“मेरी झांसी नही दुंगी।” असं इंग्रजांना ठणकाऊन सांगणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई या प्रेरणादायी आणि स्त्रीशक्तीच उदाहरण आहे. Rani Lakshmi Bai Information Biography Story in Marathi Language
Rani Lakshmi Bai Information Biography Story in Marathi Language
झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती निबंध भाषण
जन्म- 19 November 1828, Varanasi
मृत्यू- 18 June 1858, Gwalior
भारताला 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांणी बलिदान दिले आहे. या सगळ्यामध्ये भारतीय महिलादेखील मागे नव्हत्या. आज आपण अश्याच एका स्वातंत्र्यविरतेचा इतिहास जाणून घेणार आहोत. त्या पूजनीय विरतेचे नाव, लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई!
या विरतेचा इतिहास जाणून घेताना आपण अगदी बालपनापासुन सुरुवात करू आणि पुढे पुढे जात आपण त्यांचा संपूर्ण इतिहास बघू.
झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचे बालपण
झाशीची राणी यांचा जन्म दिनांक 19 नोव्हेबर 1835 रोजी काशी येथे झाला. त्यांचे मूळ नाव मणिकर्णिका होते. लक्ष्मीबाईचा जन्म तांबे घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथीबाई तांबे होते. तांबे घराणे मुळचे सातारा जिल्ह्यातील. मोरोपंत तांबे हे पुण्यात पेशव्यांच्या आश्रयाला होते.
आता आपण त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकुया.
मुळातच राणी लक्ष्मीबाई या कोणत्याही राजघरण्यातील नव्हत्या पण त्याचं ऐन उमेदिचे आयुष्य हे राजघणाऱ्यातील लोकांसोबत गेले होते. अगदी लहानपणापासुनच त्यांनी युद्धशास्त्र शिकुन घेतले होते. त्यात त्या पुरत्या पारंगत झाल्या होत्या. युद्धशास्त्र, अश्वारोहण इत्यादी प्रकारांमध्ये त्यांची निपुणता दिवसेंदिवस बहतर चालली होती. म्हणून इतिहासात त्या धोरणी, चतुर, नेतृत्ववान आणि कर्तुत्ववान मानल्या गेल्या होत्या. अश्वारोहनाचे तांत्रशुध्द प्रशिक्षण त्यांनी घेतले होते.
पुण्यातील बाजीराव पेशव्यांच्या दरबारी बाळंभट देवधर नावाचे एक कुस्तीपटु आणि कसरतपटु होते. मल्लखांब नावाचा कसरत प्रकार त्यांनीच निर्माण केला असं मानलें जाते. राणी लक्ष्मीबाईंनी त्यांच्याकडूनच प्रशिक्षण घेतले.
1842 मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. लग्नानंतर त्याना एक मुलगा झाला पण तीन महिन्याच्या असताना त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांनी त्याच संस्थानातील वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा दत्तक घेतला. त्यांचे नाव दामोदर ठेवले. त्यांनी तलवारबाजी, घोडेस्वारी, कसरत, मल्लखांब या गोष्टींचे प्रशिक्षण घेण्यात आणि सराव करण्यात घालवत असत. लग्नाच्या 11 वर्षानंतर 1853 मध्ये गंगाधररावांचे निधन झाले. त्यानंतर झाशीचा कारभार राणी लक्ष्मीबाईं बघू लागल्या.
Rani Lakshmi Bai Information Biography Story in Marathi Language
झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती निबंध भाषण
झाशी संस्थान आणि ईस्ट इंडिया कंपनीचे चांगले संबंध होते. या दोहोत अनेकदा पत्रव्यवहार देखील व्हायचे त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी आपले संस्थान खालसा करणार नाही अशी राणी लक्ष्मीबाईंना खात्री होती पण ईस्ट इंडिया कंपनीने संस्थान खालसा करण्याचा घाट घातला होता. कारण ज्या राजांना वंश नाही अशी राज्ये ते खालसा करत. यासाठी इतरही बरेच नियम होते.
