ज्यांचे काव्य दोन देशांचे राष्ट्रगीत आहे असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. साहित्य, कला आणि शैक्षणी क्षेत्रामधील त्यांचे कार्य अद्वितीय आहे. गुरुदेव रवींद्रनाथ यांच्याबद्दल जाणून घ्या… Rabindranath Tagore information Biography in Marathi रवींद्रनाथ टागोर माहिती निबंध भाषण मराठी
रविंद्रनाथ ठाकूर (टागोर)
रवींद्रनाथ टागोर मराठी कविता
होंगे कामयाब
हम होंगे कामयाब एक दिन मन में है विश्वास, पूरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन।
हम चलेंगे साथ-साथ डाल हाथों में हाथ हम चलेंगे साथ-साथ, एक दिन
मन में है विश्वास, पूरा है विश्वास हम चलेंगे साथ-साथ एक दिन।
वरील कविता आपण लाहणपनापासुन ऐकत आलोय शाळेत गात आलोय उत्स्फूर्त चैतन्य मनात जागवनारी वरील कविता आहे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची.
Rabindranath Tagore Essay Speech in Marathi
प्रतिभाशाली साहित्यामुळे जागतिक पातळीवरील नोबेल पारितोषिक ज्यांना मिळाले, त्या रविंद्रनाथ टागोरांचे नाव भारतातल्या प्रत्येक घराघरात माहीत आहे. त्यांचा गीतांजली हा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे. भारतात जे थोर महापुरुष होऊन गेले, त्यात जागतिक किर्तीचे महाकवी, तत्वज्ञ, साहित्यिक आणि नवीन शिक्षणपध्दतीचे प्रवर्तक म्हणून रविंद्रनाथ टागोरांचे नाव घेतले जाते, रविंद्रनाथांचे सर्व वाङ्मय हे ४० खंडांमध्ये प्रसिध्द झालेले आहे. रवींद्रनाथ टागोर केवळ कवी नव्हते तर थोर साहित्यिक, कथाकार, गीतकार, संगीतकार, नाटककार, निबंधकार, चित्रकार, थोर विचारक, आणि मार्गदर्शक देखील होते. ते विलक्षण प्रतिभेचे धनी होते, त्यांना गुरुदेव संबोधण्यात येत असे. भारताचं राष्ट्रगान हे आपल्याला रवींद्रनाथ टागोरांचं देणं आहे. बालपणापासून कविता, गोष्टी, लिहिण्याची त्यांना विलक्षण आवड होती. निसर्गाविषयी प्रचंड ओढ होती, कित्येकदा निसर्गाचे अवलोकन करतांना ते इतके तल्लीन होऊन जात व आपल्या कल्पना विश्वात रममाण होत असत. भारताच्या या महान साहित्यिकाने स्वातंत्र्य समरात राष्ट्रीय चेतनेला आकार देण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली.
रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार कधी मिळाला ?
- 1913 साली रवींद्रनाथ टागोर यांना आपल्या ‘गीतांजली’ या काव्य संग्रहासाठी साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नोबेल पुरस्कार विजेते भारतीय
- हा पुरस्कार प्राप्त करणारे एशियातील ते पहिले व्यक्ती ठरले. पश्चिमी संस्कृतीचा भारताला परिचय आणि भारताची सर्वोत्कृष्ट प्रतिमा पश्चिमी देशांपुढे मांडण्यात टागोरांचा मोठा वाटा आहे.
- त्यांना भारतातील असामान्य सृजनशील कलाकार देखील मानल जातं.
Rabindranath Tagore information Biography in Marathi
रवींद्रनाथ टागोर माहिती निबंध भाषण मराठी
रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कधी झाला ?
थोर विचारक आणि मार्गदर्शक रवींद्रनाथ टागोर विलक्षण प्रतिभेचे धनी होते. कोलकाता येथील ठाकुरवाडीत एका प्रसिद्ध आणि समृद्ध कुटुंबात 7 मे 1861 ला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर ब्रम्हो समाजाचे वरिष्ठ नेता होते. कुटुंब प्रमुख आणि रवींद्रनाथ यांचे वडील अत्यंत प्रामाणिक आणि चांगल्या तऱ्हेने सामाजिक जीवन जगणारे व्यक्तिमत्व होते.
रवींद्रनाथ टागोर यांच्या आईचे नाव काय होते ?
त्यांची आई शारदादेवी ह्या गृहिणी होत्या. रवींद्रनाथ टागोर हे आपल्या आई-वडिलांचे सर्वात धाकटे सुपुत्र होते.
