राजर्षी शाहू महाराज यांचा बद्दल निबंध भाषण इतिहास माहिती मराठी मध्ये Rajarshi Shahu Maharaj Information Biography Essay in Marathi Language
Rajarshi Shahu Maharaj Information Biography Essay in Marathi Language
Shahu Maharaj Speech History in Marathi Language
आज सगळीकडे अस ऐकायला भेटतय आम्ही फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे आहोत.
ते खरेच असतात का तो खर तर संशोधनाचा विषय आहे पण महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राकडे नेणारे एक नाव म्हणजेच “राजर्षी शाहू महाराज”.
म.फुल्यांचा वारसा आणि त्यांचे कार्य सक्षमपणे पुढे चालवणारे शाहू महाराज.
राजकीय दृष्ट्या मवाळ पण सामाजिक दृष्ट्या जहाल व्यक्तिमत्व असणारे राजे म्हणजेच शाहू महाराज.vशिवाजी महाराज ते शाहू या थोर परंपरेत बसणारा एक रयतेचा राजा.
सत्येचा वापर अश्या सामाजिक क्रांतीसाठी केला जरी आज ते घडून 100 वर्षे गेलेली असली तरी सामाजिक क्रांतीचा जनक स्वतः असलेला राजा.
आज सम्पूर्ण देशात बहुजनांची जे आराध्य दैवते आहेत त्यामध्ये शाहू महाराजांचा समावेश होतो.
महाराष्ट्राचा एक थोर समाज सुधारक. सर्वात महत्वाचे म्हणजे या भारत देशातील आरक्षणाचे खरे जनक म्हणजेच “राजर्षी शाहू महाराज”.
Rajarshi Shahu Maharaj Information Biography Essay in Marathi Language
भारताचे “अब्राहम लिंकन” असे ज्यांना संबोधले जाते ते शाहू महाराज.
शाहू महाराज हे असे राजे होते की जे समाजसुधारक होते. त्याच शाहू महाराजांचा हा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करत आहे.
शाहूराजा फक्त मराठा नव्हता, ब्राम्हणेतरही नव्हता तो नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता. तो महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा स्वाभाविक तरंग होता हे जास्त खरे.
शाहू महाराज यांचे बालपण
शाहूंचे मूळ नाव यशवंत. जन्म 26 जून 1874 मध्ये कागलचे जहागीरदार व कोल्हापूरचे संस्थानचे रिजंट आबासाहेब घाटगे यांच्या पोटी झाला.
कोल्हापूचे राजे चौथे शिवाजी यांच्या म्र्युत्यूनंतर कोल्हापूरच्या गादिला कोणी वारस नव्हता म्हणून महाराणी आंनदीबाईंनी त्यांना दत्तक घेतले.
1884 मध्ये दत्तक विधी झाला त्यांनतर राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले.
फ्रेजर या इंग्रजी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले. शाहू हे शरीराने धिप्पाड होते उंची 5 फूट 11 इंच होती.
1891 मध्ये 17 वर्षाचे असताना बडोद्याचे गुनाजीराव खानविलकर यांची मुलगी लक्ष्मी हिच्याशी विवाह झाला.
2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्याभिषेक विधी झाला. तेव्हापासून मृत्यूपर्यंत 6 मे 1922 या 28 वर्षांच्या कालावधीत ते कोल्हापूरचे राजे होते.
कानपुर येथील अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय जातीय परिषदेत 1919 मध्ये शाहू महाराजांना “राजर्षी” ही पदवी दिली होती.
Shahu Maharaj Speech History in Marathi Language
शाहू महाराजांच्या काळात वेदोक्त प्रकरण खूप गाजले होते. या प्रकारणानेच सत्यशोधक चळवळ जिवंत ठेवली असे काही लोक मानतात. वेदोक्त प्रकरणी टिळकांनी शाहूंना विरोध केल्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झाला होता. ऑक्टोबर 1889 मध्ये जेव्हा राजा शाहू त्यांचे बंधू आणि इतर लोक जेव्हा पंचगंगेवर स्नानासाठी गेले असता नारायण भटजी या शाहूंच्या पुरोहिताने पुराणोक्त मंत्र म्हटले. येथूनच वेदोक्त प्रकरण उदभवले.
