ज्याचा रक्तातच क्रांती आणि प्रेम म्हणजे फक्त देशप्रेम! भारताचा संपूर्ण स्वातंत्र्याच स्वप्न ज्याने बघितलं अशा क्रांतिकारी भगतसिंग यांचाबद्दल महत्वपूर्ण माहिती. देशाचा स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी मार्गाची गरज आहे यावर त्यांचा विश्वास होता. Shahid Bhagat Singh Information Biography in Marathi Language
Shahid Bhagat Singh Information Biography in Marathi Language
Bhagat Singh Essay Nibandh Speech in Marathi Language
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है? वक्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमाँ! हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है?
हे गीत ऐकायला येतं तेव्हा आपल्या मनात आपसूक एका क्रांतीकाराचा चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे शहीद भगतसिंग.
क्रांतिकारी शहीद भगत सिंह माहिती जीवनचरित्र निबंध भाषण मराठी
भगतसिंग यांचा जन्म हा संशोधनाचा तर नाव हा चर्चेचा विषय आहे कारण सरकारी तारखेनुसार भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी तर तिथीनुसार १९ ऑक्टोबर १९०७ (महापुरुषांच्या जन्म तारखांमध्ये घोळ असणे आपल्यासाठी नवीन नाही. दोनही जन्मतारखांचे पुरावे आहेत.)
भगत सिंगांचा जन्म झाला याच काळात भगत सिंगांचे वडील सरदार किशन सिंह आणि चुलते सरदार अजित सिंह या दोघांची तुरुंगातून सुटका झाली म्हणून हा पुत्र भाग्यवान आहे म्हणून त्याचे नाव भगत सिंग ठेवले. त्यांचा जन्म पंजाब येथील लालनपुर जिल्ह्यातील बंगा गावी झाला. हे गाव सध्या पाकिस्तान मध्ये आहे. त्यांच्या आईचे नाव विद्यावती कौर होते.
त्यांचे वडील आणि काका हेही इंग्रज सरकारच्या विरोधात काम करत होते. भगतसिंग लहान असताना त्यांच्या काकांची पुस्तके वाचत आणि क्रांतीच्या गप्पा त्यांच्या कानावर पडत असत, ते जसजसे मोठे होत होते तस तसे त्यांच्या मनात तत्कालीन काळात जी क्रांती चालू होती ती योग्य की अयोग्य असे प्रश्न पडत होते. प्रश्न पडण्याला कारणही तसेच होते. एकीकडे सशस्र क्रांती केली तरच देश स्वतंत्र होईल अशा ठाम मताच्या चर्चा कानावर येत तर दुसऱ्या बाजूला सारा भारत ज्यांना आदर्श मानत होता, त्यांचा लढा अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा होता. याच सुमारास जालियनवाला बाग हत्याकांड झाला आणि या घटनेचा निरोप मिळताचते १२ मैल जालियनवालाबाग येथे पोहोचले, या घटनेने मात्र त्यांच्या मनावर, विचारांवर खोलवर परिणाम केला. त्यावेळी ते शाळेत शिकत होते.
Krantikari Bhagat Singh Information Biography in Marathi Language
कॉलेजात शिकत असताना भगतसिंग यांनी भरपूर वाचन केले. यामध्ये सचिंद्रनाथ संन्याल यांचे बंदी जीवन, ऑस्कर वाइल्डचे वीरा-दी निहिलिस्ट,क्रोपोटकिन यांचे मेमॉयर्स, गॅरिबाल्डी व मॅझिनी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले. लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की यांचा विचारांनी ते प्रभावित होते. क्रांतीचे विचार त्यांना झोपू देत नव्हते. अशातच त्यांनी नौजवान भारत सभेची स्थापना केली आणि त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले. त्याच सुमारास त्यांची इतर क्रांती दलांशी आणि क्रांतिकारकांशी ओळख झाली. त्यामध्ये चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू आणि इतर होते.
भगत सिंगांच्या आयुष्यात दोन महत्वपूर्ण घटनांनी त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण दिले पहिली घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड आणि दुसरी घटना म्हणजे काकोरी कांड ज्यामध्ये ४ क्रांतीकाऱ्यांना फाशी दिली आणि इतर १६ जणांना कारावासाची शिक्षा झाली, ज्यामध्ये फाशी झालेल्या क्रांतिकारकांमध्ये पं.रामप्रसाद बिस्मिल यांचा समावेश होता. या घटनेमुळे ते हादरून गेले. पं.रामप्रसाद बिस्मिल यांचा भगतसिंग यांच्यावर खूप प्रभाव होता. याचवेळी त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या दलात सामील होत एका नव्या दलाची सुरुवात केली. त्या दलाचे नाव ”हिंदुस्थान सोशलीस्ट रिपब्लिकन असोशीएशन” ठेवले.
इंग्रज त्यावेळी प्रचंड अनन्वित अत्याचार करत होते, अगदी साध्या साध्या घटनांमध्ये सामान्यांचा जीव जात होता हे भगतसिंगांना पाहावत नव्हते. “जशास तसे” प्रत्युत्तर द्यायची तयारी भगतसिंगांची होती पण “जशास तसे” प्रत्युत्तर देण्यास दलाचे इतर सदस्य तयार होत नव्हते. त्यातच एक घटना घडली सायमन कमिशनवर बहिष्कार टाकणाऱ्या आंदोलनात, अचानक येऊन इंग्रज अधिकाऱ्यांनी लाठी चार्ज सुरूर केला. आंदोलकांची धावपळ चालू होती. काही जन मात्र धीटपणे आंदोलन मोडणार नाही अशा तयारीने उभे होते काही अधिकारी त्यांच्यावरही चाल करून गेले आणि थेट डोक्यावर प्रहर करायला सुरुवात केली त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आणि नेतृत्व करणारे लाल लजपतराय हे या लाठी हल्ल्यात गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. या घटनेने भगतसिंग अस्वस्थ झाले त्यांनी ही अस्वस्थता दलातील इतर सहकार्यांशी बोलून दाखवली आणि निर्णय झाला. लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अधिकारी स्कॉट च्या हत्येचा कट रचला पण नजरचुकीमुळे भगतसिंग आणि राजगुरू यांनी एस.पी.सॉंडर्स वर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांना चंद्रशेखर आझाद, जयगोपाल आणि राजगुरू यांनी मदत केली.
१९२९ मध्ये दिल्ली येथे केंद्रीय सभ्येमधे बॉम्ब फेकला, त्यामध्ये कुठल्याच प्रकारची जीवित हानी त्यांना होऊ द्यायची नव्हती पण इंग्रजांपर्यंत त्यांचे म्हणणे पोहोचवायचे होते. या बॉम्ब फेकण्याच्या योजनेमध्येच त्यांनी हे ठरवले होते कि जी शिक्षा होईल ती मान्य परंतू गुन्हा करून मी पळून जाणार नाही. यात त्यांना अटक झाली आणि त्यांनतर भगत सिंगाना तुरुंगात ठेवण्यात आले, त्याच वेळी भगत सिंग यांनी प्रचंड लिखाण केले. लिखाणात क्रांतिकारी विचार, नास्तिकता असे एक ना अनेक विषय होते. त्यांचे लिखाण पाहता असे लक्षात येते कि त्यांना हिंदी, पंजाबी, उर्दू, इंग्रजी आणि बंगाली अशा अनेक भाषांचे ज्ञान अवगत होते.जेल मध्ये असताना त्यांनी कैद्यांचा हक्कासाठी (युरोपीय कैद्या समान वागणूक) ६४ दिवस उपोषण केले.
प्रेम आणि मृत्यूविषयी मात्र भगत सिंग यांचे अतिशय वेगळे मत होते. हा ५ फुट १० इंच असणारा तरुण म्हणाला होता, “पारतंत्र भारत मे इश्क़ करने का माहोल नाही है, हम भारत आझाद होने के बाद इश्क़ करेंगे। अगर अगला जनम है तो अगली बार करेंगे।”
एक काळ होता सशस्र क्रांती चालू झाली होती, जिथे मरण्याची स्पर्धा लावली जायची, इन्कलाब जिंदाबाद म्हणत लोक हसत हसत मरणाला सामोरे जायचे. अशा वेळी हाच तरुण म्हणायचा की हसत हसत मरणाला सामोरे जाणे योग्य नाही. आपण कस मारायचं हे आपल्याला ठरवता आला पाहिजे आणि आपल्या मरणामुळे रान पेटून उठले पाहिजे… घडलेही तसेच भगतसिंगाना फाशी होणार हे ऐकून अनेक भारतीय जेलच्या शेजारी गोळा झाले. फाशीची शिक्षा होण्यापूर्वी तीन वेळा भारतीय क्रांती दलातील आणि इतर नेतृत्वांनी फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी अपील केली परंतु भगतसिंग हे माफीनामा लिहिण्यासाठी तयार नव्हते त्यामुळे अखेर त्यांना २३ मार्च १९३१ मध्ये फाशी देण्याचे ठरले पण त्यांना साधारण ७ ते ८ तास आधी फाशीची शिक्षा देण्यात आली कारण त्यांना फाशी दिली हे कळाले तर भारतीय जनता प्रक्षुब्ध होईल आणि सशस्र आंदोलन होऊ शकते या भीतीमुळे लवकर शिक्षा दिली. या घटनेनंतर इंग्रजांबरोबर महात्मा गांधीजींसुद्धा फाशीसाठी कारणीभूत आहेत असा गैरसमज भारतीयांमध्ये झाला.
“माणूस शरीराने मेला तरी त्याचे विचार जिवंत राहतात.” असे सांगणाऱ्या भगतसिंग यांच्या विचारांची मशाल सतत पेटलेली राहील.
-विनोदकुमार एस.
-८८०५७२७३७३
-suryvinod9@gmail.com
मित्रांनो तुम्हाला क्रांतिकारी शहीद भगत सिंह माहिती जीवनचरित्र निबंध भाषण मराठी Shahid Bhagat Singh Information Biography in Marathi Language Bhagat Singh Essay Nibandh Speech in Marathi Language. Krantikari Krantiveer Bhagat Singh Yanchi Mahiti Marathi Madheही माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन अवश्य कळवा.
कॉलेज कट्टा या आपल्या आवडत्या संकेतस्थळाला या प्रकारची माहिती वाचण्यासाठी पुन्हा भेट द्या. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Chandra Shekhar Azad Information Biography in Marathi Language
Leave a Reply