आधुनिक भारताचे जनक राजीव गांधी बद्दल पूर्ण माहिती चरित्र निबंध भाषण मराठी Rajiv Gandhi Information Biography in Marathi Language
जेव्हा विद्यमान पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींनी ‘BHIM’ ऍपचं उद्घाटन केलं तेव्हा आपल्या लाडक्या आणि जिवाभावाच्या व्हॉट्सऍपवर बर्याचजणांकडून मला विनोद आले; त्यातला एक असा होता की “जर BHIM ऍप काँग्रेसच्या काळात निघालं असतं तर त्याचं नाव ‘राजीव गांधी जनधन योजना’ असतं.” मला मुळात हा विनोद वाटलाच नाही, याचं कारण हे BHIM ऍपच नव्हे, आज अगदी कचरा गोळा करणाऱ्यांच्या हातातही असलेले मोबाईल, जवळजवळ प्रत्येकाच्याच घरी असणारे कॉम्प्युटर/लॅपटॉप हे आज इतक्या सहजासहजी भारतात उपलब्ध आहेत याचा पाया घालणारे माजी पंतप्रधान म्हणजे मा. श्री. राजीव गांधी! अगदी ९०च्या दशकातच ज्यांनी भारताला ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न दाखवले, असे राजीव गांधी! खरंतर अशी बरीच स्वप्नं राजीवजींनी भारताला दाखवली होती, म्हणूनच त्यांना आपल्या भारतातील एक थोर ‘अग्रणी’ असं म्हणण्यात कोणालाही आक्षेप असू नये. तर आज अशा भारताच्या स्वप्नाळू, दूरदर्शी पंतप्रधानांबद्दल जाणून घेऊया.
आधुनिक भारताचे जनक राजीव गांधी बद्दल पूर्ण माहिती चरित्र निबंध भाषण मराठी
- जन्म, बालपण आणि महाविद्यालयीन शिक्षण
भारताचा स्वातंत्र्यलढा शेवटच्या टप्प्यात होता, दोन वर्षांपूर्वी मुंबईत(तेव्हाची ‘बॉंबे’) झालेल्या ‘ऑगस्ट क्रांती’नंतर ‘करेंगे या मरेंगे’ या आवेशात सगळे भारतीय पेटून उठले होते, अशा परिस्थितीत 20 ऑगस्ट 1944 साली भारताचे अग्रणी असलेल्या मा. श्री. जवाहरलाल नेहरू यांची सुकन्या इंदिरा आणि त्यांचे पती फिरोज गांधी यांच्यापोटी ‘राजीव’चा जन्म झाला. त्याच्या शालेय शिक्षणाला सुरुवात होण्यापूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्याचे आजोबा, पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. म्हणूनच त्याचं प्राथमिक शिक्षण दिल्लीतल्या ‘शिव निकेतन स्कुल’मध्ये पार पडलं. त्याचे शिक्षक सांगतात की “लहानपणी ‘तो’ एक लाजरा-बुजरा आणि अंतर्मुख मुलगा होता आणि चित्रकला हा त्याचा आवडता विषय होता.”
काही काळाने त्याच्या शिक्षणासाठी त्याला डेहराडूनमधल्या वेलहॅम स्कुलमध्ये आणि त्यानंतर डून स्कुलमध्ये दाखल केले गेले. १९६१साली आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून A-LEVEL पूर्ण करण्यासाठी तो लंडनला रवाना झाला. पुढे १९६२-६५या काळात केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतल्या ट्रिनिटी कॉलेजमधून त्याने इंजिनियरिंगचा अभ्यास केला, पण पदवी मिळवली नाही. १९६६ साली तो मेकॅनिकल इंजिनियरिंग करण्यासाठी लंडनमधल्या इंपिरियल कॉलेजमध्ये दाखल झाला पण इथेही अभ्यासक्रम पूर्ण केला नाही. पुढे राजीव गांधी सांगतात त्याप्रमाणे ते कधीही ‘परीक्षार्थी’ नव्हते.
- संजय गांधींचे निधन आणि राजीवजींचा राजकारणात प्रवेश
१९६६ साली मा. श्री. इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आणि राजीव गांधी भारतात परतले. दिल्लीतल्या फ्लाईंग क्लबमधून ते पायलट झाले. १९७० साली एयर इंडियामध्ये पायलट म्हणून काम करू लागले. संजयप्रमाणे सुरुवातीच्या काळात त्यांना राजकारणात विशेष रस नव्हता. तीन वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर १९६८ साली राजीवजींनी एड्विज अँटोनिया अल्बिना माईनो नावाच्या इटालियन तरुणीशी विवाह केला, जी ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकत असताना वर्सिटी रेस्टोरंटमध्ये पार्टटाईम वेटरिंग सर्व्हिस करत असे (तिथेच त्यांची पहिली भेट झाली.) आणि त्या तरुणीला आज आपण सगळे ‘सोनिया गांधी’ या नावाने ओळखतो. या दांपत्याला १९७० साली मुलगा (राहुल) आणि १९७२ साली मुलगी (प्रियांका) अशी दोन अपत्ये झाली.
२३ जून १९८० साली राजीवजींचे बंधू, संजय गांधी यांचे एका विमान अपघातात निधन झाले आणि हीच घटना राजीवजींनी राजकारणात येण्यास मुख्य कारण ठरली.
‘राजीव गांधी’ यांचे चरित्र लिहीणार्या मीना अगरवाल सांगतात त्याप्रमाणे संजयच्या मृत्यूनंतरच्या आठवड्यात बद्रीनाथ पिठाचे तत्कालीन शंकराचार्य, स्वामी श्री स्वरुपानंद यांनी गांधी परिवाराचे सांत्वन करण्यासाठी त्यांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी राजीवला “विमाने उडवत राहू नकोस, तर देशाच्या सेवेसाठी समर्पण कर” असा सल्ला दिला.
काँग्रेस पक्षाच्या 70 सदस्यांनी एक प्रस्ताव इंदिराजींपुढे सादर केला आणि राजीवने राजकारणात प्रवेश करावा असे आवाहन केले. इंदिराजी त्यांना म्हणाल्या की राजीवच निर्णय घेईल राजकारणात प्रवेश करावा की नाही. जेव्हा त्याला त्यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने उत्तर दिले, “जर माझ्या आईला मदत होणार असेल तर मी राजकारणात नक्कीच प्रवेश करेन”
16 फेब्रुवारी 1981 रोजी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय शेतकरी मेळाव्याला राजीवजींनी संबोधित केले आणि मा.श्री. राजीव गांधी राजकारणात उतरले.
४ मे १९८१ साली इंदिराजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑल इंडिया काँग्रेसच्या सभेत सर्वसंमत झालेल्या ठरावाप्रमाणे; त्या निवडणुकीत राजीव गांधी अमेठी मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले. त्या निवडणुकीत त्यांनी लोक दलाचे उमेदवार श्री. शरद यादव यांचा २,३७,000 मतांनी पराभव केला आणि १७ ऑगस्ट रोजी त्यांनी संसद-सदस्य म्हणून शपथ घेतली.
१९८१च्या डिसेम्बरमध्ये त्यांनी इंडियन युथ काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले.
- एशियन गेम्स १९८२
१९८२ सालच्या एशियन गेम्सच्या निमित्ताने, आयोजन समितीवर असणाऱ्या ३३ संसदीय सदस्यांपैकी एक असलेल्या राजीव गांधींनी, रात्रंदिवस मेहनत करून आपले नियोजनकौशल्य सिद्ध केले. एशियन गेम्स कमिटीने त्यांच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे, त्यावर्षी एशियन गेम्सच्या ‘उत्कृष्ट यशा’मध्ये राजीव गांधींच्या ‘नेतृत्व, उत्साह आणि पुढाकार’ या गुणांचा सिंहाचा वाटा होता.
आधुनिक भारताचे जनक राजीव गांधी बद्दल पूर्ण माहिती चरित्र निबंध भाषण मराठी
- इंदिराजींचे निधन
३१ ऑक्टोबर १९८४ साली, इंदिराजींच्या शीख अंगरक्षकांनी, ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या निषेधार्थ, इंदिराजींवर गोळ्या झाडून हत्या केली आणि काही ठिकाणी सांप्रदायिक दंगली उसळल्या. बऱ्याच काँग्रेसी नेत्यांवर दंगली घडवण्याचे आरोप ठेवण्यात आले होते. हत्येच्या 19 दिवसांनंतर बोट क्लबच्या सभेत राजीवजी म्हणाले, “इंदिराजींच्या खूनानंतर देशात काही दंगली घडल्या आहेत. आम्हाला माहित आहे की लोक खूप रागावले होते आणि काही दिवस असे दिसत होते की भारतात थरकाप उडाला होता पण जेव्हा एक बलशाली वृक्ष उन्मळून पडत, तेव्हा त्याच्या सभोवतालची पृथ्वी थोडी थरथरणे हे नैसर्गिकच आहे.” या विधानाबद्दल त्यांच्यावर व्यापक टीका केली गेली. बर्याच कॉंग्रेस राजकारणींवर हिंसाचाराचे आक्षेप घेण्याचा आरोप होता. वेरिंदर सिंग यांच्या म्हणण्याप्रमाणे राजीवजींचं हे वक्तव्य म्हणजे सांप्रदायिक दंगलींचे ‘तात्त्विक समर्थन’ होते. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यरही राजीवजींच्या या पवित्र्यावर नाखूष होते. जमावाला हाताळण्यासाठी मेरठमधून सैन्य तैनात करण्याबाबत राजीवजींनी दाखवलेल्या अनिच्छेबद्दल मणिशंकरजींनी लिहिले होते कि “हे दंगेखोरांना दिलेले उत्तेजन आहे का?”
Rajiv Gandhi Information Biography in Marathi Language
- इंदिराजींचे वारसदार आणि भारताचे पंतप्रधान
सरदार बुटा सिंह आणि तत्कालीन पंतप्रधान झेल सिंह यांनी इंदिराजींच्या निधनानंतर काही तासांतच राजीवजींना ‘इंदिराजींचे वारसदार’ म्हणून घोषित केले. इंदिराजींच्या पश्चात त्यांच्या पदाचा भार स्विकारल्यानंतर राजीवजींनी सगळ्यात आधी संसद बरखास्त करून निवडणूका घोषित करण्याचा सल्ला दिला, कारण संसदेने ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. इंदिराजींच्या पश्चात राजीव गांधी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत अध्यक्ष झाले. ज्या पक्षाने तत्कालीन निवडणुकीत सर्वात मोठ्या संख्येतील बहुमताने प्रचंड विजय मिळविला आणि भारतीय संसदेच्या इतिहासात एका नव्या पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या विजयामुळे सरकारचे पूर्ण नियंत्रण राजीव गांधीजींच्या हाती आले. यात त्यांच्या तारुण्याचा आणि त्यांच्या ‘भ्रष्टाचारापासून मुक्त’ असल्याच्या प्रतिमेचा सिंहाचा वाटा होता असे म्हटले जाते.
31 डिसेंबर1984 रोजी, राजीव गांधींनी वयाच्या 40 व्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. इतिहासकार मीना अग्रवाल लिहितात की “पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरही, ‘ते’ तुलनेने अज्ञात व्यक्तिमत्त्व होते, राजकारणात नवखे होते, कारण त्यांनी यापूर्वी केवळ तीन वर्षे खासदार म्हणून पदभार सांभाळला होता.”
- अस्थायी मंत्रीमंडळ
पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, त्यांनी सर्वप्रथम चौदा सदस्यांचे मंत्रिमंडळ स्थापन केले. त्यांनी या मंत्रीमंडळाला तंबी दिली होती कि ते स्वतः या मंत्रिमंडळावर देखरेख करतील आणि जे मंत्री “टू द मार्क” असणार नाहीत त्यांना मंडळातून वगळले जाईल. या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राजीवजींनी मंत्रीमंडळात वारंवार बदल केले, ज्यामुळे ते टीकेचे धनी झाले. इंडिया टुडे नावाच्या वृत्तपत्राने त्यांच्या कार्यकाळावर ‘गोंधळाचे चक्र’ असा ठपका ठेवला. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू म्हणाले, “कॅबिनेटमध्ये सतत होणारे बदल हे केंद्रातील काँग्रेस (आय) सरकारची अस्थिरता प्रतिबिंबित करते.”
- पक्षांतर-बंदी कायदा
१९८० च्या केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक सदस्यांनी पदावर असतानाच पक्षांतर करून विरोधी पक्षात प्रवेश केले होते. त्यामुळे भ्रष्टाचार वाढला होता आणि मंत्रीच लाच खात होते, वैयक्तिक पातळीवर बहुमत जमवण्यासाठी आटापिटा सुरू होता. पंतप्रधान म्हणून काम करण्याची सुरुवात राजीव गांधींनी पक्षांतर-बंदी कायदा मंजूर केला. ज्या कायद्यानुसार नियुक्त संसद सदस्य किंवा कुठल्याही विधानसभेचे नियुक्त सदस्य त्यांच्या कार्यकाळात पक्षांतर करू शकत नाहीत.
- शाह बानो खटला
१९८५ साली, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने, शाह बानो खटल्याचा निकाल, शाह बानो नावाच्या मुस्लिम महिलेच्या बाजूनं सुनावला आणि भारतातील मुस्लिम धर्मियांमध्ये ‘मुस्लिम पर्सनल लॉ’वर निर्बंध लादल्याची भावना निर्माण झाली. आंदोलकांच्या अनेक मागण्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी मान्य केल्या आणि ‘मुस्लिम महिला (घटस्फोटाबाबत हक्कांचे संरक्षण) कायदा १९८६’ अस्तित्वात आला. या कायद्यामुळे शाह बानो प्रकरणात कोर्टाने दिलेला निकाल खारीज झाला खरा, पण हा कायदा संविधानातील कोड कलम १२५ च्या विरोधात होता. यामुळे पुन्हा एकदा राजीवजींना टीकेला सामोरे जावे लागले. ‘बिझनेस & इकॉनॉमिक्स’ नावाच्या नियतकालिकाने याला ‘अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन’ म्हटले. ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय कायदेमंत्री श्री राम जेठमलानी यांनी या कायद्याला “अल्पावधी अल्पसंख्यांक लोकसंख्येसाठी पुनरुत्थानवादी अंधश्रद्धेचा कायदा” असे म्हटले आहे. काँग्रेसचे तत्कालीन संसद सदस्य आरिफ मोहम्मद खान यांनी या कायद्याच्या निषेधात आपल्या संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
- आर्थिक उदारीकरणाला सुरुवात
१९८४ च्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात आर्थिक सुधारणांचा उल्लेख करण्यात आला नव्हता, परंतु पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अर्थव्यवस्थेत उदारीकरण आणण्याचा प्रयत्न केला. खाजगी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी incentive जाहीर केले. औद्योगिक, विशेषतः टिकाऊ मालाचे, उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी कॉर्पोरेट कंपन्यांना सबसिडी दिल्या. या प्रयत्नांमुळे औद्योगिक वाढ होईल आणि गुंतवणूकीचा दर्जा सुधारेल अशी आशा होती पण प्रोफेसर अतुल कोहली सांगतात त्याप्रमाणे या धोरणाला खुद्द काँग्रेसच्याच धुरीणांनी विरोध केला कारण ह्या धोरणामुळे “बाह्य आर्थिक प्रभावांना अर्थव्यवस्था खुली होईल.” असा अंदाज वर्तवला जात होता. ग्रामीण भागातील आणि आदिवासी लोकांना ‘समृद्ध आणि शहरी सुधारणा’ म्हणून या योजनेकडे पाहिले आणि त्याचा निषेध केला.
- लायसन्स राज
१९९० नंतर, व्यक्ती आणि व्यवसायांना भांडवल आणि ग्राहक उत्पादने खरेदी करण्याची परवानगी दिली आणि औद्योगिक निर्बंध कमी केले यांमुळे ‘लायसन्स राज’मध्ये लाक्षणिक घट झाली.
- विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीचे बीज
राजीव गांधीनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि संबंधित उद्योगांसाठी सरकारचा पाठिंबा वाढविला आणि तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांवर, विशेषतः संगणक, एअरलाइन्स, संरक्षण आणि टेलिकम्युनिकेशन्सवर असणारे आयात कोटा, कर व जकातदर कमी केले.
सार्वजनिक माहिती आधारभूत संरचना आणि इनोव्हेशन या विषयावर सल्लागार म्हणून माजी रॉकवेल इंटरनॅशनल कार्यकारी सॅम पित्रोडा यांची नेमणूक केली. गांधीजींच्या कार्यालयादरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपन्या एमटीएनएल आणि व्हीएसएनएल विकसित करण्यात आल्या. पित्रोडांच्या मते, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या त्यांच्याद्वारे दूरसंचार सेवांचा प्रसार करण्याच्या योजनेला नाकारणे ही राजीव गांधींची क्षमता भारताच्या विकासात एक महत्त्वाची बाब ठरली आहे. वृत्तवेबसाइट वनइंडियाच्या मते, “सुमारे 20 वर्षांपूर्वी दूरध्वनी श्रीमंतांच्या वापरासाठी एक गोष्ट मानली जात होती परंतु तो ग्रामीण जनतेकडे जाण्यासाठी राजीव गांधी यांना श्रेय दिलंच पाहिजे”. पित्रोडा म्हणाले की राजीव गांधीजींच्या राजकीय समर्थनामुळेच टेलिफोन नेटवर्कचा विस्तार भारतात करण्याची त्यांची योजना यशस्वी झाली.” पित्रोडांच्या मते 2007 पर्यंत ते “दरमहा सहा दशलक्ष फोन जोडत होते”. राजीव गांधी सरकारने फुल्ली असेंबल्ड मदरबोर्ड आयात करण्याची परवानगी दिली. यामुळे संगणकांची किंमत कमी झाली.
काही अभ्यासकांच्या मते, राजीव गांधींच्या काळातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्रांतीचे बी देखील रोवले गेले.
- उच्च शिक्षणाला प्रोत्साहन आणि जवाहर नवोदय विद्यालय
भारतातील उच्च शिक्षण कार्यक्रमांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यासाठी राजीव गांधींनी 1986 साली शिक्षणविषयक राष्ट्रीय धोरण जाहीर केले.1986 मध्ये त्यांनी ‘जवाहर नवोदय विद्यालय’ प्रणालीची स्थापना केली. जी एक केंद्र सरकार आधारित शिक्षण संस्था आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहावी ते बारावीपर्यंत मोफत निवासी शिक्षण पुरवते.
- राजीव गांधींचे परराष्ट्र धोरण
भारताच्या परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक आणि पक्षाचे विचारवंत काँग्रेस रेजौल करीम लासकर यांच्या मते नव्या जगाच्या हाका अगदी अचूक ओळखण्याच्या राजीव गांधींच्या दूरदृष्टी मुळेच आज भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या आघाडीवर आहे.
लासकर यांच्या मते, “राजीव गांधी यांच्या परराष्ट्र धोरणाचा संपूर्ण आराखडा हा भारताला सशक्त, स्वतंत्र, आत्मनिर्भर आणि जगातील सर्व राष्ट्राच्या अग्रगण्य स्थितीत बनवण्याच्या दिशेने सज्ज होता. त्यांची कूटनीती सोयीस्कररित्या बदलणारी आणि योग्य वेळी जुळवून घेण्याची होती पण गरज असेल तेव्हा ती खंबीर आणि ठाम होत असे.”
- नव्या शस्त्रात्रांची शक्यता आणि गरज
कुठलेही भेदाभेद नसलेल्या मानवी समाजाची स्थापना करण्याचे उद्दिष्ट त्यांनी 29 नोव्हेंबर 1985 च्या जपानी राष्ट्रीय आहार उत्सवाच्या दरम्यान केलेल्या ऐतिहासिक भाषणात बोलून दाखवले होते. जागतिक पातळीवर होत असलेल्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानातील संशोधनामुळे पुढे आण्विक शस्त्रांसोबतच मोठ्या प्रमाणावरील हत्यांसाठी, दहशतवादासाठी जैविक शस्त्रांचाही वापर होऊ शकतो हा धोका त्यांनी ओळखला होता.
- एलटीटीईचा उठाव आणि राजीवजींवर हल्ला
स्वतंत्र तमिळभाषिक राष्ट्राच्या मागणीसाठी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ एलम अर्थात एलटीटीईने श्रीलंकेत गृहयुद्ध उभारले. यात जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत तमिळ राष्ट्रात सामील करण्यात यावा अशीही मागणी होती. १९८६ च्या सार्क परिषदेत राजीवजींनी श्रीलंकेचे पंतप्रधान रणसिंगे प्रेमदासा यांच्याशी या विषयावर संवाद साधला. श्रीलंकन सैन्याने बहुतांश तमिळांना जाफना प्रांतात बंदी केले. राजीव गांधींनी त्यावेळी त्या प्रांतात पॅराशूटच्या साहाय्याने उतरण्याचे आदेश भारतीय सैन्याला दिले. पुढे यावरचा तोडगा म्हणून जुलै १९८७ मध्ये भारत-श्रीलंका करार केला गेला. हा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवायचा हा एकच मार्ग आहे अशी भारत सरकारची भूमिका होती पण या करारावर ही प्रचंड टीका झाली.
तरीही एलटीटीईने हिंसेचा मार्ग त्यागण्यास नकार दिला आणि भारताविरुद्ध अफवा पसरवायला, तमिळ नागरिकांना धमकावायला सुरुवात केली. नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि शस्त्रे बाळगणार्यांना अटक करण्यासाठी राजीव गांधींनी इंडियन पीस किपींग फोर्स त्या प्रांतात पाठवली. एलटीटीईने आयपीकेएफवर हल्ला केला होता, ज्यामुळे नंतर राजीवजींना अपमान सहन करावा लागला. अखेरीस १९८९ साली आयपीएफकेला परत पाठी घेण्यात आले.
इंडो-श्रीलंका करारावर स्वाक्षरी केल्याच्या एक दिवसानंतर, ३० जुलै१९८७ रोजी विजिता रोहन नावाच्या एका रक्षकाने राजीवजींच्या खांद्यांवर गोळी झाडली. सुरक्षा रक्षकांनी रक्षकांना ताब्यात घेतले. गार्डनने “श्रीलंकेला झालेल्या नुकसानीमुळे” राजीव गांधीजींना मारून टाकण्याचा त्यांचा हेतू होता.
त्यांच्या प्रसंगावधानतेमुळे ते बचावले, त्यांना खांद्याला दुखापत झाली. विजिता रोहन याला साडेतीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली.
Rajiv Gandhi Essay Speech in Marathi Language
- पंजाब प्रश्न
पंतप्रधान पदाचा भार स्वीकारल्यावर लगेचच राजीव गांधींनी 1984 च्या ऑपरेशन ब्लू स्टारच्या दरम्यान अटक केलेल्या अकाल दलाच्या नेत्यांना सोडले. त्यांनी अखिल भारतीय सिख स्टुडंट्स फेडरेशनवरील बंदी उठविली आणि 1984 च्या सिख विरोधी दंगलींची चौकशी केली. त्यांनी पंजाबच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ज्येष्ठ अकाली दल नेत्यांसोबत कॉन्फरन्सरुममध्ये मिटिंग केली.
अकाली दल विरोधी पक्षात असूनही, 1985 च्या जानेवारीत राजीव गांधींनी अकाली नेते एचएस लोंगोवाल यांच्यासोबतराजीव-लोंगोवाल करारावर स्वाक्षरी केली.
मे 1988 मध्ये राजीव गांधींनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिर शस्त्रे आणि बंदूकधारकांपासून मुक्त करण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक थंडर सुरू केले. नॅशनल सिक्योरिटी गार्ड आणि स्पेशल एक्शन ग्रुप नावाचे दोन गट तयार करण्यात आले; त्यांनी मंदिराला १० दिवस वेढा घातला होता. त्या दरम्यान अतिरेक्यांची शस्त्रे जप्त केली गेली. काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले, “ऑपरेशन ब्लॅक थंडर राजीव गांधी सरकारची पंजाबमध्ये शांती आणण्यासाठी दृढ कारवाई करण्याची प्रबळ इच्छा दर्शवते.”
- उत्तरपूर्व भारतातील प्रश्न
राजीव गांधींच्या पंतप्रधान म्हणून कारकिर्दीच्या काळात भारताच्या उत्तरपूर्व भारतात उठाव वाढले होते. मिझो नॅशनल फ्रंटने मिझोराम प्रांताला स्वातंत्र्य देण्याची मागणी केली होती. या प्रश्नावर राजीव गांधींनी १९८७साली तोडगा काढला.
मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या पूर्वी केंद्रशासित प्रदेश असलेल्या, प्रांतांना स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा देण्यात आला.
आसाम प्रांतात बंगाली मुस्लिम आणि बंगालीभाषिकांची संख्या वाढल्याने आसामी स्वतःच्याच घरी अल्पसंख्यांक झाले होते, त्याविरुद्ध असामी लोकांनी उठाव चालवला होता. राजीव गांधींनी १५ ऑगस्ट १९८५ रोजी आसाम करारावर स्वाक्षरी केली, ज्याद्वारे १९५१-६१ दरम्यान स्थलांतरित झालेल्यांना आसाम प्रांताचे नागरिकत्व दिले गेले परंतु त्यानंतरच्या स्थलांतरितांना परवानगी नाकारली गेली.
