महाराष्ट्र विधानसभा २०१९
चालू वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरगोस यशानंतर महाराष्ट्र विधानसभेतील निवडणुकीत भाजपच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. राजकीय वातावरण निर्मिती करण्यात सत्ताधारी भाजप यशस्वी झाला होता. वरवर पाहता युतीला भरगोस यश मिळणार असं चित्र दिसत होत. कारण विरोधी पक्षात असलेल्या दिग्गज नेत्यांची भरती भाजपा आणि शिवसेनेने करण्याचा सपाटा सुरु होता. पाच वर्ष शिवसेना भाजप कुत्र्या-मांजरासारख भांडत होते. त्यांचा अंतर्गत सत्ता संघर्ष महाराष्ट्राने उघडपणे पहिला. या सत्तेच्या स्पर्धेत शिवसेनेला हतबल करण्यासाठी भाजपाने फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील प्रबळ नेत्यांना पक्षात खेचण्याचा डाव टाकला. याने शिवसेने बरोबरच विरोधी पक्ष देखील हतबल होऊ लागला. याला उत्तर म्हणून शिवसेनेने देखील पक्षभरती चालू केली. आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील जमेल त्या प्रकारे फोडा-फोडी सुरु केली. भाजपात निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केलेले बहुतांश उमेदवार पडले. हा जनतेने दिलेला कौल होता.
या पक्ष प्रवेशाच्या राजकारणाने गोंधळलेली स्थिती निर्माण झाली. सर्व विकासाचे मुद्दे बाजूला सरले गेले. भाजपाने ३७० चा मारा केला. पण हे सगळं सुद्न्य मतदारांपुढे चुकीचं औषधं ठरलं. जनतेने भाजप शिवसेना युतीला पूर्णपणे नाकारले नाही आणि आघाडीला देखील पूर्णपणे स्वीकारले नाही. २०१४ मध्ये भाजपाने १२२ जागा जिंकल्या यंदा १०५ जागा. शिवसेनेच्याही २०१४ च्या तुलनेत काही जागा घाटल्या. विरोधी भूमिकेत असलेल्या कॉंगेस आणि राष्ट्रवादीच्या थोड्या जागा वाढल्या.
युतीने विरोधी पक्षाला हतबल करण्यसाठी पक्षप्रवेशाचा टाकलेला डाव हा ८० वर्षाचे तरुण मा. पवार साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून उधळून लावला.
यंदाची निवडणूक ही फोडा-फोडी, निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश, विकासाच्या मुद्यापासून भरकटलेली प्रचार यंत्रणा या सगळ्यांना मतदारांनी भर पावसात दिलेली चपराक होती…
-अभिजित हजारे.
Leave a Reply