Marathi articles on life लेखणीच्या टोकाखाली
दिव्याखाली जरी अंधार असला तरी तो स्वत: जळून संपूर्ण जग प्रकाशमान करत असतो त्याचप्रमाणे लेखणीच्या टोकाखाली नवीन प्रकाशकिरणांची चाहूल असते आणि त्या लेखणीच्या टोकामागे असणाऱ्या मनावर त्या नव्या प्रकाशाच्या प्रखरतेच प्रमाण अवलंबून असतं . कधी कधी हां नवा प्रकाश काळा सुद्धा असू शकतो. आजकाल समाजात सुधारणा करण्याच्या गप्पा मारणारे लोक पदोपदी भेटतात परंतु प्रत्यक्षात काम करण्याची उमेद शंभरातील एकाकडेच असते.
दोन दिवसांपूर्वी मी गाडीतून प्रवास करत असताना एका व्यक्तिने महिलांच्या समस्येवर भाष्य केले. व् त्या समस्येवर काम करण्याची उमेद बोलुन दाखविली. हां एक खुपच सुंदर विचार होता. खरतर हा खुपच संवेदनशील विषय आहे. किंबहुना या विषयामध्ये संवेदनशील मुद्देच खुप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पण या विषयाच्या खोलावर जाउन त्याचा अभ्यास करणे हा प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार एक वेगळाच मुद्दा आहे. व्यक्तिपरत्वे विचार देखील भिन्न असतात. व या भिन्नतेमधुनाच एक वेगळाच विचार जन्म घेत असतो आणि प्रत्येकजण त्याला आपल्या परीभाषेत ओवण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळी घटना घडल्यापासून मी या विषयामध्ये प्रवास सुरु केला.
महिलांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला असता एक खुप मोठ जग समोर येतं. “मोठ जग” हां शब्द मी इथे खुप सावधपने वापरतेय कारण पृथ्वीच्या उत्पत्तिपासुन हा प्रश्न जसा आहे तसाच तो अविरतपने पुढे चालू राहिला आहे…शतके उलटली, पिढ्यांनपिढ्या गेल्या, पारंपारिक संस्कृती गेली जग आधुनिकीकरणाकड़े वळाले. भारताने आधुनिक अर्थव्यवस्थेच्या धोरणाचा स्वीकार केला तेव्हापासून लिखित माध्यमांची जागा आज न्यू मीडीया ने घेतलीय…पण एवढे बदल होऊनही या समस्या काही कमी झाल्या नाहीत. Marathi articles on life लेखणीच्या टोकाखाली
काही वर्षापुर्वी लिखित माध्यमातून शब्दांचे धारदार शस्त्र वापरून आपल्या लिखानातून काही लोकांनी हे प्रश्न मांडायचा प्रयत्न केलाय, आजही सोशल मीडियावर खुप साऱ्या पोस्टदेखील आपण वाचतो, परतुं लोकांच्या वागणुकीत बदल झाला का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारावा अशी सद्यस्थिती आहे…
बदल तर घडायला हवा कारण बदल ही काळाची गरज आणि शोधाची जननी असते. पण पुन्हा एक नवीन प्रश्न जन्म घेतो तो म्हणजे बदल कोणत्या गोष्टीत घड़वायला हवा….जर बदल घड़वायचा असेल तर माणसाला स्वतःची ओळख असावी म्हणजे मी कोण आहे व एक सुजाण नागरिक बनण्याची माजी व्याख्या काय ? हे प्रत्येकाने जाणायला हव,किंबहुना ते प्रत्येकालाच उमजायला हव म्हणजे महिलांच्या समस्या हा प्रश्न या शब्दपटलावर राहनारच नाही.
मानव नेहमी आदर्श गोष्टींच् अनुकरण करुन इथे पोहोचलाय मग तोच आदर्शवाद डोळ्यांसमोर तेवत ठेवत इतरांनी आपला आदर्श ठेवावा अस जीवन जगल पाहिजे. लोकांनी आपल्या तथाकथित आधुनिक विचारांचा आदर्श ठेवलाय असा सुर निघायला हवा, नुसता सुर निघुन फायदा नाही तर आदर्श घेऊन तसंच सुंदर जीवन इतरांनी जगाव व समाजात आपली कर्तव्ये आणि जबाबदा-या पार पाडत भारताचा सुजाण नागरिक होण्याचा अभिमान बाळगला पाहिजे म्हणजे एका नविन दिवसाची सुरवात सुखमय होईल आणि या जगात महिलांवर होणारे बलात्कार, हल्ले,मानसिक पिळवणूक , छळ् यांसारखे अत्याचार कमी होतील व् लेखणीच्या नावाखाली जे लोक शब्दांमधुन आपल्या भावना मांडण्याचा प्रयत्न करत आले आहेत नव्हे नव्हे तर करताहेत त्यांचीं लेखनी सफल होईल.
-प्रियंका पुंड.
Leave a Reply