स्नान करताना नारायण भटजी हे पुराणोक्त मंत्र म्हणत आहेत याकडे राजारामशास्त्री भागवत यांचे लक्ष वेधले. शाहूंनी त्यासंदर्भात विचारणा केली असता नारायण भटजी त्यांना बोलले की “आपण शूद्र आहात आणि शूद्रांनीच पुराणोक्त मंत्र म्हणायचे असतात ” पण “आपण शूद्र नाहीतर क्षत्रिय आहोत असे शाहूंनी म्हटले”. परंतु त्यांचा आश्रित नारायण भटजीने ” ब्राम्हण वर्ग जोपर्यंत तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही तोपर्यंत तुम्ही शुद्रच आहात” अशी भूमिका घेतली.
आपण क्षत्रिय असल्यामुळे घरातील सगळे विधी वेदोक्त पद्धतीने व्हावेत अस शाहू महाराजांचं म्हणणं होते.
छत्रपती घराण्याचे धार्मिक विधी करण्यासाठी आप्पासाहेब राजोपाध्यय यांना 30,000 रु. इनाम म्हणून मिळाला होता. नोव्हेम्बर 1901 मध्ये राजघराण्यातील सगळे विधी वेदोक्त पद्धतीने करावे असे फर्मान शाहूंनी काढले त्याला नारायण भट आणि आप्पासाहेब या दोहोंनी विरोध केला. शाहूंनी त्यांचा इनाम जप्त करून घेतला त्यांना नोकरीवरून काढून टाकले आणि वतनही रद्द केले.
आपल्या या निर्णयाचा परत विचार करावा असा अर्ज अप्पासाहेबांनी शाहूंकडे केला शाहूंनी तो फेटाळला. टिळकांनी 22 व 29 ऑक्टोबर 1901 ला केसरीत लेख लिहून शाहूं वर टीका केली.
शाहूंनी राजोपाध्ये यांच्या जागी तात्याराव जोशी यांची राज्याचा उपाध्याय म्हणून 250 रुपये वेतनावर नियुक्ती केली. वेदोक्त प्रकरणी शेवटी शाहूंचा विजय झाला. त्यांचे क्षत्रियत्व मान्य झाले.
राजर्षी शाहूंनी आपले विचार सुत्ररूपाने ग्रंथबद्ध केले नाहीत ते त्यांच्या भाषणांतून, पत्रांतून शोधावे लागतात.
ते मूलतः सामाजिक तत्त्वचिंतक नव्हते तर ते समाजसुधारक होते. 1896 मध्ये दुष्काळ पडला तेव्हा राजर्षी शाहूंनी सर्व जातीधर्माच्या मुलांसाठी वसतिगृह चालू केले तेथे फक्त 2 रुपये दराने भोजन मिळे.
केवळ गरिबीमुळे कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये प्रत्येक जातीला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे साधन आहे असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी कोल्हापूर शहरात एकूण 23 वसतिगृह बांधली कोल्हापूर शहराला “Mother of Student’s Hostel” अस नाव मिळाले.
2 एप्रिल 1984 रोजी शाहुंनी राज्यकारभार हाती घेतला तेव्हा कोल्हापूर संस्थानाची लोकसंख्या 9 लक्ष होती. एकूण प्राथमिक शाळा 224 होत्या. तर विद्यार्थी 15000 होते. पण त्यांपैकी जास्त उच्यवर्णीयच होते. उच्यशिक्षण देणारे राजाराम महाविद्यालय होते पण तिथे पण 61 पैकी 55 ब्राम्हण होते.
25 जुलै 1917 ला त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा निर्णय घेतला आणि जे पालक मुलांना शाळेत पाठवत नाहीत त्यांच्याकडून 1 रु दंड आकारला. देवालय बांधताना शेजारी शाळेच्या खोल्या देखील बांधाव्यात हा नियमच होता.
गाव तेथे शाळा हा उपक्रम राबवला. 1920 मध्ये 420 शाळा व 22000 विद्यार्थी शिक्षण घेत होते.
अस्पृशयांच्या शिक्षणाची त्यांना गरज वाटे त्यासाठी देखील त्यांनी उपाययोजना केल्या त्यांनी अस्पृश्यांच्या शाळांची संख्या 5 वरून 27 केली.
खाजगी खर्चातून 3 व सरकारी खर्चातून 4 अशी ऐकून 7 वसतिगृह बांधली. अस्पृश्यांना फी माफीची सवलत त्यांनी दिली. प्रत्येक अस्पृश्य विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती देण्याची सुरुवात त्यांनी केली.
वकील, डॉक्टर हे व्यवसाय फक्त उच्यवर्गात मर्यादित राहू नयेत असे त्यांना वाटत होते. जातीवाचक आडनावे बदलण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. महार वतन पद्धत कायद्याने बंद केली.
गंगाराम कांबळे या महार व्यक्तिला कोल्हापुरात हॉटेल चालवायला त्यांनी आर्थिक मदत केली. ते स्वतः त्या हॉटेल मध्ये चहा, फराळ घेत असत. खुद्द राजाच असे वागू लागल्याने अस्पृश्यतेची दाहकता कमी झाली हे नक्की.
कोल्हापूरच्या नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी दत्तोबा पोवार या दलितास दिले होते. शिक्षण, आरोग्य वा इतर कोणत्याही सरकारी खात्यांत अस्पृश्यता पाळू नये असा नियमच होता कोल्हापूरचे भवानी मंदिर त्यांनी अस्पृश्यांना खुले केले.
1902 मध्ये कोल्हापूर संस्थानांतील सरकारी नोकरीत 50% जागा राखून ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय शाहू महाराजांनी घेतला.
जी गोष्ट मंडल आयोगाने 1986 मध्ये केली ती कोल्हापूर संस्थानात 84 वर्षे आधी शाहू महाराजांनी लागू केली हा त्या काळी क्रांतिकारक निर्णय होता आणि शाहू महाराज किती पुरोगामी विचार करणारे होते याची प्रचिती येते. खानदानी मराठे जातिभेद टिकवतात असा त्यांचा आक्षेप होता. पंचकुळी, सप्तकुळी, 96कुळी हे मराठ्यांतील वर्गीकरनच त्यांना मान्य नव्हते.
शाहू महाराज हे इंग्रज धार्जिन होते असा काही लोक आरोप करतात आता शाहू महाराजांनी ज्या सुधारणा केल्या त्यामुळे ज्यांचं नुकसान झालं ते लोक काही पण बोलणारच ही काही सांगण्याची गोष्ट नाही. भारत ब्रिटिशांच्या कायम गुलामगिरीत राहावा अस त्यांनी कधीही म्हटलं नाही.
शिवाजी क्लब या कोल्हापुरातील क्रांतिकारक संस्थेला ते दरवर्षी 500 रुपयांची मदत करीत होते. क्रांतिकारकांनी काढलेल्या “वनिता वस्त्र भांडार” मधून ते दरवर्षी संस्थानाची सरकारी कापड खरेदी करी. शाहू महाराज क्रांतीकारकांना मदत करत असे टिळकांचे पुत्र श्रीधरपंत बोलतात.
शिवाजी क्लब या संस्थेची मूळ अस्सल कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यावरून शाहूंचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदान स्पष्ट होते. ते उघडउघड भाग घेऊ शकत नवते कारण त्यांचं संस्थान खालसा झाले असते आणि त्यांना त्यांच्या सुधारणा पण करता आल्या नसत्या.
टिळकांचे आणि त्यांचे फक्त दाखवण्यापूरते मतभेद होते का आणि टिळकांना त्यांनी मदत केली होती का हा सखोल अभ्यासाचा विषय आहे त्यावर अभ्यास न करता बोलणं उचित ठरणार नाही.
“आम्हास स्वराज्य पाहिजे पण त्या स्वराज्यास आम्ही पात्र नाही स्वराज्यास पात्र होण्यासाठी आधी जातीभेद झुगारून दिले पाहिजेत मागासपणा सोडून दिला पाहिजे” असे ते बोलत असत.
कोल्हापूर संस्थानात शाहूंनी पाटबंधारे योजना हाती घेतल्या होत्या.
राधावाडी, कळम्मावाडी धरणांची कामे हाती घेतली होती विहिरी व पाझर तलावांची कामे हाती घेतली होती. कृषीविषयक शिक्षणाची सोय केली होती सुधारित पद्दतिने शेती करण्याचा ते सल्ला देत असत.
चहा, कॉफी, ऊस लागवडीवर त्यांनी भर दिला. संस्थानातील शेतकऱ्यांना 1 लक्ष 24000 रु. ची कर्जे दिली शेतीला सुधारित अवजारे दिली. शेतकऱ्यांनी शेतीस पूरक म्हणून दुग्धपालन, कुक्कुटपालन करण्याचा त्यांनी सल्ला दिला.
1912 मध्ये कोल्हापूर संस्थानात सहकार कायदा पास केला आजही महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी संस्था कोल्हापुरातच आहेत.
1897 मध्ये दुष्काळ पडला तेव्हा धान्याचे भाव खूप वाढले होते पण योजना आखून कृत्रिम धान्य टंचाई व भाववाढ यांची प्रभावी उपाययोजना केली.
दुष्काळ प्रसंगी म्हैसूरवरून धान्य आणल्याची नोंद आहे.
दुष्काळप्रसंगी नविन विहिरी तयार करणे, जुन्याची दुरुस्ती करणे, नद्यांवर बंधारे बांधून श्रमिकांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले.
1899 च्या दुष्काळात संपूर्ण देशात 10 लक्ष माणसे मरण पावली पण कोल्हापूर संस्थानात मात्र एकही भूकबळी पडला नाही याचे सर्व श्रेय राजर्षी शाहूंना आहे.
त्यांच्या जीवनात अनेक दुःखाचा त्यांनी सामना केला त्यांचा पुत्र प्रिन्स शिवाजी हा डुकराची शिकार करताना घोड्यावरून पडून मरण पावला. त्यांची विधवा सून इंदूमतीला त्यांनी शिक्षण दिले व सांभाळ केला. पत्नी लक्ष्मीबाई सतत आजारी असत मधुमेहाच्या आजाराने पूर्ण शरीर पोखरले होते त्यांच्या विवाहित मुलीसही सासरी सुख नव्हते त्या कोल्हापुरातच राहत होत्या त्यांचा दुसरा पुत्र राजाराम याच्यात फारशी धमक नव्हती. एक कन्या लहानपणीच वारली होती पण या सर्व दुःखाचा त्यांनी सामना केला होता.
या परिस्थितीत औषध म्हणून थोडेसे मद्य घेण्याचे डॉक्टरांनी सुचवले होते तेव्हा “मद्य घेण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन” असे त्यांनी म्हटले होते आजच्या तरुण पिढीला ह्या वाक्याची उजळणी करण्याची खूप गरज आहे असं वाटतंय.
शाहू महाराजाना अनेक छंद होते ते स्वतः कुस्ती खेळत. प्राण्यांशी झुंज देत. पैलवानांना ते खुराक देत, गावोगावी तालमी,आखाडे स्थापण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
त्यांनी अनेक नामवंत पैलवान तयार केले त्यांच्यामुळे कोल्हापूर मल्लविद्येचे केंद बनले.
आपल्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत कोल्हापूर शहराला त्यांनी “कलापूर” बनविले. 1894 ते 1922 ही त्यांची 28 वर्षांची कारकीर्द कोल्हापूर संस्थनालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला कलाटणी देणारी ठरली.
अनेकांनी शाहूंच्या चरित्रसंबंधी ग्रंथरूपाने खूप काही लिहून ठेवले आहे.
डॉ.आंबेडकरांनी “राजर्षी शाहू हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत” असे म्हटले होते.
प्रा.शेषराव मोरे त्यांना “ब्राम्हणशाहीला शह देणारा हिंदु सुधारक” असे म्हणतात. असे शाहू महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे आणि महाराष्ट्राच्या समाजसुधारनेच्या भव्य परंपरेचे फुल्यांचे खऱ्या अर्थाने वारसदार होते असच म्हणावं लागेल.
अश्या या महाराष्ट्राच्या “अब्राहम लिंकन असणाऱ्या शाहूंना” मनाचा मुजरा..
अक्षय जाधव
कडूस राजगुरूनगर.
Rajarshi Shahu Maharaj Information Biography Essay in Marathi Language Shahu Maharaj Speech History in Marathi Language शाहू महाराज माहिती निबंध भाषण इतिहास मराठी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा या आपल्या आवडत्या संकेत्थाळला पुन्हा आवश्य भेट द्या.
Leave a Reply