या निर्णयाविरोधात जाऊन लक्ष्मीबाईंनी कंपनीला पत्र लिहून त्यांच्या विश्वासर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हिंदुस्तानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय त्यावेळचा गवर्नर डलहौसीने घेतला होता. राणी लक्ष्मीबाईंनी प्रचंड विरोध करून देखील त्यानी झाशी संस्थान खालसा केलेच. १३ मार्च १८५३ रोजी त्याने जाहिरनामा प्रसिद्ध करून दत्तक विधान नामंजूर केले आणि झाशी संस्थान ब्रिटिश राजवटित समाविष्ट करत असल्याचे घोषित केले. या वेळेसच राणी लक्ष्मीबाईंनी ते ऐतिहासिक विधान केले होते. “मी माझी झाशी देणार नाही.”
Short Essay Story Rani Laxmi Bai Marathi Language
१८५७ चा पहिला स्वातंत्र्य लढ़ा हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण. हिन्दुस्तानातील बहुतांशी भागात हा लढ़ा उभारला होता. ५ जून १८५७ रोजी झाशी येथे उठाव झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावल होतं. या परिस्थितिचा फायदा घेऊन लक्ष्मीबाई पुन्हा किल्ल्यात राहायला गेल्या. या दरम्यान ब्रिटीशांनी २२ जुलै १८५७ रोजी लक्ष्मीबाईंना पुन्हा अधिकारसुत्रे हाती घ्यायला सांगितली परंतु राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट होती. खजिना रिकामा होता. तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. विश्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री तर प्रत्यक्ष वडिलांना मारोपंत तांब्यांना खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ आणि खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. इंग्रजांनी रिकाम्या केलेल्या तोफा पुन्हा सुरु केल्या. दारुगोळ्याची निर्मिती सुरु केली. बंडखोर शिपायांना पुन्हा सामिल करुण घेतले. किल्ल्यावर महिलांसाठी हळदी-कुंकु कार्यक्रम घेऊन सांस्कृतिक ठेवा जपला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर ई नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला.
२१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीला निशस्त्र भेटायला सांगितले किंवा लढाईला तयार रहा असे सुनावले. विश्वासघातामुळे ब्रिटिश शासन नको अशी धारणा झाल्यामुळे राणीने भेटन्यास नकार दिला. किंबहुना दुसऱ्या बाजूने तात्या टोपे यांना लढाईसाठी तयार राहान्यास सूचवले. ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. शेवटी ९ व्या दिवशी ब्रिटीशांनी पश्चिमेकड़े खिंडार पाडुन किल्याची तटबंदी तोड़ली. शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा. ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला आलेल्या तात्या टोपेंच्या सैन्याचा इंग्रजांपुढे निभाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाईं डगमगल्या नाहीत त्यांनी सर्व फौजेला धीर देताना स्वबळावर लढण्याचे आवाहन केले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. तरीसुद्धा या शूर राणीने ११ दिवस ब्रिटिशांना झुलवत ठेवले. यावर ह्यूज रोजनेही केलेले विधान राणी लक्ष्मीबाईंचे कर्तुत्व सांगणारे होते, “राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.”
या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरला हल्ल्याचा तयारीतच आला होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी स्वतः रणांगणात उतरल्या.
त्यांनी इग्रजांशी दोन हात केले. त्या दुर्गेसारख्या लढल्या. राणी लक्ष्मीबाईचा डाव्या कुशीत तलवार घुसली. रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही.
घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. हा देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.
ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क’ असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला.
Jhansi ki Rani Dialogues in Marathi
“मेरी झांसी नही दुंगी।”
मित्रांनो राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र प्रेरणादाई आहे. स्वतःचा हक्कासाठी, स्वातंत्रासाठी त्यांनी संघर्ष केला. म्हणतात ना अन्याय सहन करणारा देखील गुन्हेगारच असतो म्हणूनच त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले आणि एक आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवला.
-करण पाटील.
Rani Lakshmi Bai Information Biography Story in Marathi Language Short Essay Story Rani Laxmi Bai Marathi Language ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा. Read more.
कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply