Veer Tanaji Malusare Information in Marathi सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे पराक्रम माहिती
महाराष्ट्राच्या या पवित्र मातीत अनेक नररत्नानी जन्म घेतला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना तर या रतनांची खानच सापडली होती असे म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्याच रक्तांनी या मावळातील माती लाल झाली आहे. असेच एक छात्रपतिंचा उजवा हाथ म्हणून ओळखले जाणारे. “आधी लगिन कोंढान्याचे मग रायबाचे” असे बोलून महान पराक्रम करून स्वराज्याच्या कामी आलेले नरवीर तानाजी मालुसरे.
तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला
‘गड आला पण माझा सिंह गेला’ असे उद्गार महाराजांनी तानाजी पडल्यावर काढले होते. अवघ्या ३५० मावळ्यांना सोबत घेऊन अभेद्य असा कोंढाणा जिंकून घेतला ते नरवीर तानाजी मालुसरे. आज आपण त्यांचीच थोडक्यात माहिती घेऊया.
आपल्या वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी निवडक मावळ्यांना सोबतीला घेऊन स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा करणाऱ्या शिवाजी महाराजांचा एक एक मावळा सुद्धा तितकाच झुंजार…शूरवीर…बलाढ्य…कर्तृत्ववान…विश्वासू…प्रामाणिक…आणि प्रचंड ताकदीचा लढवय्या सैनिक होता. तानाजी यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गोडवली (जावली तालुका) या छोट्या गावात १६२६ मध्ये झाला. तानाजीचा जन्म हिंदू कोळी कुटुंबात झाला होता. तानाजीच्या वडिलांचे नाव सरदार कालोजी आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती. शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते.
Tanaji Malusare Biography in Marathi
पुरंदर च्या तहात २२ किल्ले मुगलांना दिले त्यानंतर औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातुन सुटका करून घेतल्यावर महाराजांनी एक एक किल्ला परत घ्यायला सुरुवात केली. पण पुण्याच्या अगदी जवळ असलेला डोंगरातील वाघ “कोंढाणा” अजूनही औरंगजेबाच्या ताब्यातच होता तिथे किल्लेदार होता राजपूत उदयभान. माँसाहेबांनी महाराजांकडे कोंढाणा परत घेण्याची इच्छा बोलून दाखविली तयारी सुरु झाली स्वतः महाराज चालून जाणार होते. आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी तानाजी जेव्हा रायगडावर गेले तेव्हा त्यांना सगळी हकीकत समजली. तेव्हा तानाजी गरजले “महाराज आम्ही जीवंत असताना आमचा राजा मृत्युच्या दारात जाणार हे असल जगन काय कामाचे ते काही नाही मीच जाणार महाराज”. महाराज म्हटले अरे तानाजी मुलाचे लग्न आहे ते सोडून जाणे बरोबर नाही कार्य उरकुन घ्यावे तेव्हा तानाजी गरजले “महाराज आधी लगिन कोंढाण्याचे मग रायबाचे” आणि तानाजी सज्ज झाले कोंढाणा घ्यायला.
शेवटी कोंडाणा किल्ल्यावरील आक्रमणाचा दिवस ठरला. ४ फेब्रुवारी १६७० ची रात्र होती. तानाजी मालसुरेबरोबरच त्याचे भाऊ सूर्यजी आणि मामा (शेलार मामा) असे एकूण ३५० सैनिकांसह कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी निघाले. तानाजीराव सशक्त आणि अत्यंत शक्तिशाली होते. कोंढाणा किल्ला राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी होता आणि महाराजांना कब्जा करण्यासाठी ते फार महत्वाचे होते. कोंढाणा किल्ल्यावर पोहचल्यावर तानाजी सैन्याने पश्चिमेकडून किल्ल्यात प्रवेश करण्याचे ठरवले. तानाजीकडे एक घोरपड होती. हा असा जीव आहे की जर त्याने दगडाला घट्ट पकडून ठेवले तर त्याला हलवणे खूप जोखीमीचे काम आहे. तानाजींनी घोरपडीला घट्ट दोरी बांधली आणि किल्ल्याच्या पश्चिमेच्या बुरुजावर फेकून दिली आणि त्याच्या मदतीने मावळे किल्यावर चढले. या योजनेमुळे तानाजी व त्याचे बरेच साथीदार शांतपणे किल्ल्यावर चढले. कोंढाणा दरवाजा उघडल्यानंतर त्याने मोगलांवर हल्ला केला. राजकुमार जयसिंग ने नियुक्त केलेल्या उदयभान राठोड यांच्याकडे कोंढाणा किल्ल्याचे नियंत्रण होते.
तानाजीने उदयभानच्या नेतृत्वात ५००० मुघल सैनिकांसोबत भयंकर युद्ध केले. तानाजीने शूर सिंहाप्रमाणे युद्ध केले आणि शेवटी हा किल्ला जिंकला, पण या लढाईमध्ये तानाजी खूप जखमी झाले आणि डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला ठार मारून स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. महान पराक्रम दाखवून, तानाजींनी मुघलांच्या ताब्यातून कोंढाणा किल्ला आणि जवळचा परिसर आपल्या ताब्यात केला. या युद्धाच्या वेळी, जेव्हा त्याची ढाल तुटली तेव्हा तानाजींनी आपल्या डोक्यावरचा फेटा आपल्या हातावर बांधून तलवारीचे वार त्यांच्या हातावर घेतले आणि एका हाताने त्यांनी तलवार चालविली. कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यातून सोडवल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या मित्राच्या स्मरणार्थ कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून “सिंहगड” केले आणि पुणे नगरच्या “वाकडेवाडी” असे नाव “नरवीर तानाजी वाडी” असे ठेवले. भारत सरकारने तानजीचा सन्मान करत सिंहगड किल्ल्याचे चित्र असलेले १५० रुपयांचे टपाल तिकीटही जाहीर केले.
वीर सावरकरांनी मराठीत तानाजीवर लिहिलेल्या काव्याचे उतारे खालीलप्रमाणे आहेत.
जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवति त्वामहम् यशोयुतां वंदे ॥१॥
स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं ।
आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥२॥
चितूरगडिंच्या बुरुजानो त्या जोहारासह या ।
प्रतापसिंहा प्रथितविक्रमा या हो या समया ॥३॥
तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई ।
निगा रखो महाराज रायगड की दौलत आयी ॥४॥
जरिपटका तोलीत धनाजी संताजी या या ।
दिल्लीच्या तक्ताचीं छकलें उधळित भाऊ या ॥५॥
स्वतंत्रतेच्या रणांत मरुनी चिरंजीव झाले ।
या ते तुम्ही राष्ट्रवीरवर या हो या सारे ॥६॥
मित्रांनो, नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply