अनेकदा आक्रमणे झाली पुरंदर स्वराज्याच्या ताब्यातून गेला पण छत्रपतींनी पुरंदर किल्ला पुन्हा का जिंकला किल्ल्याचे राजकीय भौगोलिक महत्व जाणून घ्या भुलेश्वर, वज्रगड कात्रज घाट हे पुरंदर किल्ल्याच्या जवळ आहेत. तसेच पुरंदरच्या चौफेर माच्या आहेत स्वराज्याचे पहिले युवराज आणि दूसरे छत्रपति संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणारा पुरंदर. पुरंदर किल्ला माहिती इतिहास मराठी Purandar Fort information in Marathi इतिहासात पुरंदरचा तह म्हणून नोंद झाली. मुरारबाजिंचा पराक्रम या किल्ल्याने आणि दिलेरखानानेही पाहिला. तर आज याच किल्याची माहिती घेऊया.
पुरंदर किल्ला माहिती इतिहास मराठी
Purandar Fort information in Marathi
क-हे पठाराच्या काव्यात पुरंदर किल्ल्याचे असे सुरेख वर्णन केले आहे. पुरंदर म्हणजे इंद्र, ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढय़ तसाच पुरंदरगड. पुराणात त्या डोंगराचे नाव आहे इंद्रनील पर्वत. इंद्राचे अस्त्र वज्र, म्हणून पुरंदरचा सोबती असलेल्या किल्ल्याला नाव देण्यात आले ‘वज्रगड’! पुरंदर किल्ल्याच्या नावाविषयी एक वेगळी उत्पत्ती आहे. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. त्याचे मूळ नाव ‘पूर’. त्या पूर गावाचा आधार म्हणून किल्ल्याला ‘पुरंधर’ आणि कालांतराने अपभ्रंशित होत ‘पुरंदर’ असे नाव पडले असावे.
पुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेने दिलेरखानाला अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा. मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी १६६५ च्या आषाढात पुरंदरला वेढा घातला. मुघलांच्या अफाट फौजेला मुरारबाजी त्याच्या मोजक्या मावळ्यांसह निकराची टक्कर देत होता.
हा किल्ला यादव घराण्याच्या काळात बांधला गेला. भगवान परशुराम यांच्या नावावर पुरंदरचे नाव ठेवले गेले. यादव घराण्याच्या पराभवानंतर हा गड पर्शियन राजांच्या ताब्यात गेला. ते १३५० मध्ये पुन्हा बांधण्यात आले. विजापूर व अहमदनगरच्या बादशाहांच्या कारकिर्दीत या किल्ल्यावरूनच सरकार चालवले जात असे. आदिलशहाने ई.स. १६४९ ला शहाजीराजांना कैद केले, आणि याच दरम्यान शिवरायांनी आदिलशाहीतले अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले होते. त्यामुळे खवळलेल्या आदिलशाहने महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानास धाडले. एकीकडे शहाजीराजे कैदेत आणि दुसरीकडे फत्तेखान युद्ध करण्यासाठी निघाल्याने स्वराज्यावर येऊ घातलेले संकट, अश्याने शिवाजी महाराजांकरता परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. फत्तेखानास पराभूत करण्यासाठी यावेळी महाराजांनी पुरंदर किल्ल्याची निवड केली. पण गड त्या सुमारास महाराजांच्या ताब्यात नव्हता, पुरंदरवर तेंव्हा महादजी निळकंठराव यांचे वर्चस्व होते. त्यांच्यातील भाऊबंदकीचा फायदा उचलत शिवरायांनी किल्ल्यात प्रवेश मिळविला व पुरंदरच्या आश्रयाने फत्तेखानाला मराठ्यांनी तगडी झुंज देऊन हे युद्ध जिंकले. १६४६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर हल्ला केला आणि ताब्यात घेतला.
मिर्झाराजे जयसिंग यांनी स्वारी केली तेव्हा पुरंदरचा किल्लेदार कोण होता
मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबच्या सैन्यात सामील झाले आणि १६६५ मध्ये पुरंदर किल्ल्यावर हल्ला केला. दिलेर खाननेही त्याला मदत केली आणि हा गड औरंगजेबाच्या ताब्यात गेला. पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे हे त्या काळी औरंगजेबच्या सैनिकांशी लढताना ते शहीद झाला. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी या किल्ल्याचे रक्षण केले.
पुरंदरच्या तहात काय ठरले होते
१६६५ मध्ये छत्रपती शिवाजींनी औरंगजेबाशी पुरंदरचा पहिला तह केला. या करारानुसार महाराजांना औरंगजेबाला ४ लाख पौंड (सोन्याचे सील) द्यायचे होते. याचबरोबर स्वराज्यातील २३ किल्ले औरंगजेबाला द्यायचे ठरले. यात पुरंदर, वज्रगड उर्फ रुद्रमाळ, कोंढाणा, कर्नाळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोना, रोहिडा, नरदुर्ग, माहुली, भांडरदुर्ग, पालसखोल, रुपगड, बख्तगड, मरकगड, माणिकगड, सरूपगड, सकरगड, अंकोला, सोनगड, मानगड.
निळोपंत मुजुमदार यांनी 8 मार्च 1670 ला पुरंदर पुन्हा स्वराज्यात आणला. संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर पुरंदर किल्ल्यावर औरंजगजेबाने कब्जा केला आणि त्याचे नाव ठेवले ‘आजमगढ’!
पुढे मोगलांशी भांडून मराठ्यांच्या वतीने शंकर नारायण सचिव यांनी पुरंदर परत मिळविला, त्यापश्चात छत्रपति शाहुंनी शके 1695 मधे पुरंदर पेशव्यांच्या हाती दिला. त्यानंतर कित्येक दिवस पुरंदर किल्ला पेशव्यांची राजधानी होती. याच ठिकाणी 1697 ला गंगाबाई पेशवेंना मुलगा झाला’ सवाई माधवराव’. ई.स.1818 साली मात्र हा गड ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ‘पुरंदरेश्वर’ नावाचे मंदिर आहे. पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील बाजूस पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. ते पेशव्यांचे खासगी मंदिर होते. या मंदिराच्या थोडे वर गेल्यावर पेशव्यांच्या दुमजली वाडय़ांचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथांनी तो बांधला. त्या वाडयातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाडयाच्या मागे विहीर आहे. ती चांगल्या अवस्थेत आहे. तेथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते. दुसरी खाली भैरविखडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या वाटेने वर गेल्यावर पंधरा मिनिटांतच पर्यटक दिल्ली दरवाजापाशी पोहोचतो. या तिस-या दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे कडा थेट गेलेला दिसतो, तोच तो खंदक कडा. कडयाच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत तिस-या दरवाजापाशी यावे. तेथून एक वाट पुढे जाते. वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. तेथेच अंबरखाना होता. थोडे वर चढून पाहिल्यास वाडयाचे अवशेष दिसतात. वाटेवरून पुढे गेल्यावर पाण्याचे हौद लागतात.
वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. त्या वाटेवरून खाली गेल्यावर केदार दरवाजा लागतो. पडझडीमुळे तो दरवाजा वापरात नसला तरी पूर्वी त्या दरवाजाला फार महत्व होते. या वाटेने सरळ पुढे केदारेश्वराच्या मंदिराकडे जाता येते. हे मंदिर उंचावर असल्याने येथून चारी बाजूचा परिसर व किल्ल्याचा आवाका लक्षात येतो. या ठिकाणावरून खूपसे गड दिसतात. किल्ल्यावर झालेली पडझड पाहवत नाही. पुरंदर किल्ला संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे किल्ल्याचे किल्लेपण जतन करण्याचे काम त्यांनी करावे. या ठिकाणी सर्व सुविधा द्याव्यात. गडावर जाताना मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्याची मिलिटरीची परवानगी नसल्याने फोटो काढता येत नाहीत. तसेच वज्रगडावरही जाण्यास बंदी आहे. हा ऐतिहासिक किल्ला पाहताना डोळ्यासमोर इतिहास उभा राहतो.
अक्षय जाधव कॉलेज कट्टा.
मित्रांनो, पुरंदर किल्ल्याची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply