MAHATMA JYOTIBA PHULE INFORMATION THOUGHT VICHAR MAHITI IN MARATHI LANGUAGE
MAHATMA JYOTIBA PHULE INFORMATION THOUGHT VICHAR MAHITI IN MARATHI LANGUAGE महात्मा फुले मराठी माहिती ज्योतिबा फुले जीवन परिचय महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य
महात्मा जोतीबा फुले, पुर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले हे एक समाजसुधारक, मराठी लेखक, विचारवंत होते. महात्मा फुले आणि त्यांचा पत्नी सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य बहुजन, दीन दलितांचा उद्धारासाठी वेचले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा स्री शिक्षणामध्ये मोलाचा वाटा आहे.
चला मित्रांनो आज आपण आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा वर College Catta वर महात्मा जोतीराव फुले बद्दल माहिती घेऊयात.
महात्मा फुले पुरोगामी विचारसरणीचे होते, समाजातील जाचक रूढी परंपारा सतीची प्रथा, त्याचप्रमाणे भृणहत्याचा त्यांनी विरोध केला. विधवा पुनर्विवाह करण्यास त्यांनी प्रोस्ताहन दिले. समाजातील विषमता जातीय, उच्चनीच भेदभाव या सगळ्याला बहुजनांचे अज्ञान जबाबदार आहे म्हणून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.
महात्मा जोतीबा फुलेंचा जन्म साताऱ्या जवळील कटगुण गावात 11 एप्रिल 1827 साली झाला. त्यांचे वडील गोविंदराव, आई चिमणाबाई हे फुलांचा व्यवसाय करत होते, म्हणून त्यांचे फुले असे नाव पडले. तरी त्यांचे मूळ नाव गोऱ्हे असे होते. जोतीबा नऊ महिन्याचे होते त्यावेळेस त्याचा आईचे निधन झाले.
त्या काळात बहुजनांनी शिक्षण घेणे पाप आहे असा पगडा होता पण या गोष्टीला झुगारून जोतिबांचा वडलांनी गोविंदरावांनी जोतीबाला शाळेत घातले. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांचे माध्यमिक शिक्षण पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये झाले. येथेच त्यांना पुरोगामी विचारांची गोडी लागली. महात्मा फुलेंची इंग्रजी उत्तम होती. त्यांनी राईट्स आँफ मँऩ हे पुस्तक वाचले. समाजातील जातीभेद हा ईश्वर निर्मित नसून मानवनिर्मित आहे हे समजेल. त्याच बरोबर कोणी उच्च नीच नसून सर्व समान आहेत या गोष्टी त्यांना समजल्या.
महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य
MAHATMA JYOTIBA PHULE INFORMATION THOUGHT VICHAR MAHITI IN MARATHI LANGUAGE वयाचा बाराव्या वर्षी जोतीरावांचा विवाह सावित्रीबाईशी झाला. विवाहानंतर महात्मा फुलेंनी सावित्रीबाईना शिकवले. त्यांचात शिक्षणाची गोडी निर्माण केली. महत्मा फुले स्रियांना देखील पुरुषांप्रमाणे समान हक्क असावेत, स्री पुरुष भेद ते मानत नव्हते. स्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्रियांनी साक्षर असणे किती गरजेचे आहे हे महात्मा जोतीराव फुले यांनी ओळखले आणि स्री शिक्षणासाठी पहिली मुलींची शाळा पुण्यामधील भिडेवाड्यात 1848 साली सुरु केली आणि शाळेची जबाबदारी त्यांनी सावित्रीबाईंवर सोपवली. या क्रांतिकारी घटनेचा विरोध त्या काळातील कर्मठ विचारधारेचा लोकांनी केला, सावित्रीबाईंचा अंगावर शेण फेकले, शिवीगाळ केला. पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य चालूच ठेवले.
पुढे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली याचा हेतू असा की शेतकऱ्यांनी, बहुजनांनी वंचितानी स्वतःचा हक्कासाठी संघटीत व्हावे. लढावे हा होता.
महात्मा फुलेंनी आपले विचार समाजापर्यंत पोहोचावे यासाठी लेखन केले. यात शेतकऱ्यांचा असूड, ब्राम्हणाचे कसब त्याचप्रमाणे गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न हे नाटक, शिवाजीचा पोवाडा हे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.
महात्मा फुले कविता
विद्ये विना मती गेली । मतीविना नीती गेली ।
नितीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शुद्र खचले । एवढे अनर्थ एका अविद्येने केले
हे गुलामगिरी पुस्तकातील त्यांचे काव्य शुद्र होण्यास अशिक्षित असणे किती कारणीभूत आहे हे चपखल पणे मांडते.
गावातील अस्पृशांना पाणी मिळावे म्हणून त्यांनी स्वतःची पाण्याची विहीर त्यांना खुली केली. समाजातील कार्य बघून लोकांनी जोतीराव फुलेंना ‘महात्मा’ ही उपाधी दिली.
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु मानत. आयुष्याचा शेवटपर्यंत त्यांचा संघर्ष चालूच होता, प्रसंगी कर्मठ लोकांनी त्यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. मारेकरी पाठवले पण ते डगमगले नाहीत त्यांनी समाज प्रबोधनाचा वसा चालूच ठेवला. अशा महान क्रांतीसुर्य महात्मा, खर्या अर्थाने शिक्षणमहर्षी महात्मा जोतिब फुले यांचे निधन 28 नोव्हेंबर 1890 साली झाला. महात्मा फुले मराठी माहिती ज्योतिबा फुले जीवन परिचय महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य MAHATMA JYOTIBA PHULE INFORMATION THOUGHT VICHAR MAHITI IN MARATHI LANGUAGE ही माहिती कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे अवश्य कळवा.Mahatma Jyotirao phule information in Marathi language.
Leave a Reply