स्त्री देखील पुरुषानेएवढीच शक्तिशाली आहे पण समाजाने तिचा मनावर तु पुरुषापेक्षा अशक्त आहेस हे बिंबवल आहे. नाजुकपणा, सुंदरता, स्त्रियांसाठी आणि कणखरपणा शक्ती या गोष्टी पुरुषांसाठी हे ठरवून घेतलेलं सर्वकाही बदलाव लागेल तरच स्त्रियांवरील अत्याचार, बलात्कार थांबतील. यासाठी मुलींनी ब्युटी पार्लरला न जाता सरळ व्यायामशाळा, कराटे क्लासेस, तलवारबाजी आणि इतर आत्मरक्षणासाठी गोष्टी शिकाव्यात. Studymode Mahila Sabalikaran Sakshamikaran Information Essay Speech Nibandh Mahiti Marathi
Studymode Mahila Sabalikaran Sakshamikaran Information Essay Speech Nibandh Mahiti Marathi
महिला सबलीकरण सशक्तीकरण सुरक्षा निबंध माहिती मराठी
महिला स्त्रियांवर होणारे अत्याचार कायदा माहिती निबंध मराठी
ही स्त्री आणि पुरुष अशी लढाई नसून मानसिकता बदलाचा संघर्षकाल आहे…
महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. सारे भारतीय माझे बांधव आहोत ही प्रतिज्ञा आपण विसरलोत आणि आता माणसातला माणूस सापडत नाही. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना चौकाचौकात घडत आहेत. महिला अत्याचार कमी होणारच नाहीत का ? महिला अत्याचारांची मूळ कारणे काय ?
Studymode Essay on Womens Empowerment Women’s Safety Marathi
मुळात महिला अत्याचारांची सर्वसमावेशक व्याख्या अजून करता आली नाही . जगात स्त्रीवाद मोठ्या प्रमाणात गाजत असताना स्त्रीच्या मूलभूत प्रश्नांकडे आणि गरजांकडे लक्ष देण्याची गरज आहे. माणूस म्हणून स्त्रीच्या हक्कांची, अधिकारांची, तिच्या समाजातील स्थानाची, तिच्या क्षमतांची बाजू मांडण्याचा प्रयत्न स्त्रीवाद करतो. जगात आजही अनेक देशांतल्या स्त्रिया न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करतात.
स्त्रीला कोंडून ठेवण्याचे, तिच्या क्षमतांना दाबून ठेवण्याचे आणि तिचा उपभोग्य वस्तू म्हणून उपयोग करण्याचे प्रयत्न संपूर्ण जगभर पुरुषी वर्चस्वाने केले पण आता हे जुलमी वर्चस्व झुगारून स्त्री स्वतःला सिद्ध करत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय स्त्री आपल्या अधिकारांचा वापर करून अभिमानाने जगत आहे.
सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले ,राजा राम मोहन रॉय अशा अनेक सुधारकांनी भारतीय स्त्रीवादाची चळवळ प्रबळ केली आणि भारतीय नारी सशक्त झाली तरीही भारतीयच काय जगभरातील स्त्रीचे प्रश्न सुटले आहेत असं आपण म्हणू शकत नाही.
जेव्हा स्त्रियांच्या संदर्भात आपण जागतिक इतिहासाचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की भारतीय स्त्रीयांना तुलनेत सर्व अधिकार लवकर मिळाले. भारतीय संविधानात एकाच वेळी स्त्रियांच्या मतदानाचा अधिकार सर्वसंमतीने मान्य करण्यात आला ज्यासाठी जगातील स्त्रियांना मोठा संघर्ष करावा लागला. संविधानाने आणि कायद्याने स्त्रियांचे जगणे सुरक्षित व्हावे यासाठी अनेक कायदे केले आहेत.
