लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कोण होते त्यांचाबद्दल माहिती कार्य कथा निबंध भाषण मराठी वाचा. Lokshahir Annabhau Sathe Information Biography History in Marathi Language
अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट इ.स. 1920 रोजी सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. अण्णाभाऊ साठे हे शाळेत शिकलेले नाहीत. केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सर्वणांद्वारे होणार्या भेदभावामुळे त्यांना शाळा सोडून द्यावी लागली. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी दोन लग्न केली. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे या होत्या. अण्णाभाऊंना मधुकर, शांता आणि शकुंतला एकूण तीन अपत्ये होती.
Lokshahir Annabhau Sathe Information Biography History in Marathi Language
Lokshahir Annabhau Sathe Essay Nibandh Speech Bhashan in Marathi Language
अण्णाभाऊंनी मराठी भाषेमध्ये एकूण 35 कादंबर्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (1959) ही त्यांची सर्वाधिक चर्चिली गेलेली कादंबरी आहे. या कादंबरीतील लेखनीला न्याय देत इ.स. 1961 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारकडून उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. अण्णाभाऊंच्या लघु कथांचा संग्रह 15 एवढा आहे. ज्यामध्ये मोठ्या संख्येने विविध भारतीय भाषांमध्ये तसेच 27 परदेशी भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी लिहिली आहेत.
अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक शैलीच्या वापराने लोकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय बनले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकिरा कादंबरीमध्ये अण्णाभाऊंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढी परंपरावादी प्रणाली त्याचबरोबर ब्रिटिशांविरूद्ध विद्रोह करणार्या नायक फकिरास प्रकाशझोतामध्ये आणले. नायक आणि त्याच्या सहकार्यांना नंतर ब्रिटिशांद्वारे अटक करण्यात येते आणि छळ केला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीबरोबरच संयुक्त महाराष्ट्र चळवळीदेखील गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे मोठे काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत. चलेजाव चळवळीच्या काळातदेखील वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णाभाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माहिती कार्य कथा निबंध भाषण मराठी
पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली. त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच 1944 साली त्यांनी ‘लाल बावटा’ या कला पथकाची स्थापनादेखील त्यांनी केली. माटुंग्याच्या लेबर कॅम्पमधील मंडळी विशेष करून नाशिक, सातारा, अहमदनगर जिल्ह्यातून येऊन स्थायिक झाले होते. बहुतेक गिरण्यात, गोदीत, नगरपालिकेमध्ये नोकरीला होती. इथेच अण्णाभाऊंची नाळ कम्युनिस्ट पक्षाशी जोडली. याच कॅम्पच्या नाक्यावर ॠलेबर रेस्टॉरंट’ होते. इथेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या रेस्टॉरंटमध्ये आण्णाभाऊंनी डासांवर पोवाडा लिहिला.
विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिल वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याचवेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.
वयाच्या 17-18 व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली. मात्र कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले. त्यावेळी अण्णाभाऊ पुन्हा कुटुंब वाटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वाटेगावात राहणे शक्य नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले. त्यांच्याच एका नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात चांगलेच स्वागत झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी महत्वपूर्ण भर घातली ती लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सहभागाने असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशासारख्या कलेस अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा व समृद्धी अण्णा भाऊंनीच मिळवून दिली आहे.
अण्णा भाऊंच्या बालपणातल्या घडणीमध्ये त्यांच्या मूलभूत आवडींचा वाटा सर्वाधिक आहे. गर्दीपासून दूर असे डोंगर, दर्या, राने, नद्या या ठिकाणी भटकणं त्यांना आवडे. त्यातूनच पक्षीनिरीक्षण, शिकार करणं, मध गोळा करणं हे छंद त्यांना जडले. जत्रांमध्ये जाऊन तिथल्या गोष्टींचं निरीक्षण करणंही त्यांच्या आवडीचं एक काम असे. नंतर त्यामध्ये हळूहळू पाठांतराची भर पडत गेली. लोकगीतं, पोवाडे, लावण्या पाठ करणे. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकणे आणि इतरांना सांगणे या त्यांच्या छंदातून त्यांच्याभोवती समवयीन मुलांचा गोतावळा जमत असत. शिवाय मैदानी खेळांचा वारसा मिळाल्यामुळे दांडपट्टा चालवण्यातही ते प्रवीण होते.
मुंबईतली प्रारंभीची वर्षें ही अण्णा भाऊंसाठी वैचारिक जडणघडणीची ठरली. तिथे चित्रपटापासून विविध राजकीय पक्षांपर्यंतचे मोठे जग त्यांना जवळून पाहण्यास मिळाले. मुंबईत अण्णा भाऊंनी उदरनिर्वाहासाठी बूटपॉलिश, हमाली, वेटर, घरगडी, कुत्र्याला सांभाळणं, मुलांना खेळवणं, खाण कामगार अशी अनेक प्रकारची कामे केली. यातूनच अनुभवविश्व घडत गेले. या शहरात त्यांना आणखी एक सिनेमा पाहण्याचा छंद लागला.
अण्णाभाऊंन मुंबईमधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. आरती वाणीने त्यांच्या दोन गाण्यातून मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणीकामगार, दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण असे शहराला दर्शवणारे वर्णन केले आहे.
Annabhau sathe Samajik Karya Story Katha Lekh Marathi
अण्णाभाऊ साठे प्रथमतः कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होते. डी. एन. गवंकर आणि अमर शेख या लेखकांसोबत ते लालबावटा कला पथक या तमाशा नाट्यप्रसाराचे सदस्य होते. त्यावेळी त्यांनी सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते 1940 च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर भारतातील उच्चवर्णीयांचे शासन त्यांना अमान्य होते. म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई मध्ये वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, ये आझादी झूठी है, देश की, जनता भूखी है! इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठी भाषीक राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.
साठे नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. इ.स. 1958 मध्ये बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की पृथ्वी ही शेषनागात्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे. यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य बौद्ध धर्माऐवजी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.
अण्णाभाऊ साठे हे दलित समाजाचे विशेषत: मांग जातीचे प्रतीक बनले आहेत. 1 ऑगस्ट 2001 रोजी भारतीय पोस्टाने विशेष 4 टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा कादंबर्या साहित्य
अलगुज, अहंकार, आग, आघात, आवडी, केवड्याचे कणीस, कुरूप, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, जिवंत काडतूस, ठासलेल्या बंदुका, डोळे मोडीत राधा चाले, तास, धुंद, रानफुलाचा पाझर, फकिरा, फुलपाखरू, मंगल, मथुरा, माकडीचा माळ, मास्तर, रत्ना, मुर्ती, रानगंगा, रानबोका, रूपा, वारणेचा वाघ, वैजयंता, वैर, संघर्ष, सैरसोबत या कादंबर्या आहेत.
आण्णाभाऊ साठे यांची नाटके
इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान अशी 3 प्रसिद्ध नाटकं.
माझा रशियाचा प्रवास हे एकमात्र प्रवासवर्णन त्यांनी लिहीले आहे.
अकलेची गोष्ट, कलंत्री, खापर्या चोर, दुष्काळात तेरावा, देशभक्त घोटाळे, निवडणूकीतील घोटाळे, पुढारी मिळाला, पेंढ्याचं लग्न, बिलंदर बुडवे, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, शेटजींचं इलेक्शन आदी लोकनाट्य तमाशांचे लिखान केले.
-सागर गोरखे.
तुम्हाला ही Lokshahir Annabhau Sathe Information Biography History in Marathi Language Lokshahir Annabhau Sathe Essay Nibandh Speech Bhashan in Marathi Language Annabhau sathe Samajik Karya Story Katha Lekh Marathi लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माहिती कार्य कथा निबंध भाषण मराठी माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की प्रतिक्रिया देऊन कळवा.
आपल्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply