Maharshi Dhondo Keshav Karve information in Marathi महर्षी धोंडो केशव कर्वे:-एक महान विभूती.
The great aim of education is not knowledge but action. हाच काहीसा विचार आपल्या वाटेवर ठेवत महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सामाजिक शिक्षण संस्था आणि महिला सबलीकरण यामध्ये सिंहाचा वाटा दिला. महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८मध्ये शेरवली मुरूड, कोकण येथे झाला. अण्णांना १०४ वर्षांचे चांगली निरोगी जीवन लाभले. महिला शिक्षण,विधवा पुनर्विवाह ह्या सामाजिक कार्यांमध्ये त्यांचे खूप महत्त्वपूर्ण योगदान लाभले. इसवी सन १९०७ रोजी महाराष्ट्रात पुणे येथील हिंगण्याच्या माळरानावर त्यांनी झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांची पहिली विद्यार्थिनी ही त्यांची मेहूनी पार्वतीबाई आठवले ही होती.त्यांचा कार्य प्रारंभ विधवाविवाह पासून सुरू झाला तो स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठापर्यंत अविरत सुरु राहिला.
Maharshi Dhondo Keshav Karve information in Marathi महर्षी धोंडो केशव कर्वे माहिती निबंध मराठी
वयाच्या चौदाव्या वर्षी अण्णा कर्वे यांचा विवाह राधा बाईंशी झाला तेव्हा राधाबाई केवळ आठ वर्षे वयाच्या होत्या. परंतु २७ व्या वर्षी राधा बाईंचा बाळंतपणात मृत्यू झाला.राधाबाईंनी अण्णांना त्यांच्या सत्कार्यात भरपूर मदत केली. इ.स. १८८९ मध्ये त्यांनी मॅट्रिक ची पदवी घेतली. व मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन गणिताची पदवी संपादन केली.पुढे लोकमान्य टिळक राजकारणाच्या रणधुमाळीत व्यग्र झाल्यावर फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित अध्यापका चा रिक्त जागी गणित विभागाचे प्रमुख गोपाळकृष्ण गोखले यांनी धोंडो केशव कर्वे यांना बोलावून घेतले. त्यांनी इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित विषय शिकवला. त्यांना हिंगणे ते फर्ग्युसन असा पायी प्रवास करावा लागत असे. अण्णांचे वय वर्ष ४५ असताना त्यांनी आनंदी बाईशी लग्न केले.त्याकाळी प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशी च लग्न करावे अशी प्रथा होती.परंतु या प्रथेला छेद देत त्यांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला.त्यांच्या या निर्णयामुळे ते लग्न करून जेव्हा आपल्या गावी परतले तेव्हा मुरुडला त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. पुढे याच गोदूबाई आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून विख्यात आहेत. त्यांनी आपल्या पतीच्या कार्यात लाख मोलाचा सहभाग दाखवला.
अण्णांना चार मुले होती. (रघुनाथ, शंकर, दिनकर, भास्कर)चारही मुलांनी अण्णांच्या कार्यात अनेक शाखांमध्ये प्रगती केली. र. धो. कर्वे ह्या चिरंजीवांनी सामाजिक सुधारणेचे हातभार लावून संतती नियमनाचे महत्त्व पटवून दिले. या विचाराला त्या काळी समाजात भयंकर विरोध होता तरीही र. धो. कर्वे व त्यांची पत्नी यांनी अथक परिश्रम घेऊन समाजामध्ये अनेक प्रगतिशील विचार रुजवले.
Maharshi Dhondo Keshav Karve information in Marathi महर्षी धोंडो केशव कर्वे माहिती निबंध मराठी
२१ मे इ.स. १८९४ रोजी त्यांनी पुनर्विवाहित यांचा कुटुंब मेळावा भरवला. ज्यामधून त्यांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक’ मंडळाची स्थापना केली. जिचे काम विधवा विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणं हे होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढी मध्ये फसलेल्या स्त्रियांसाठी अण्णांनी इ.स. १८९६ रोजी सहा विधवा महिलांसह अनाथ बालिकाश्रम व विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केले. या काळात त्यांना बऱ्याच आर्थिक अडचणी आल्या.मंडळांसाठी निधी किंवा मदत मागायला गेल्यावर त्यांना पदोपदी अपमान झेलावा लागला.यांच्या कामामुळे प्रभावित होऊन रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी हिंगणी येथे सहा एकर जागा व रू.७५० संस्थेच्या उभारणीसाठी दिले.धोंडो कर्वे यांनी इथेच पहिली झोपडी उभारून स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री स्थापन केली. इसवी सन १९०० मध्ये त्यांचा अनाथ बालिकाश्रमचे स्थलांतर हिंगण यास केले व विधवा महिलांचे वस्तीगृह सुद्धा स्थापन केले. जी एक सामाजिक प्रयोगशाळा समजली जात होती.एवढ्या संस्था व कामाचा पसारा सांभाळण्यासाठी यांना मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी इसवीसन १९१० मध्ये ‘निष्काम कर्म मठाची’ स्थापना केली. अण्णा करणी अनेक परदेश दौरे करून महिला विद्यापीठांचे काम पाहिले.त्यांच्या विचारांमुळे ते प्रभावित झाले तसेच त्यांनी जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले व भारतातही असे विद्यापीठ असावे ही आशा त्यांच्या मनात पल्लवीत झाली. इ.स. १९१५ मध्ये अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे त्यांना अध्यक्ष स्थान मिळाले. तेथूनच त्यांनी ३ जून इसवीसन १९१६ सायली महिला विद्यापीठाची स्थापना केली. सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ १५ लाखांची देणगी दिली. व विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे केले.(SNDT) ह्या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अशी महर्षी कर्वे शिक्षण संस्था आजही दिमाखात उभी आहे.
धोंडो कर्वे यांना अनेक विद्यापीठांनी डी.लिट देऊन सन्मानित केलेलं आहे. इ.स. १९५५ साली पद्मविभूषण व इ.स. १९५८ साली भारतरत्न हे सन्मान देऊन त्यांच्या कार्याचे मोल त्यांना प्रदान केले. अशी महान विभूती ९ नोव्हेंबर १९६२ ला हिंगणी आश्रम, पुणे येथे अखेर पंचतत्वात विलीन झाली.
अण्णा कर्वे यांच्यावर पंडिता रमाबाई ,ईश्वरचंद्र विद्यासागर या महान विभूतींच्या प्रभाव होता. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचा सुद्धा त्यांच्यावर पगडा होता.जातीयवाद आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी अनेक भरीव कार्य केले आहे.
चरित्रे- महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या वर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.
१. महर्षी धोंडो केशव कर्वे-डाॅ. नीला पांढरे
२. भारतरत्न धोंडो केशव कर्वे-प्रा. शैलेश त्रिभुवन
३. महर्षी धोंडो केशव कर्वे- विलास खोले
त्याच प्रमाणे वसंत कानेटकर यांनी ‘हिमालयाची सावली‘ हे नाटक सुद्धा त्यांच्या जीवनावर आधारित लिहिले आहे.
–गौरी डांगे.
मित्रांनो, Maharshi Dhondo Keshav Karve information in Marathi महर्षी धोंडो केशव कर्वे माहिती निबंध मराठी ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.
Leave a Reply