Mahila Atyachar Kayda Striyanvar Honare Atyachar in Marathi
Mahila Atyachar Information Essay Speech Nibandh in Marathi
महिला स्त्रियांवर होणारे अत्याचार कायदा माहिती निबंध मराठी
- महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग (PAW)
- महिला पोलीस कक्ष (महिला सहायता कक्ष)
- बसस्थानकातील मदत केंद्र
- स्त्री भृणहत्या प्रतिबंधक उपाययोजना
- कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५
- हुंडाबळी प्रतिबंधक कायदा
याशिवाय महिलांच्या आत्मसन्मानाची रक्षा करण्यासाठी शासन अनेक उपाययोजना करत असते. सार्वजनिक जीवनात स्त्रियांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर महिलांना आपल्या बाळाला दूध पाजता यावे यासाठी विशेष हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली. खरं तर स्त्री आणि तिचा आत्मसन्मान याची पाठराखण भारतीय समाज अगदी पूर्वीपासून करत आला आहे. भारतीय सांस्कृतीच्या इतिहासात महिलांना किती मनाचे स्थान होते हे लक्षात येते पण याच धार्मिक चालीरितींचा वापर करून जेव्हा समाजाने महिलांवर अत्याचार केले तेव्हा मात्र धर्माच्या बांधनांना झुगारण्यासाठी समाजाला वेळ लागला.
आजही काही धार्मिक चालीरीती महिलांना माणूस म्हणून आणि पुरुषांप्रमाणे वागवत नाही याविरुद्ध लढा सुरू आहे.
उदा- आजही काही मंदिरात स्रियांना प्रवेश नाही. पुरुषांप्रमाणे महिला पुजारी जास्त पाहायला मिळत नाहीत.
महिला सबलीकरण सशक्तीकरण सुरक्षा निबंध माहिती मराठी
सबलीकरणादरम्यान म्हटलं जातं स्रीकडे अद्भूत शक्ती आहे. हो आहे. हे भारताच्या तेजस्वी इतिहासातून सिद्ध होतं आणि हे सुद्धा आठवतं की भारताच्या तेजस्वी राजेशाहीतील इतिहासाने स्रीच्या पुढाकाराला कधी विरोध केला नाही.
उदा- झाशीची राणी लक्ष्मीबाई. महाराणी अहिल्याबाई होळकर. इतिहासात अशी खुप उदाहरणे आहेत.
इंदिरा गांधी या देशाचा महिला पंतप्रधान होत्या.
आज बोटावर मोजण्या इतपत का होईना पण प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वीरित्या काम करत आहेत.
स्त्रीला पुरुषांप्रमाणे हक्क, समान अधिकार न मिळण्यास पुरुषांप्रमाणेच स्त्रीही तितकीच जबाबदार आहे. कारणे काहीही असोत. आजचा घडीला बोलायचे झाले तर सासू ने सुनेचा छळ करणे. सुनेने सासूला त्रास देणे. या घटनांसाठी स्त्रीही तितकीच जबाबदार आहे. स्रीभ्रूणहत्येपासून, स्रीहक्कांपर्यंत एका स्रीला स्रीच आडवी येते. मग ती आई असेल, सासू असेल किंवा इतर कुणी गुलामी चढवणारी स्रीशक्तीच!
सर्वसामान्यपणे पुरुष हा स्त्री पेक्षा जास्त शक्तिशाली आहे हा चुकीचा समज स्त्री आणि पुरुष या दोघांचा मनावर बिंबवला गेलेला आहे.
काही प्राण्यांमध्ये वस्तुस्थिती वेगळी आहे. मादी ही नारा पेक्षा शक्तिशाली आहे.
