भारतीय रिजर्व बँक देशाच्या बँकिंग प्रणालीला हाताळते. यात आर्थिक ध्येयधोरणे, चलन प्रणाली, रेपो रेट बँकांनवर नियंत्रण ठेवते. आरबीआई बद्दल जाणून घ्या. RBI bank information in Marathi Language Reserve Bank of India information in Marathi
भारतीय रिजर्व बँक
भारतीय रिजर्व बँक (आरबीआई) देशाच्या बँकिंग प्रणालीला हाताळते. सामान्यत: रिजर्व बँकतर्फे केलेल्या रेपो रेट बदलाच्या आधारावरच व्यावसायिक बँक सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर ठरवते. चलन प्रणाली सुद्धा आरबीआई अंतर्गत येते. याव्यतिरिक्त आरबीआई बँकिंगशी जोडलेल्या इतर कामाचे व्यवस्थापन करते. हेच कारण आहे की रिजर्व बँकेला ‘बँकांची बँक’ म्हटले जाते.
रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ही भारतातील मध्यवर्ती बँक आहे. मध्यवर्ती बँक ही देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असून देशाचे मौद्रिक, द्रव्य विषयक धोरण तिच्यामार्फत राबवले जाते. देशातील बँक व्यवस्थेला, चलन व्यवस्थेला व अर्थव्यवस्थेला स्थिरता प्राप्त करून देण्याचे कार्य मध्यवर्ती बँक करत असते.
- सन 1656-57 मध्ये स्वीडनमध्ये स्थापन झालेली रिक्स बँक ऑफ स्वीडन ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक होय.
- सन 1694 मध्ये बँक ऑफ इंग्लंड ची स्थापना झाली.
- सन 1913 मध्ये अमेरिकेने फेडरल रिझर्व ही मध्यवर्ती बँक उभारली.
- भारताची रिझर्व बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक १ एप्रिल १९३५ ला स्थापन झाली.
- १९९८ मध्ये युरोपियन युनियने मध्यवर्ती बँक उभारली.
ब्रिटिश भारत सरकारने भारतात १९१३-१४ मध्ये ऑस्टीन चेंबरलीन आयोग स्थापन केला. या आयोगाच्या अहवालात जॉन मेनार्ड केन्स यांनीही योगदान दिले होते. या आयोगाने भारतासाठी मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस केली होती. १९२६ मध्ये हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला होता. ऑगस्ट १९२६ मधील या आयोगाच्या अहवालात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस होती.
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली
ब्रिटिश भारतीय संसदेत १९२७ मध्ये रिझर्व बँक विधेयक सादर झाले पण हे संमत होऊ शकले नाही. सप्टेंबर १९३३ मध्ये सुधारित रिझर्व बँक विधेयक संसदेत सादर झाले, या विधेयकाच्या संमती मुळे रिझर्व बँक कायदा १९३४ अस्तित्वात येऊन ६ मार्च १९३४ पासून लागू करण्यात आला.
१ एप्रिल १९३५ ला रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. आरबीआयची स्थापना खाजगी क्षेत्रात, खाजगी भागधारकांची बँक म्हणून झाली.
RBI bank information in Marathi Language
Reserve Bank of India information in Marathi
सुरुवातीला भारत, ब्रह्मदेश हे आरबीआयचे कार्यक्षेत्र होते. मात्र १९३७ मध्ये ब्रह्मदेश वेगळा झाल्यानंतरही ५ जून १९४२ पर्यंत आरबीआय ब्रह्म देशाचे चलन नियंत्रण अधिकृतपणे करीत होती. १५ ऑगस्ट १९४७ पासून ३० जून १९४८ पर्यंत आरबीआय पाकिस्तानसाठी मध्यवर्ती बँकेची कार्ये करीत होती. देशाच्या दृष्टीने चलन विषयक प्रश्न योग्य रीतीने हाताळता यावेत धोरणात सुसूत्रता असावी व बँकेची सत्ता निवडक व्यक्तींच्या हातात एकवटू नये या कारणामुळे आरबीआयचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कारणामुळे तत्कालीन अर्थमंत्री श्री. सी. डी. देशमुख यांनी आरबीआयच्या राष्ट्रीयीकरणबाबतचे विधेयक मांडले व आरबीआय (सार्वजनिक मालकी कडे हस्तांतरण) कायदा १९४८ संमत करण्यात आला.
१ जानेवारी १९४८ पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण झाले. खाजगी भाग धारकांना एकूण ५.५४ कोटी रुपये (प्रतिशेअर ११८.१ रु.) देऊन 1 जानेवारी १९४९ ला रिझर्व बॅंक संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली. १० मार्च १९४९ ला बँकिंग नियमन कायदा १९४९ (Banking Regulation Act) संमत करण्यात आला यानुसार रिझर्व बँकेला बँकांचे परवाने, नियमन, पर्यवेक्षणाचे अधिकार देण्यात आले. रिझर्व बँक कायदा १९३४ या कायद्याच्या सरनाम्यात रिझर्व बँकेचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे सांगितले आहे. बँक नोटांचे प्रचलन करणे, भारतीय चलनाच्या चित्रीकरणासाठी चलन साठा ठेवणे, देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी चलन व्यवस्थेचे व पतव्यवस्थेचे नियमन करणे.
