१४ जानेवारी प्रत्येक वर्षी आपण “शौर्य दिन” म्हणून साजरा करतो त्याला कारण पानिपतचे तिसरे युद्ध आहे. आपण रोजच्या बोलण्यात एक वाक्य नेहमी बोलतो की विश्वास गेला पानिपतात. पण पानिपतात नक्की काय झाले होते. मराठ्यांचा आणि अब्दलीचा संघर्ष उद्भवन्यास नेमके कारण काय होते पानिपत लढाईची ही माहिती वाचून तुम्ही थक्क व्हाल पानिपत तिसरे युद्ध मराठी माहिती
१४ जानेवारी प्रत्येक वर्षी आपण “शौर्य दिन” म्हणून साजरा करतो त्याला कारण पानिपतचे तिसरे युद्ध आहे. आपण रोजच्या बोलण्यात एक वाक्य नेहमी बोलतो की विश्वास गेला पानिपतात. पण पानिपतात नक्की काय झाले होते. मराठ्यांचा आणि अब्दलीचा संघर्ष उद्भवन्यास नेमके कारण काय होते पानिपतच्या युद्धाचा भारतावर पुढील काळात काय परिणाम झाला. या सर्व बाबी आजच्या लेखात पाहणार आहोत.
इथे दोन प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतात
१- जर मराठे आणि अब्दाली यांच्यात तिसरे युद्ध झाले तर पहिली दोन कोणामध्ये झाली. आणि
२- पानिपत येथेच का इतकी युद्ध का झाली.
पानिपतच्या पहिल्या युद्धात कोणाचा पराभव झाला
तर पहिल्या प्रश्नाच उत्तर आहे की पहिले युध्द लोधी घराण्यातील शेवटचा राजा इब्राहिम खान लोधी आणि बाबर यामध्ये झाले इथ पासुनच मुघलांच्या सत्तेचा प्रारंभ झाल्याचा आपनास दिसते.
तर दूसरे युद्ध अकबर आणि राजा हेमु यामध्ये झाले होते.
आपल्याला प्रामुख्याने आज तिसऱ्या युद्धाची माहिती घेणार आहोत.
राहीला दूसरा प्रश्न पानिपतच का तर त्याची भौगोलिक आणि राजकीय अशी कारणे आहेत त्याविषयी आज थोडक्यातच सांगतो
पानिपत लढाईची ही माहिती वाचून तुम्ही थक्क व्हाल
अफगान आक्रमकांना पंजाब मधून भारतात यायला काही अडचन नव्हती. खैबर खिंडी नंतर दिल्ली मध्ये जाव लागत होते तेव्हा दिल्ली राज्यकरत्यांना जवळ असणाऱ्या विस्तीर्ण अश्या पानीपत या ठिकाणी युद्ध करने सोपे होते वाळवंटी असा हा विस्तीर्ण प्रदेश दिल्ली पासून जवळ असल्यामुळे सैन्याची ने आण करणे सोपे. तिथे असणारे सुतार लोहार आणि अन्य कारागिर शस्त्रे बनवन्यात कुशल ही सर्व कारणे म्हणून पानीपत महत्वाचे ठिकाण.
आता आपण तिसऱ्या युद्धाकडे येऊ आपण एकलेच आहे मराठे पार अटके पर्यन्त जाऊन पोहचले म्हणून. आता हे अटक कुठ आहे हेच किती तरी मराठी लोकांना माहीत नाही फक्त आम्ही अटकेपर्यंत झेंडे गाडले हे माहीत आहे. अटक हा किल्ला पाकिस्तानात आहे. तिथपर्यंत साम्राज्याचा विस्तार झाला होता.
Panipat War 3 information in Marathi
Panipat War 3 History in Marathi
उत्तरेकडील विस्ताराला खरी सुरुवात पेशवा थोरले बाजीराव यांच्या काळात झाली. औरंगजेबाच्या मृत्युनंतर मुघल साम्राज्याचे पतन होत होते त्याच्याच अवशेशांवर मराठ्यांनी साम्राज्य विस्तार केला. याच सुमारास भारतावर अहमदशाह अब्दालीची आक्रमणणे सुरु झाली. नादिरशहाला ठार केल्यानंतर अफ़ग़ानिस्थानचा शासक बनलेल्या अब्दालीने १७४८ पासून भारतात येणे सुरु केले भारताच्या प्रचंड संपत्तीचे त्याला आकर्षण होते आणि दिल्लीमध्ये कोणी बलाढ्य साम्राज्य राहील नव्हतं.
दिल्लीचे सम्राट दुर्बल असल्याने दरबारात सरदार वर्ग प्रबळ होउ लागला. वजीर सफदरजंग आणि दुआबमधील रोहिले यांच्यातील संबंध बिघडू लागले. म्हणून सफदरजंग याने मराठ्यांना मदत मागितली. त्यानुसार झालेल्या संघर्षात रोहिले पराभूत झाल्याने त्यांचा पुढारी नजीबखान याने आपल्या मदतिसाठी अब्दलीला बोलविले. त्यामुळे १७५१ मध्ये अब्दाली पंजाबात आला आणि लाहौर जिंकून घेतले. अब्दाली दिल्लीवर आक्रमण करणार अशी चिन्हे दिसू लागल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सफदरजंग याने मराठ्यांशी एक करार केला. १७५२ मध्ये या करारा नुसार मुगल साम्राज्याचे अंतर्गत आणि बाह्य शत्रुंपासून रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतली. त्याऐवजी मराठ्यांना ५० लक्ष रूपयाचे पंजाब, सिंध व दुआबचे चौथाईचे अधिकार तसेच आगरा व अजमेरची सुभेदारी मिळाली. मात्र मराठ्यांशी करार करत असतानाच घाबरलेल्या सम्राटाने अब्दालीला पंजाब देऊन टाकला व दिल्लीवरील संभाव्य आक्रमण टाळले. अशप्रकारे मराठे दिल्लीच्या राजकारणात अप्रत्यक्षरित्या भरकटले गेले.
पण पंजाबवर अधिकार नक्की कोणाचा मराठ्यांचा की अब्दालीचा हा महत्वाचा प्रश्न उभा राहीला. १७५६ मध्ये अब्दाली पुन्हा भारतात आला. दिल्ली काबिज केली लुटालूट, अत्याचार केले. जाताना नजीबखान रोहिल्यास मिरबक्शी बनविले.
ही सर्व हकीकत काळाल्याने दिल्ली व पंजाबवर पुन्हा वर्चस्व पप्रस्थापित करण्यासाठी पेशवा बाळाजी बाजीरावने रघुनाथ रावाला उत्तरेत पाठविले. लौकरच मराठ्यांनी दिल्लीवर ताबा मिळविला नजीबखान रोहिल्याला पकडले. पण मल्हारराव होळकर ने मध्यस्ति केल्याने नजीबला क्षमा केली. हेच पुढे मराठ्यांना महागात पडले. मराठ्यांनी पंजाब वरही नियंत्रण मिळविले. व थेट अटकेपर्यन्त मजल मारली.
मे १७६० मध्ये रघुनाथराव दक्षिणेत परतला. जिंकलेल्या प्रदेशाची नीट व्यवस्था लावण्यात आली नाही. लवकरच नजीबखानाने आपल्या मदतिसाठी अब्दालीला बोलविले. त्याप्रमाणे पंजाबमध्ये आला. त्याने तिथे साबाजी शिंदेचा पराभव करून पंजाब जिंकून घेतला. तेथून तो दिल्लीकडे निघाला त्याला रोखण्याच्या प्रयत्नात मराठ्यांचा शुर सरदार दत्ताजी शिंदे बरारीघाटच्या लढाईत मारला गेला. दत्ताजी चे “बचेंगे तो और भी लड़ेंगे” हे वाक्य मराठी माणसाच्या कापाळीच लिहिले गेले आहे.
पंजाब व दिल्ली गेल्याचे आणि दत्ताजी शिंदे पडल्याची बातमी काळाल्यावर 13 पेशव्याने सदशिवरावभाऊ च्या नेतृत्वात विशाल सैन्य उत्तरेत पाठविले. सोबत पेशव्याचा मोठा मुलगा विश्वासराव, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान गारदी हे होते. उत्तरेत त्यांना शिंदे व होळकर येऊन मिळाले. जाट आणि राजपूत यांवर मराठ्यांच्या सततच्या आक्रमनामुळे त्यांची साथ मराठ्यांना मिळाली नाही. ऑगस्ट १७६० मध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकून घेतली. ऑक्टोबर मध्ये मराठ्यांनी कुंजपुरा जिंकून घेतले. याचा फायदा घेऊन अब्दाली नदी ओलांडून अलिकडील तिरावर आला. अशाप्रकारे मराठे सैन्य आणि दिल्ली यामध्ये अब्दालीचे सैन्य आले. परिणामी मराठ्यांचा दिल्लीशी संपर्क तुटला त्यामुळे मराठ्यांना कोठुनही मदत मिळाली नाही. अन्नधान्य संपल्याने मराठा सैनिकांचे आणि जनावरांचे हाल होउ लागले. परिस्थिती पाहून सदशिवरावभाउने लढन्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पानिपतच्या रनमैदानावर मराठे आणि अब्दाली यांच्यात १४ जानेवारी १७६१ रोजी युद्ध होऊन त्यात मराठ्यांचा पराभव झाला. यदुनाथ सरकार म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्रात असे एकही घर नव्हते की ज्यातील प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नातलग युद्धात मारला गेला नाही.
मराठ्यांनी अनेक हिरे, रत्ने या युद्धात गमावली. या नंतरही थोरल्या माधव रावाच्या नेतृत्वात मराठ्यांनी दिल्लीवर वर्चस्व राखले पण या युद्धात मराठ्यांची एक कर्तुत्ववान पीढी नष्ट झाली. अब्दाली लाही या युधातुन फार लाभ झाला अस काही नाही. पण बिपिन चंद्रा यांनी लिहून ठेवले आहे त्याप्रमाणे या युद्धाचा सर्वांत मोठा परिणाम म्हणजे या युद्धाने “भारतावर कोण राज्य करणार नाही हे सिद्ध झाले.“ याच स्थितिचा फायदा इंग्रजांनी घेतला यात काही नवल नाही.
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
पानिपत तिसरे युद्ध मराठी माहिती
पानिपत लढाईची ही माहिती वाचून तुम्ही थक्क व्हाल Panipat War 3 information in Marathi पानिपतच्या पहिल्या युद्धात कोणाचा पराभव झाला Panipat War 3 information in Marathi Panipat War 3 History in Marathi
Leave a Reply