सरदार वल्लभभाई पटेल भारताचे लोहपुरुष, भारताचे कर्मयोगी! Sardar Vallabhbhai Patel Information Biography in Marathi Language
Sardar Vallabhbhai Patel Information Biography in Marathi Language
सरदार वल्लभभाई पटेल भारताचे लोहपुरुष, भारताचे कर्मयोगी!
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री तसेच भारताचे पहिले उपपंतप्रधान.
एक अस नाव ज्या नावामुळे आज आपण अखंड भारतात राहत आहोत ज्यांच्यामुळे भारताचे 550 पेक्षा जास्त तुकडे होण्यापासून वाचले आणि अखंड भारत निर्माण झाला. मवाळ पण प्रसंगी तितकेच जहाल व्यक्तीमत्व. एक मुत्सद्दी आणि अत्यंत हुशार असा राजकारणी.
भारताचा एक सच्चा देशभक्त, सरदार ही जनतेने दिलेली पदवी ज्यांना यथार्थ शोभते असं व्यक्तिमत्त्व म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल!
Sardar Vallabhbhai Patel Information Biography in Marathi Language
सरदार वल्लभभाई पटेल यांचे बालपण
जन्म-31 ओक्टोबर 1875
सरदार पटेलांचा जन्म गुजरात मध्ये झाला. पटेलांच प्राथमिक शिक्षण नाडीयाड, पेटलाड आणि बोरसाड मध्ये झाले. पटेल लहानपणापासूनच स्वकर्तुत्वाने शिकत आले होते त्यांनी त्यांची मॅट्रिकची परीक्षा वयाच्या 22 व्या वर्षी पास केली. पटेलांना लोक नाव ठेवत की त्यांच्या आयुष्याचे ध्येय ठरलेलं नाही हा काहीच करू शकणार नाही पण पटेलांनी ठरवलं होतं की त्यांना वकील व्हायचं आहे म्हणून!
त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी पैसे साठवले आणि ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले तिथे त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले तेही 2 वर्षातच. पटेलांनी त्यांच्या वकिलीचे प्रॅक्टिस गोध्रा आणि बोरसाड मध्ये केली.
ज्याप्रमाणे गांधीजींना त्यांच्या वकिलीचा क्षेत्रात नाव कमावता आले नाही त्याप्रमाणे पटेलांच नाही झालं पटेल एक नावाजलेले वकील झाले.
त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावरून sanitation commissioner of Ahemadabad 1917 रोजी निवडले गेले.
Sardar Vallabhbhai Patel Essay Speech in Marathi Language
महात्मा गांधींशी भेट
1917 मधेच त्यांची गांधींशी भेट झाली आणि तेथूनच पटेलांच आयुष्य बदलून गेले आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्याचे ठरवले.
गांधींमुळेच पटेल गुजरात सभेचे सेक्रेटरी झाले. पटेलांनी खेडा सत्याग्रहात गांधींसोबत भाग घेतला.
या सत्याग्रहादरम्यान पटेल गावागावात फिरले आणि लोकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. याच दरम्यान पटेल एक नायक म्हणून गुजरात मध्ये उदयास आले.
1920 मध्ये त्यांची निवड नवीनच स्थापन झालेल्या गुजरात प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षतेपदी निवड झाली ते 1945 पर्यंत अध्यक्षपदी राहिले यावरून त्यांची लोकप्रियता किती होती हे समजते.
गांधीजींच्या असहकार आंदोलनात पटेलांनी सक्रीयतेन भाग घेतला त्यांनी संपूर्ण देश पिंजून काढला आणि 3 लाख लोकांना घेऊन 1.5 कोटींपेक्षा जास्त निधी जमवला. त्यांनी विदेशी कपड्यांचा पूर्ण त्याग केला आणि त्यांनी पूर्ण खादी स्वीकारली.
पटेलांनी फक्त स्वातंत्र्य चळवळीतच नाही सहभाग घेतला तर त्यांनी दारूबंदी, जातीभेद आणि अस्पृश्य त्याविरुद्ध पण लढा दिला.
पटेल 1922, 1924 आणि 1927 साली अहेमदाबाद नगर पालिकेचे अध्यक्ष झाले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक जनतेच्या हिताची कामे करण्यावर भर दिला.
1927 साली भयंकर पाऊस झाला आणि खेडा मध्ये आणि अहेमदाबाद मध्ये पुराणे थैमान घातले तेव्हा
पटेलांनी लोकांसाठी अन्न आणि औषधांची उपलब्धता करून दिली त्यांनी सर्व परिस्तिथी अत्यंत नियोजनाने हाताळली.
जेव्हा गांधीजींना अटक झाली होती 1923 साली तेव्हा नागपूरच्या सत्याग्रहाचे नेतृत्व करण्यासाठू पटेलांना बोलावण्यात आले.
एप्रिल 1928 साली पटेल देशसेवेसाठी परत आले आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत परत त्यांचे योगदान चालू झाले.
त्यांनी बरडोली सत्याग्रह केला खेडा सारखीच परिस्तिथी होती किंबहुना त्यापेक्षा जास्त कर आकारला होता सरकारने बरडोलीवर तेव्हा पटेलांनी त्यारुद्ध आवाज उठवला एक सेनापती सारखे पटेल सर्वांना मार्गदर्शन करत राहिले तेव्हापासूनच पटेलांना लोकांनी “सरदार” ही पदवी बहाल केली.
दांडी यात्रेदरम्यान ही पटेलांना अटक झाली.
सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती निबंध भाषण आत्मचरित्र विचार मराठी
1931 साली त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली पटेल गांधींना मोठा भाऊ मानत असत.
जेव्हा दोघांना 1932 मध्ये अटक झाली आणि त्यांना येरवडा मध्ये तुरुंगात ठेवण्यात आले तेव्हा ते एकमेकांच्या अजूनच जवळ आले आणि विचारांची अजूनच आदानप्रदान झाली गांधीजींनी पटेलांना संस्कृत शिकवली.
जेव्हा नेहरू, राजगोपालाचारी आणि मौलाना आझाद गांधीजींच्या भारत छोडो च्या निर्णयाच्या विरोधात होते तेव्हा पटेल गांधींसोबत होते.
पटेलांची भावुक भाषणे लोकप्रिय होत होती पटेल आता लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई मध्ये 1 लाख लोकांपुढे पटेलांनी भाषण दिले या भाषणाने लोकांच्या अंगात एक ऊर्जा निर्माण झाली. आता आपल्याला स्वातंत्र भेटणार अशी खात्री लोकांना वाटू लागली.
1946 साली 15 राज्य काँग्रेस कमिटीने सरदार पटेलांना अध्यक्ष म्हणून निवडले होते 12 जणांनी पटेलांच्या बाजूने मतदान केले तर उरलेल्या तिघांनी कोणालाच मतदान केले नाही गांधींनी सुचवलेल्या नेहरूंना एकानेही मतदान केले नाही हे विशेष.
गांधीजींनी नेहरूंना सांगितले की कोणीही तुम्हाला पाठिंबा देत नाही पण नेहरूंनी सांगितले की मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही म्हणून मग पटेलांना अध्यक्षपद सोडावे लागले नेहरूंसाठी गांधीजींच्या विनंतीवरून.
सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती निबंध भाषण आत्मचरित्र विचार मराठी
16 मे 1946 रोजी इंग्रज सरकारने प्रस्ताव ठेवला मुस्लिम लीगच्या मागणी नुसार पाकिस्तान आणि 562 जी संस्थाने होती त्यांना स्वतंत्र राहायचं की भारतात नाहीतर पाकिस्थान मध्ये जायचं या प्रस्तावाला गांधींचा विरोध होता पण पटेलांच म्हणणे होत की 1946 साली काँग्रेस ने सरकार स्थापन नाही केलं तर मुस्लिम लीग सरकार स्थापन करेल आणि ते देशहिताचे नाही.
पटेलांनी नेहरू, राजगोपालाचारी आणि राजेंद्रप्रसाद यांची मने वळवली आणि इंग्रज सरकारने काँग्रेसला नेहरूंच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्यासाठी आमंत्रित केले. पटेलांना गृहखाते मिळाले सरदार पटेल हे पाहिले नेते होते ज्यांनी देशाची फाळणी मान्य केली होती. पटेलांच्या गृह खात्याने भारतात होणाऱ्या हिंसाचाराला लगाम लावला. काँग्रेस बरोबर इंग्रजांना पण वाटत होते पटेल असे एकच व्यक्ति आहेत जे संस्थानांना भारतात घेऊ शकतात.
गांधीजी पटेलांना बोलले होते संस्थानांचा प्रश्न अवघड आहे आणि तो फक्त तुम्हीच सोडवू शकता यावरून पटेलांची मुत्सद्देगिरी दिसून येते. पटेलांनी संस्थानांसोबत भेटीगाठी बोलणं चालू केले. त्यांचा उजवा हात म्हणून ओळख निर्माण झालेल्या मेनन यांची त्यांना साथ लाभली.
जवळजवळ 562 संस्थाने फक्त पटेलांमुळे भारतात सामील झाली तरी अजून प्रश्न सुटला नव्हता अजून 3 संस्थाने भारतात सामील झाली नव्हती जम्मू काश्मीर, हैरदाबाद आणि जुनागढ ही ती 3 संस्थाने होती.
जुनागढचे संस्थान पटेलांसाठी महत्वाचे होते कारण ते त्यांच्या मातृभूमीत गुजरात मध्ये येत होते जुनागढचा नवाब हा शाह नवाज भुट्टो यांच्या दबावाखाली होता नावबाने पाकिस्तानच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा पटेलांनी भारतीय सेना पाठवली आणि तो प्रदेश भारतात सामील करून घेतला.
Sardar Vallabhbhai Patel Wikipedia in Marathi language
हैद्राबाद सर्वात मोठे संस्थान होते त्यात फक्त हैद्राबाद होते असे नाही तर त्या संस्थानात तेलंगणा, आंधरप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र असे प्रदेश मोडत होते त्यामुळे हा भाग भारतात सामील होणं हे महत्वाचे होते. त्याचा निजाम मुस्लिम होता पण 80% लोक हे हिंदू होते. निजामाला स्वातंत्र्य राहायचं होत नाहीतर पाकिस्थान सोबत जायचं होतं हा भारतासाठी मोठा धक्का होता. पटेलांनी बोलून हा प्रश्न सोडवायचा ठरवलं पण काहीच उपयोग झाला नाही मुस्लिम जे रझाकार म्हणून ओळखले जात होते ते निझामाशी कट्टर होते. बोलून काही प्रश्न सुटत नाही हे दिसल्यावर पटेलांनी भारतीय सैन्याला पाचारण केले तेव्हा नेहरू युरोपच्या दौऱ्यावर होते आणि रझाकार मारले गेले पण हैद्राबाद भारतात सामील झाला ऑपरेशन पोलो अस ह्या मिशनच नाव ठेवण्यात आले होते.
पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने काश्मीर पण भारतात सामील करून घेतला. तरी पण काश्मीरचा प्रश्न सुटला नाही काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेणं हे पटेलांना अजिबात मान्य नव्हते.
पटेल हे नेहरूनपेक्षा एक लोकप्रिय नेते होते फक्त लोकांमध्येच नाही तर काँग्रेस मध्ये पण नेहरूनपेक्षा जास्त पटेलच पंतप्रधान व्हावे असे वाटत होते पण गांधीजींना वाटत होते नेहरू पंतप्रधान व्हावे म्हणून पटेलांनी गांधींमुळे आपले नाव मागे घेतले.
जेव्हा गांधींचा मृत्यू झाला तेव्हा पटेलांना हृदयाचा झटका आला कारण गांधींना पटेल आपले गुरू आणि मोठा भाऊ मानत होते. गांधीजींच्या हत्येनंतर पटेल आणि त्यांच्या गृहखात्यावर खूप टीका झाली. पटेलांनी आपला राजीनामा नेहरूंकडे दिला आणि आपण राजकारणात राहणार नाही असे सांगितले पण नेहरू आणि राजगोपालाचारी यांनी पटेलांना समजवल आणि जनतेने पण पटेलांची बाजू घेतली. 1950 मध्ये पटेलांनी तब्येत खूपच बिघडायला लागली. त्यांना 15 डिसेंबर 1950 रोजी दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि मुंबई मध्ये त्यांचं निधन झाले.
1991 मध्ये भारत सरकारने पटेलांना “भारतरत्न” देऊन त्यांचा सन्मान केला. सरदार पटेल अस एक व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे देशाचे असंख्य तुकडे होण्यापासून वाचले.
अत्यंत मुत्सद्दी राजकारणी पण महत्वाकांक्षी नाही आणि त्यामुळेच स्वतःला पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा असून पण आपले नाव मागे घेतले. एक अस नाव ज्याने पहिल्यापासून फाळणीला पाठिंबा दिला. अत्यंत कणखर असे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने भारताचे लोहपुरुष.
अश्या या लोहपुरुषाला मानाचा मुजरा.
अक्षय जाधव
कडूस राजगुरूनगर.
मित्रांनो Sardar Vallabhbhai Patel Information Biography in Marathi Language Sardar Vallabhbhai Patel Essay Speech in Marathi Language सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती निबंध भाषण आत्मचरित्र विचार मराठी
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. या प्रकारची महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी “College Catta” या आपल्या आवडत्या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या.
“College Catta” म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
सरदार वल्लभभाई पटेल भारताचे लोहपुरुष यांचाबद्दल वाचनीय पुस्तके
Leave a Reply