बँकेचे संचालन करणारे मध्यवर्ती संचालक मंडळ असते यामध्ये एक गव्हर्नर चार डेप्युटी गव्हर्नर आणि इतर संचालक असतात. मध्यवर्ती संचालक मंडळांतर्गत कार्यकारी संचालक आणि त्याखाली कर्मचारी वर्ग असतो. मध्यवर्ती प्रमाणे चार स्थानिक मंडळही कार्यरत आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर आस्बोर्न अर्कल स्मिथ हे होते.
पहिले भारतीय गव्हर्नर सीडी देशमुख होते. सध्या शक्तीकांत दास हे गव्हर्नर आहेत. तर एन एस विश्वनाथ बी. पी. कानुंगो व महेश जैन हे डेप्युटी गव्हर्नर आहेत. आरबीआयची चार स्थानिक मंडळ मुंबई, कोलकता, चेन्नई आणि नवी दिल्ली येथे आहेत. आरबीआयची १९ विभागीय कार्यालय आहेत. जी मुख्यता राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी आहेत त्यापैकी महाराष्ट्रात तीन आहेत मुंबई, बेलापूर आणि नागपूर.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य मराठी
- चलन विषयक धोरण अंमलबजावणी – चलन विषयक धोरणांच्या अंमलबजावणीची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर टाकण्यात आली आहे. रिझर्व बँक दर सहा महिन्यांनी चलनविषयक धोरण अहवाल प्रकाशित करते, या अहवालात चलनवाढीचे स्त्रोत, पुढील ६ महिने ते १८ महिन्यातील चलनवाढीच्या शक्यता या बाबी स्पष्ट केलेल्या असतात.
- चलन प्रचालन – एक रुपयाची नोट सोडून इतर सर्व नोटा छापण्याचे काम रिझर्व बॅंक करते सर्व नाणी व सर्व नोटांचे प्रचालनाचे (म्हणजे व्यवहारात आणण्याचे) काम रिझर्व बँक करते.
- सरकारची बँक – सरकारच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी रिझर्व बँकेवरती असते. रिझर्व बँक कायदा १९३४ नुसार केंद्र सरकारचे पैसा देणे विनिमय बँकिंग व्यवहार आणि कर्ज याबाबत विश्वसनीय म्हणून रिझर्व बॅंक काम पाहते. करार केल्यास राज्य सरकार यांसाठी बँकर आणि कर्जाची व्यवस्थापक म्हणून रिझर्व बँक काम पाहू शकते.
- बँकांची बँक – देशातील सर्व बँकांचे खाते रिझर्व बँकेत असते. या खात्यामार्फत रिझर्व बँक बँकांना बँकिंग सुविधा पुरवते. रिझर्व बँक इतर बँकांना कर्ज पुरवते, बँकांसाठी अंतिम त्राता म्हणून उभी राहते, बँकांना धोरणात्मक सल्ला व मार्गदर्शन रिझर्व बॅंक देत असते.
- पतनियंत्रण – व्यापारी बँका ठेवी स्वीकारून त्यातून कर्ज देत असतात या प्रक्रियेत बँक पतनिर्मिती करीत असतात व्यापारी बँकेच्या पत निर्मितीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य आरबीआय करते.
- बँक व्यवस्थेची नियंत्रक – रिझर्व बँक बँकिंग व्यवस्थेचे नियंत्रण करीत असते. देशातील सर्व व्यापारी बँका वित्तीय संस्था यांचे नियमन रिझर्व बँक करते. प्रादेशिक ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्य सहकारी बँका यांच्या कामकाजाचे नियमन रिझर्व बँकेचा ग्रामीण नियोजन व पत विभाग करतो.
- भारतात १९९२ पासून रेपो व्यवहारास सुरूवात करण्यात आली आहे. सुरूवातीस ही पद्ती बंद करण्यात आली. मात्र १९९६ पासून पुन्हा ही पद्धती पतनियंत्रणाच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. तर एप्रिल १९९७ पासून रिझर्व्ह रेपो व्यवहारास सुरूवात करण्यात आली आहे. येणे रेपोरेट याचा अर्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, व्यापारी बँकांना अत्यल्प काळासाठी रोखता मिळवून देण्यासाठी (१४ दिवसापर्यंत) जो व्याजदर आकारतात तो दर होय. तर रिव्हर्स रेपो रेट याचा अर्थ व्यापारी बँका व इतर बँका आपल्याकडील जादा रोकड अत्यल्प काळासाठी रिझर्व्ह बँकेत ठेवतात. अशा वेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जो व्याजदर देतात तो दर होय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी पतनियंत्रणाच्या उद्देशाने रेपो व रिव्हर्स रेपो दर बदलण्याचे धोरण अनुसरते. यामुळे पतनियंत्रणाचे कार्य सुलभ होण्यास खुप मदत होते.
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
RBI bank information in Marathi Language Reserve Bank of India information in Marathi भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य मराठी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली
Leave a Reply