रवींद्रनाथ टागोर बालपणापासून बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे घरीच झाले आणि पुढचं शिक्षण त्यांनी कोलकाता येथील प्रसिद्ध सेंट जेवियर शाळेतून पूर्ण केलं. त्यांचे वडील थोर समाजसेवक होते आणि सतत समाजकार्यात मग्न असत. आपले चिरंजीव रवींद्रनाथ यांना बैरिस्टर बनविण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी रवींद्रनाथ यांना कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडन येथील विश्वविद्यालयात पाठवलं. पण रवींद्रनाथ टागोर यांना सुरुवातीपासून साहित्याची आवड असल्याने पदवी न मिळवताच ते भारतात परतले. बालपणापासून रवींद्रनाथांना गोष्टी, कविता लिहिण्याची आवड होती अर्थात मनातल्या भावनांना कागदावर उतरवणं त्यांना खूप आवडायचं. त्यामुळे साहित्य प्रतिभा त्यांच्यात फार लवकरच विकसित झाली. त्यामुळे एक महान कवी, विचारक, आणि लेखक म्हणून त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं.
6 फेब्रुवारी 1922 रोजी रवींद्रनाथ टागोर यांनी ‘श्रीनिकेतन या संस्थेची स्थापना कोठे केली?
रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक विचार
रविंद्रनाथांनी कलकत्यापासून जवळच असणाऱ्या शांतिनिकेतन येथे अरण्यशाळा काढली. श्रीनिकेतन ही संस्था काढली. कुटिरोद्योगाची कल्पना, शेतकऱ्यांसाठी कृषिबँक, हितैषीसभा त्यांनी सुरु केल्या. नैसर्गिक सौंदर्याच्या सान्निध्यात शिक्षण द्यावे, यावर रविंद्रनाथांचा भर होता. वृक्षाच्या सावलीत, तपोवनाच्या कल्पनेवर आधारीत त्यांनी शिक्षणाची नवी पध्दती सुरु केली. तेथे शिष्यांच्या चित्ताला पल्लवित करणारे गुरु त्यांना निर्माण करावयाचे होते. तेथील आश्रमात त्यांनी भारतीय चित्रकलेचे पुनरुज्जीवन केले. शांतिनिकेतन विद्यालयातूनच पुढ विश्वभारती विद्यापीठ उभे राहिले. तेथ जगभरातून आलेले हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. टागोरांना ध्यानात रंगणे आवडे, तसेच काव्यामध्ये गूढगूंजन करण्याचीही त्यांची सवय होती. पण असे असूनही भारतमातेबद्दल त्यांना अतिशय प्रेम होते. वंगभंगचळवळीत त्यांनी भाग घेतला होता.
रवींद्रनाथ टागोर यांनी इंग्रज सरकारला आपली सर ही पदवी कधी परत केली
जालियानवाला बागेत पंजाबला भयंकर हत्याकांड झाले. त्यावेळी तेथे सभेसाठी जमलेल्या निष्पाप भारतीयांवर गोळीबार झाला. हे रविंद्रनाथांना आवडले नाही म्हणून ब्रिटिशांनी त्यांना दिलेली सर ही पदवी ब्रिटिश सरकारकडे परत पाठवली.
बालपणापासून साहित्याकडे कल असल्याने ते एक महान कवी आणि प्रसिद्ध साहित्यकार म्हणून उदयाला आले. फार कमी वयात त्यांना साहित्याची उत्तम समज आली होती. वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी त्यांनी आपली पहिली कविता लिहिली आणि जेंव्हा ते 16 वर्षांचे होते त्यावेळी 1877 साली त्यांनी लघुकथा लिहिली होती. रवींद्रनाथांनी जवळ-जवळ 2 हजार 230 गीतरचना केल्या शिवाय भारतीय संस्कृतीत विशेषतः बंगाली साहित्यात आपलं अमुल्य योगदान दिलं.
साहित्यातील आपल्या अतुलनीय योगदाना करता 1913 साली त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रवींद्रनाथ यांच्या रचनांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नव्या गद्य आणि छंदा समवेत आपल्या कवितांमध्ये लोकभाषांचा चांगला उपयोग केला. रचना अत्यंत साध्या सरळ सोप्या असल्याने रसिकांना फार आवडल्या. 1880 साली रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक रचना प्रकाशित झाल्या, पुढे 1890 मध्ये त्यांची मानसी ही रचना प्रकाशित झाली. त्यांच्या या रचनेतून त्यांच्यातील विलक्षण प्रतिभा आणि परिपक्वतेचा सर्वांना परिचय झाला.
अवघ्या विश्वातील ते एकमेव असे साहित्यिक आहेत की ज्यांच्या दोन रचना दोन देशांच्या राष्ट्रगान झाल्या. भारताचे राष्ट्रगाण ‘जन गन मन‘ आणि बांगलादेशाचे राष्ट्रीय गान ‘आमार सोनार बांग्ला’ या गुरुदेव यांच्या रचना आहेत.
या व्यतिरिक्त गुरुदेव रवींद्रनाथ यांची सर्वात लोकप्रिय रचना ‘गीतांजली’ होती . या करता त्यांना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. गीतांजली या रचनेची लोकप्रियता एवढी वाढली होती की पुढे त्याचे इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी, रूसी, याशिवाय जगातील सगळ्या प्रमुख भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला. त्यामुळे रवींद्रनाथांची ख्याती संपूर्ण विश्वात पसरली आणि सर्वदूर ते प्रसिद्ध झाले.
रवींद्रनाथ टागोर यांच्या कथा
त्यांच्या कथांमध्ये काबुलीवाला, मास्टर साहब, आणि पोस्टमास्टर खूप प्रसिद्ध झाल्या. लोक आज देखील या कथा मोठ्या उत्साहाने वाचतांना पहायला मिळतात. रवींद्रनाथ टागोर हे एक अनुभवी आणि उत्तम चित्रकार देखील होते. त्यांच्या चित्रकलेचा प्रकार फार अद्भुत असं होता, त्यांच्या चित्रकलेतून त्यांचे महान विचार प्रगट होत असत.
आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये गुरूदेवांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना शांतीनिकेतन मधून कोलकाता येथे नेण्यात आलं. याठिकाणी 7 ऑगस्ट 1941 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या व्यक्तिमत्वातील प्रकाशाने रवीन्द्रनाथांनी सर्वदूर चैतन्य निर्माण केलं ते भारताची अनमोल संपत्ती होते, साहित्यातील प्रत्येक शाखेत आज त्यांची रचना आपल्याला पाहायला मिळते. एक कवी, लेखक, आणि नेता म्हणून त्यांची व्याख्या शब्दात करणं शक्य होणार नाही. साहित्यातील योगदानामुळे त्याचं कायम स्मरण केलं जातं.
त्यांच्या पुढील ओळी खुप काही सांगून जातात
रवींद्रनाथ टागोर मराठी कविता
नहीं मांगता, प्रभु, विपत्ति से, मुझे बचाओ, त्राण करो
विपदा में निर्भीक रहूँ मैं, इतना, हे भगवान, करो।
नहीं मांगता दुःख हटाओ व्यथित ह्रदय का ताप मिटाओ
दुखों को मैं आप जीत लूँ ऐसी शक्ति प्रदान करो
विपदा में निर्भीक रहूँ मैं, इतना, हे भगवान,करो।
कोई जब न मदद को आये मेरी हिम्मत टूट न जाये।
जग जब धोखे पर धोखा दे और चोट पर चोट लगाये –
अपने मन में हार न मानूं, ऐसा, नाथ, विधान करो।
विपदा में निर्भीक रहूँ मैं, इतना, हे भगवान,करो।
नहीं माँगता हूँ, प्रभु, मेरी जीवन नैया पार करो
पार उतर जाऊँ अपने बल इतना, हे करतार, करो।
नहीं मांगता हाथ बटाओ मेरे सिर का बोझ घटाओ
आप बोझ अपना संभाल लूँ ऐसा बल-संचार करो।
विपदा में निर्भीक रहूँ मैं, इतना, हे भगवान,करो।
सुख के दिन में शीश नवाकर तुमको आराधूँ, करूणाकर।
औ’ विपत्ति के अन्धकार में, जगत हँसे जब मुझे रुलाकर–
तुम पर करने लगूँ न संशय, यह विनती स्वीकार करो।
विपदा में निर्भीक रहूँ मैं, इतना, हे भगवान, करो।
यया अश्या महान कवी आणि व्यक्तिमत्वाला त्रिवार वंदन
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर.
ज्यांचे काव्य दोन देशांचे राष्ट्रगीत आहे असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. साहित्य, कला आणि शैक्षणी क्षेत्रामधील त्यांचे कार्य अद्वितीय आहे. गुरुदेव रवींद्रनाथ यांच्याबद्दल जाणून घ्या…
Rabindranath Tagore information Biography in Marathi
रवींद्रनाथ टागोर माहिती निबंध भाषण मराठी
मित्रांनो, Rabindranath Tagore information Biography in Marathi रवींद्रनाथ टागोर माहिती निबंध भाषण मराठी ही महत्वपूर्ण माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. अशा पद्धतीची माहिती वाचण्यासाठी कॉलेज कट्टाला सबस्क्राईब करा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Rabindranath Tagore information Biography in Marathi
Rabindranath Tagore Essay Speech in Marathi
रवींद्रनाथ टागोर माहिती निबंध भाषण मराठी रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक विचार
रवींद्रनाथ टागोर यांच्या आईचे नाव काय होते रवींद्रनाथ टागोर यांच्या पत्नीचे नाव काय होते रवींद्रनाथ टागोर मराठी कविता
रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार कधी मिळाला
6 फेब्रुवारी 1922 रोजी रवींद्रनाथ टागोर यांनी ‘श्रीनिकेतन या संस्थेची स्थापना कोठे केली?
रवींद्रनाथ टागोर यांनी इंग्रज सरकारला आपली सर ही पदवी कधी परत केली
रवींद्रनाथ टागोर जयंती मराठी नोबेल पुरस्कार विजेते भारतीय
रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कधी झाला
Leave a Reply