Samaj sudharak acharya vinoba bhave short information in Marathi आचार्य विनोबा भावे यांच्या बद्दल माहिती निबंध मराठी भुदान चळवळीचे जनक आणि महात्मा गांधींचे अध्यात्मिक वारसदार यासोबतच गांधी विचारांची प्रयोगशाळा अशी बिरूदावली ज्यांच्या नावापुढे लावली जाते ते व्यक्तिमत्व म्हणजेच आचार्य विनोबा भावे.
आचार्य विनोबा भावेंचा जन्म ११ सप्टेंबर १८८५ रोजी कोकणातील गागोदे या गावात झाला. गणित विषयात अगदी तल्लख बुध्दी असणाऱ्या विनोबांनी गांधीजींच्या विचाराने प्रभावीत होऊन गांधीजींचे शिष्य बनण्यासाठी १९१६ मध्ये हायस्कुलचे शिक्षण सोडून दिले. ते पहिल्या वेळेस गांधीजींना भेटण्यासाठी गेले. तेव्हा गांधीजी भाजी चिरत होते. ते दृष्य पाहून विनोबा गांधीजींच्या प्रेमात पडले. कारण एवढे मोठे गांधीजी स्वावलंबी दृष्टीकोणातून भाजी चिरत होते. तेव्हाच त्यांनी गांधीजींचे शिष्यत्व पत्करण्याचे ठरवले. पुढे विनोबा गांधीजींसोबत स्वातंत्र्यलढ्यातही सहभागी झाले. विनोबा खूप मोठे विद्वान व खरे देशभक्त होते. गाधीजींनी ब्रिटीशांविरोधात पुकारलेल्या असहकार अंदोलनातही विनोबा सहभागी झाले होते. याबरोबरच विनोबा गांधीजींच्या सुत कातण्यामुळे व चरखा चालवण्यामुळे गांधीजींकडे आकर्षित झाले. विनोबांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याने इंग्रजांच्या पाचावर धारण बसली होती. त्यामुळे त्यांनी विनोबांना धुळ्याच्या कारागृहात टाकले. तर तेथे विनोबा कैद्यांसोबत भगद्गीतेचे मराठीतून पाठ घेत असत. पुढे त्यांची भाषणे पुस्तकरूपाने प्रकाशीत करण्यात आले.
गांधीजींनी १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. तेव्हा देशभरात गांधीजी वगळता विनोबाजी वैयक्तिक सत्याग्रह करणारे पहिले व्यक्ती होते.
भुदान चळवळ-
स्वातंत्र्यानंतर विनोबा देशभर यात्रा करत असताना तेलंगनातील पोचमपल्ली गावात काही भुमीहिन लोकांनी विनोबांकडे ८० एकर जमीन मागितली. ज्यामुळे ते त्यांचे पोट भरू शकतील. तेव्हा विनोबांच्या शब्दाला मान देत एका जमीनदाराने आपली जमीन दान केली. हे देशभरातील त्याग आणि अहिंसेचे एक मोठे उदाहरण होते. या घटनेतून प्रेरीत होऊन विनोबांनी भुदान चळवळीची सुरूवात केली. या चळवळीच्या माध्यमातून १३ वर्षात विनोबांनी देशभर यात्रा करत ४४ लाख एकर जमीन मिळवली तर त्यातील १३ लाख एकर जमीनीचे भुमीहिन शेतकऱ्यांना वाटप केले. विनोबाजींनी उभारलेल्या या चळवळीचे जगभरातून कौतूक केले गेले.
Vinoba bhave ashram information in Marathi
पवनार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील वर्धा शहरापासून ६ की.मी. अंतरावर असलेले एक गाव आहे. या गावी धाम नदीचे तीरावर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे. हा आश्रम १५ एकर जागेवर् विस्तारलेला आहे. read more
विनोबांच्या आयुष्यात सर्वोदय शब्दाला खूप महत्व होते ज्याचा अर्थ सर्वांचा विकास. या माध्यमातून गरीब व मागास प्रवर्गासाठी खूप मोठे काम उभे केले. भुदान चळवळ ही त्यातीलच एक.
विनोबांनी ग्रामस्वराज्य संकल्पना ग्रामदानापर्यंत आणली. तर भगद्गीतेचे सार असणारे गीताई या पुस्तकाचे उच्चांक प्रस्थापीत केले. याबरोबरच कुराण, बायबल यांच्यावर लिहीलेले सारग्रंथही त्यांच्यातील प्रकांड पंडित्वाचे दर्शन घडवतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व आणिबाणीवरील त्यांची भुमिका वादात सापडली होती. या भुमिकांमुळे जनतेपासून ते अनुयायांपर्यंत सर्वांचाच राग ओढावून घ्यावा लागला होता. परंतू या वादानंतरही स्वतःला जे पटेल त्याचे आचरण करण्यात विनोबांनी कोणताहा कसूर ठेवला नाही. अशा विचारावर ठाम असलेल्या विनोबाजींनी १५ नोव्हेंबर १९८२ रोजी अखेरचा श्वास घेतला.
विनोबांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून १९५८ मध्ये विनोबांना आशियाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा रेमन मॅगेसेस पुरस्कार प्रदान करण्यात आला तर १९८३ मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
त्याग व अहिंसेचा मुलमंत्र जपणाऱ्या विनोबांना जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन…
Samaj sudharak acharya vinoba bhave short information in Marathi
आचार्य विनोबा भावे यांच्या बद्दल माहिती निबंध मराठी
Leave a Reply