जेवण झाल्यानंतर अन्न पचन होण्यासाठी उपाय
जेवण झाल्यानंतर या गोष्टी केल्याने होईल आरोग्यावर वाईट परिणाम
आपल्या दैनंदिन जीवनात आपणास अनेक सवयी जडलेल्या असतात, त्यापैकी काही आपल्या शरिरासाठी चांगल्या आणि काही आपल्या शरिरावर आरोग्यावर वाईट परिणाम करणार्या ठरतात, त्यामुळे आपल्या शरीरास कोण-कोणत्या सवयी लावल्या पाहिजे हे आपण ठरवावे. आपल्या आरोग्यावर चांगले वाईट परिणाम हे आपल्या दैनंदिन जेवण करण्याच्या पद्धती, जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ, पाणी पिण्याची पद्धत वारंवारता बहूदा या गोष्टींचा परिणाम होत असतो. साधारणपणे जेवण झाल्यानंतर अनेकांना वेगवेगळ्या सवयी असतात. कोणाला जेवणानंतर सिगारेट ओढण्याची सवय असते, कोणास शतपावली करण्याची सवय असते, कोणास टिव्ही पाहण्याची सवय असते, कोणास रेडीओ ऐकण्याची सवय असते, मात्र यामध्ये अनेक मित्र मैत्रिणी असे असतात की, त्यांना जेवण झाल्याबरोबर झोपण्याची सवय असते. परंतू आपल्या आरोग्यावर या गोष्टींचा वाईट परिणाम होत असतो, हे अनेकांना माहिती नसते, कारण जेवण केल्याबरोबर आपण जर झोपलो तर त्याचा थेट आपल्या पचनक्रियेवर परिणाम होतो. सिगारेट ओढल्याने केवळ आपल्या पचन क्रियाच बाधीत होत नाही तर यामुळे कॅन्सरचाही धोका अधिक वाढतो.
जेवण झाल्यानंतर अन्न पचन होण्यासाठी उपाय
जेवणानंतर लगेच अंथरुणावर पडल्यावर आणि अंथरूणावर पडल्याबरोबरच झोपी गेल्यास आपली पचनक्रिया थांबते. अन्न पचन होण्यास काही वेळ लागतो. जेवण केल्यावर लगेच झोपल्याने गॅस व आतड्यांच्या संक्रमणाची शक्यता असते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर आपले आजी-आजोबा सांगत असतात की, जेवण झाल्यावर जा बाहेरून फिरून या म्हणजेच शतपावली केल्यास त्याचा अन्न पचनासाठी फायदा होतो.
जेवणानंतर अनेक जण फलाहार करण्याची सवय ठेवतात. मात्र तसे पाहिले तर, पचनासाठी फारसे फायदेशीर नाही. जेवण करत असताना किंवा जेवण झाल्यानंतर फळे खाणे आरोग्यदायी नसल्याचे म्हटले जाते. फलाहार नेहमी जेवण करण्याच्या बहूदा काही वेळापूर्वी करावयास हवा. त्यातल्यात्यात सकाळी नाश्ता करण्यापूर्वी फळ खाणे सर्वाधिक फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
जेवण केल्यानंतर काही जण लगेच अंघोळ करतात मात्र ही पद्धतदेखील आरोग्यासाठी हानीकारक असते. अंघोळ करताना हात-पाय सक्रिय असतात. यामुळे या भागातील रक्तप्रवाह वाढतो. पोटातलाही रक्तसंचार वाढल्यामुळे पचनक्रिया प्रभावित होते.
डॉक्टर जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका असे सांगत असतात, मात्र अनेकांना जेवण करत असतानाच पाणी पिण्याची सवय असते, मात्र ही पद्धत देखील आराग्यासाठी हाणिकारकच आहे, जेवण झाल्याबरोबर घटाघटा पाणी पिण्याची सवय मोडीत काढावी, जेवणानंतर साधारण 15-20 मिनिटांनी पाणी पिलेलं केंव्हाही आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण जेवण करत असताना पाणी पिल्याने तसेच जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास आपली पचनक्रिया त्याने प्रभावित होते.
जेवणानंतर काही लोकांना चहा पिण्याची सवयदेखील आपल्या आरोग्यासाठी हाणिकारकच आहे, चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ल असते. यामुळे प्रथिनांच्या पचनावर वाईट परिणाम होऊन प्रथिनांची पचनक्रिया प्रभावित होते. म्हणून जेवणानंतर चहा हवाच असेल तर तो किमान दोन तासांनी प्यायला हवा. जेणेकरून तुमच्या पचनक्रियेवर त्याचा विपरित परिणाम होणार नाही.
-सागर गोरखे.
जेवण कसे करावे जेवण झाले का जेवण झाल्यावर पोट दुखणे जेवण झाल्यावर जेवण झाल्यानंतर जेवण कधी करावे जेवणाचा वाईट सवयी
अन्न पचन होण्यासाठी उपाय जेवण झाल्यानंतर अन्न पचन होण्यासाठी उपाय
Leave a Reply