- बोफोर्स, एचडीडब्ल्यू आणि इतर भ्रष्टाचार
राजीव गांधी सरकरमधील अर्थमंत्री व्ही. पी. सिंग यांनी, कॉंग्रेस नेत्यांच्या निषेधार्थ, सरकार आणि राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. संरक्षणखात्यावर मंत्री म्हणून गेल्यांनतर त्यांनी कोट्यवधी डॉलर्सचा बोफोर्स घोटाळा उघडकीस आणला. ज्यात भारतीय कराराच्या बदल्यात स्वीडिश कंपनी कंपनी बोफोर्स इटालियन व्यावसायिक आणि गांधी परिवार सहयोगी ओटावियो क्वात्रोची यांच्याद्वारा संबंधित कथित देयक रकमेचा समावेश होता. हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर व्ही. पी. सिंग यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांनी सोबतच काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचाही राजीनामा दिला.
जुलै 2005 मध्ये एका मुलाखतीत व्हि. पी. सिंग यांनी सांगितले की राजीव गांधींसह त्याचे मतभेद हे बोफोर्स सौद्यामुळे नाही तर एचडीडब्लू डीलमुळे झाले. 1981 मध्ये जर्मन कंपनी एचडब्ल्यूडब्ल्यू बरोबर सौजन्यकरार केला गेला, तेव्हा भारत सरकारने एचजीडब्लूने तयार केलेल्या दोन तयार पाणबुड्या आणि माझगाव डॉकमध्ये असेंबल करण्यासाठी सीकेडी फॉर्ममध्ये दोन पाणबुडी खरेदी करण्याचा हा करार होता. व्ही. पी. सिंग यांना जर्मनीतील भारतीय राजदूतकडून एक तार मिळाली होती, ज्यात एचडीडब्लू पाणबुडीच्या डीलमध्ये भारतीय एजंटना कमिशन मिळाले असे उल्लेख होते. त्यांनी याबद्दल राजीव गांधी यांना सांगितले आणि चौकशी सुरू केली. यामुळे मतभेद झाले आणि व्हीपीएससिंग यांनी कॅबिनेटमधून राजीनामा दिला.
नोव्हेंबर 2013 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘राजीव गांधी, ज्योती बसू आणि इंद्रजीत गुप्ता यांचे अज्ञात पैलू ‘, या पुस्तकात सीबीआयचे माजी संचालक डॉ. एपी मुखर्जी यांनी म्हटले आहे कि, “राजीव गांधींना संरक्षण पुरवठादारांकडून कमिशन हवे होते, जे काँग्रेस पक्षाच्या निधीत जमा केले जाणार होते. राजीव गांधींनी 19 जून 1989 रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानात झालेल्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली.” मे 2015 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले की “हा घोटाळा ‘मीडिया चाचणी’ होता कारण “अद्याप भारतीय न्यायालयाने या प्रकरणाला घोटाळा म्हणून घोषित केले नाही.
Rajiv Gandhi Essay Speech in Marathi Language
- १९८९ च्या निवडणूका आणि पराभव
लोक दल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (समाजवादी) आणि जन मोर्चा हे व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आले १९८९ च्या निवडणुकीत सिंहांनी तिसऱ्या आघाडीला विजयी केले आणि पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. कॉंग्रेसच्या 197 च्या तुलनेत तिसऱ्या आघाडीने लोकसभेत 143 जागा जिंकल्या असल्या तरी, अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या बाहेरील समर्थनातून आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) आणि भारतीयकम्युनिस्ट पार्टी या डाव्या पक्षांच्या समर्थनाद्वारे लोकसभेतही बहुमत मिळाले.
प्रख्यात वकील आणि राजकारणी, माजी कायदा मंत्री राम जेठमलानी म्हणतात, “ राजीव गांधी पंतप्रधान म्हणून निस्तेज आणि साधारण होते.”
- काळा पैसा
नोव्हेंबर 1991 मध्ये मॅकिन्सेला स्त्रोत म्हणून ग्राह्य धरून श्वाइझर इलस्ट्रिएट मॅगझिनने प्रकाशित केलेल्या लेखानुसार स्वित्झ बँकेमध्ये राजीव गांधींनी 2.5 बिलियन स्विस फ्रँक इतका काळा पैसा जमवला होता. भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी स्वित्झर इलस्ट्रेटिकच्या लेखाचा हवाला देऊन हा मुद्दा संसदेत वारंवार मांडला आहे.
1992 मध्ये भारतीय वृत्तपत्रे, टाइम्स ऑफ इंडिया आणि द हिंदू यांनी राजीव गांधी यांना केजीबीकडून निधी मिळाल्याचा अहवाल छापला. रशियन सरकारने या बातमीची पुष्टी केली आणि सोव्हिएत वैचारिक हिताचे कारण देऊन देयके राखली. अल्बॅट्स नंतर म्हणाले की डिसेंबर 1985 मध्ये चेब्रिकॉव्ह यांना सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय कमिटीकडून अधिकृतपणे विचारले होते की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह राजीव गांधी कुटुंबातील सदस्यांना पैसे द्यावे. या रकमेचे प्रस्ताव अमेरिकेच्या मंत्रिपरिषदाने मंजूर केलेल्या रिझोल्यूशनने मंजूर केले आणि 1971 पासून त्यांना पैसे देण्यात आले. डिसेंबर 2001 मध्ये सुब्रमण्यम स्वामींनी याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती; न्यायालयाने सीबीआयने 2002 साली आरोपांची सत्यता जाणून घेण्यासाठी सीबीआयने आदेश दिला. दोन वर्षानंतर सीबीआयने कोर्टाला सांगितले की रशियन एफआयआरशिवाय अशी चौकशी करता येणार नाही.
- हत्या
21 मे 1991 रोजी चेन्नईहून 40 किमी (25 मैल) गांव श्रीपेरंबुदूर येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजीव गांधीची सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती. सकाळी 10:10 वाजता तिमोजी राजारत्नम नावाची एक महिला राजीव गांधींना सार्वजनिक ठिकाणी भेटली आणि तिने त्यांना अभिवादन केले. त्यानंतर ती त्यांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी खाली वाकली आणि तिच्या कपड्याच्या आत 700 ग्रॅम (1.5 एलबी) आरडीएक्स स्फोटकांनी भरलेला बेल्ट लावला होता तो तोडला. स्फोटाने राजीव गांधी, राजारत्नम आणि किमान 25 अन्य लोकांना ठार मारले. हरबाबू नावाच्या 21 वर्षीय स्थानिक छायाचित्रकाराने या हत्येचे शूटिंग त्याच्या कॅमेऱ्यात केले होते, स्फोटात त्याचे निधन झाले पण त्याचा कॅमेरा अबाधित राहिला. शवविच्छेदन आणि इतर प्रक्रियांसाठी राजीवजींचा मृतदेह नवी दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये आणला गेला.
24 मे1991 रोजी राजीव गांधींवर अंतिम संस्कार आयोजित करण्यात आले; ते थेट प्रसारित करण्यात आले होते आणि 60 पेक्षा जास्त देशांतील मान्यवरांनी त्यात भाग घेतला होता. त्यांच्या आई (इंदिरा गांधी), भाऊ (संजय गांधी), आणि आजोबा जवाहरलाल नेहरू यांच्याजवळ यमुना नदीच्या काठी वीर भुमी येथे त्यांची समाधी उभारण्यात आली आहे.
राजीव गांधी यांचाकडे दुरदृष्टी होती म्हणूनच त्यांनी विज्ञानाची कास धरून त्यांच्या कारकिर्दीत महत्वाचे निर्णय घेतले यात माहिती तंत्रज्ञानात आपला देश आज प्रगतशील आहे याची बीजे राजीवजी यांनीच रोवली होती.
राजीव जींच्या या देशप्रेम आणि दूरदृष्टीला सलाम!
कॉलेज कट्टा रिसर्च टीम.
मित्रांनो, आधुनिक भारताचे जनक राजीव गांधी बद्दल पूर्ण माहिती चरित्र निबंध भाषण मराठी Rajiv Gandhi Information Biography in Marathi Language Rajiv Gandhi Essay Speech in Marathi Language ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या.
कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply