply