स्वराज्याची पहिली राजधानी…गडांचा राजा राजगड अभेद्देतेचे दूसरे रूप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम, नेढे अशी वैशिष्ट्ये असलेला एकमेव गड म्हणजे राजगड… Rajgad Fort information in Marathi language
Rajgad Fort information in Marathi language
राजगड
राजगड म्हणजे महाराजांच्या आयुष्यातील सुरूवातीच्या कालखंडाचा साक्षीदार होय. अभेद्देतेचे दूसरे रूप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम, नेढे अशी वैशिष्ट्ये असलेला एकमेव गड म्हणजे राजगड.
स्वराज्याची राजधानी अस ऐकल्यावर आपसूकच आपल्या तोंडून रायगड हेच नाव येते. पण स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान मिळाला तो राजगडाला. गडांचा राजा म्हणजे राजगड.
Rajgad Fort History in Marathi
‘राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्यांचा विस्तार! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता.
जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्र पशु दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होउन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगरांची रांग. त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठिण होते”.
महेमद हाशिम खालीखान याने ‘मुन्तखबुललुबाबएमहेमदॉशाही ‘ नामक ग्रंथामध्ये राजगडाबड्डल वरील ओळी लिहिल्या आहेत.
स्वराज्याची पहिली राजधानी माहिती
साकी मुस्तैदखान आपल्या मासिरे आलमगीरे नावाच्या ग्रंथात लिहितो ‘राजगड अतिशय उंच त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यांत तो सर्वश्रेष्ठ असा म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मज़बूतीची तर कल्पनाच करवत नाही. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातुन आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय कोणी फिरकु शकत नाही. तेथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते बाकी कोणी तेथे जाऊ शकत नाही. यावरून या गडाची किती दहशत होती याचा प्रत्यय आपणास आलाच असेल.
बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नीरा वेळवंडीका नदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्यांच्या बे्चक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.
इतिहासातून येणार्या उल्लेखांवरुन सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वी पासूनचा हा डोंगर आहे.
ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरुन डोंगर फार पुरातन आहे हे समजते. राजगडाचे पूर्वीचे नाव होते “मुरंबदेव”.हा किल्ला बहामनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.
इ.स.१४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरूंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाहीत. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहात होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरुमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला.
इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला.
सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठ्या झपाट्याने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या, त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली.
इ.स.१६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती. ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली. परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही.
६ एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर परतले. सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली, परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरुन विलक्षण मारा केल्यामुळे मुगलांना माघार घ्यावी लागली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वत:कडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरुप पोहोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले.
सन १६७१- १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी राजगडावरुन रायगडाकडे हलविली.
या प्राचिन किल्ल्याने तब्बल 26 वर्षे स्वराज्याच्या राजधानीचा मान मिरवला.
-अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
Rajgad Fort information in Marathi language राजगड किल्ला माहिती मराठी
स्वराज्याची पहिली राजधानी माहिती
Rajgad Fort Essay Speech in Marathi
राजगड किल्ला निबंध भाषण मराठी
Rajgad Fort History in Marathi
Leave a Reply