मला हेच सांगायचं आहे स्त्री देखील पुरुषानेएवढीच शक्तिशाली आहे पण समाजाने तिचा मनावर तुपुरुषापेक्षा अशक्त आहेस हे बिंबवल आहे. नाजुकपणा, सुंदरता, स्त्रियांसाठी आणि कणखरपणा शक्ती या गोष्टी पुरुषांसाठी हे ठरवून घेतलेलं सर्वकाही बदलाव लागेल तरच स्त्रियांवरील अत्याचार, बलात्कार थांबतील. यासाठी मुलींनी ब्युटी पार्लरला न जाता सरळ व्यायामशाळा, कराटे क्लासेस, तलवारबाजी आणि इतर आत्मरक्षणासाठी गोष्टी शिकाव्यात. आज या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना स्त्री मात्र फक्त शालेय शिक्षण घेते. किती मुली व्यायाम करतात? आत्मसंरक्षणाचे धडे गिरवतात बोटावर मोजण्या इतपतच उदाहरणे आहेत. महीलांवर अत्याचार होतोय हे फक्त बोंबलून काय फायदा. महिलांवर अत्याचार का होतात ? असा प्रश्न पडल्यानंतरच पर्याय सापडतील. शेवटी निसर्गाने काही रचना केलेल्या आहेत. स्त्री आणि पुरुषाला एकमेकांची गरज भासतेच.
कायदे झाले तरी मुळात मानसिकता बदलाची प्रक्रिया खूप मोठी असते. त्यासाठी व्यापक आणि वैचारिक चळवळ उभी राहावी लागते. लग्नामध्ये हुंडा देण्याची प्रथा आज कमी झाली आहे तरीही मोठे लग्न करून देण्याच्या प्रयत्नात मुलीचे बाप कर्जबाजारी झाले आहेत. आजकाल लग्न ही राजकीय शक्तीप्रदर्शनाची गोष्ट बनली आहे त्यामुळे अशा अवाढव्य खर्चाने अनेक लोक कर्जबाजारी बनतात. स्त्रीची अब्रू ही कुटुंबाची अब्रू समजली जाते. त्यामुळे तिच्या सुरक्षिततेची मोठी जबाबदारी असते. यातूनच स्त्री म्हणजे परक्याचे धन वगैरे समजूत विकसित झाली. स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायद्याने अनेकांना जेलची हवा दाखवली पण आता नवी पिढी लग्न समस्येला सामोरी जाताना दिसत आहे. लग्नासाठी मुली मिळत नाही हे वास्तव भेडसावत आहे .
विधवा स्त्रीला आजही हीन दर्जाची वागणूक मिळते. तिला सण समारंभात सहभागी करून घेतले जात नाही. तिचे असणे अशुभ मानले जाते. या सगळ्या अंधश्रद्धा झुगारण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. मासिक पाळीच्या काळात स्त्रीचे जगणे मुश्किल करणारी बंधनं लावतात. तिला वेगळे बसवतात. या अंधश्रद्धा झुगारून त्याविरुद्ध लढण्यासाठी तरुणांनी सज्ज होण्याची गरज आहे. नवरात्रीत ज्या दुर्गामतेची पूजा केली जाते त्याच दुर्गेचे जिवंत रूप म्हणून स्त्रीकडे बघितले तर कदाचित तिच्यातल्या शक्तीचा अंदाज येईल.
महिला सक्षमीकरणाच्या, सबलीकरणाच्या दृष्टीने अनेक संघटना काम करतात. शासकीय पातळीवर अनेक योजना राबविल्या जातात पण गरज आहे ती मानसिकता बदलण्याची. या मानसिकता बदलात, स्त्री ही पुरुषांपेक्षा अशक्त आहे हा समज बदलायला हवा. स्त्रीने फक्त सुंदर असाव नाजूक असाव. तिने ठराविक वस्त्रच परिधान करावेत, दागिने घालावेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रियांची संरक्षणाची जबाबदारी पुरुषांकडे असते या मानसिक गुलामगिरीतून स्त्रिया जोपर्यंत मुक्त होत नाहीत तोपर्यंत स्त्री सशक्त होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे.
-अजिंक्य दंडवते
देवदैठण, श्रीगोंदा.
मित्रांनो तुम्हाला Mahila Atyachar Information Essay Speech Nibandh in Marathi Mahila Atyachar Kayda Striyanvar Honare Atyachar in Marathi Studymode Essay on Womens Empowerment Women’s Safety Marathi ही माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा.
कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा अवश्य भेट द्या. निबंध, भाषण आणि महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
महिला सबलीकरण या विषयावर वाचनीय पुस्तक
Leave a Reply