जय जवान जय किसान असा नारा देऊन भारतीयांमध्ये पुन्हा उत्साह तयार करणारे लाल बहादूर शास्त्री हे युगपुरुष होते. Lal Bahadur Shastri Information Biography in Marathi language
Lal Bahadur Shastri Information Biography in Marathi language
लाल बहादूर शास्त्री निबंध भाषण माहिती मराठी
लाल बहादुर शास्त्री स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते, त्यांचा जन्म १९०४ साली रामनगर (वाराणसी) येथे आपल्या आजोळात (आईच्या वडिलांकड़े) झाला. त्यांच कुटुंब हे कायस्थ (हिंदू) समाजात मोड़त असून त्यांचे पूर्वज रामनगरच्या ज़मीनदारांच्या चाकरीत होते. वडिल शरद प्रसाद श्रीवास्तव ह्यानी प्राथमिक शिक्षक म्हणून वाराणसीत नौकरी केली व नंतर अलाहबादला वित्त(रेवेन्यु) विभागात क्लर्क म्हणून ते रुजू झाले. आई रामदुलारी देवी आपली मुलगी कैलाशी देवी आणि बाळासमवेत रामनगरलाच राहत असत. त्या आपल्या बाळाला ‘न्हंन्या’ म्हणून गोंजारत असत ह्या दरम्यान वडिलांची पदोन्नति होऊन त्याना अलाहबादच डेप्युटी तहसीलदार करण्यात आलं.
Lal Bahadur Shastri Information Biography in Marathi language
सुगीचे दिवस आले होते. अतिशय सामान्य परिस्थितीतून सुरु झालेला हा संसार बहरू पहात होता. तोच नियतीने डाव साधला. एप्रिल १९०६ च्या प्लेगच्या साथीत शरद श्रीवास्तव निधन पावले. अवघ्या दिड वर्षाचे बोबडे बोल बोलणारे लाल बहादुर वडलांच्या प्रेमाला मुकले होते. गरोदर रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. जुलाई १९०६ मध्ये सुंदरा देवीच्या रुपात बहादुरांना धाकटी बहीण आणि रामदुलारिला कन्यारत्न प्राप्त झाले. बहिणीच्या येण्याने मोठा झालेला हा ‘न्हंन्या’ आता शाळेत जाऊ लागला होता. मुगलांच्या काळापासून शासनाच सर्व कामकाज उर्दू आणि फारसी भाषेतच केल जात असे, ह्याकारणास्तव आणि कायस्थ कुटुंबांच्या परंपरेचा भाग म्हणून देखिल बुधान मियाँ मौलवी कड़े त्यानी उर्दू आणि फारसी भाषेचे धड़े गिरवले. त्यांचे आजोबा(आईचे वडिल) मुंशी हजारीलाल हे मुग़लसराइतल्या रेलवे स्कूलचे प्राचार्य होते. इयत्ता 6वी पर्यंतच शिक्षण लाल बहादुरनी तिथेच पूर्ण केल. आजोबांच्या निधानंतर मामा बिन्देशवरी प्रसादसोबत ते वाराणसित स्थायिक झाले. तिथे त्याना हरीशचंद्र हाई स्कूलमध्ये दाखल करण्यात आलं.
हरिशचंद्र हाईस्कूल मध्ये त्यांना निल्कामेश्वर प्रसाद मिश्रा असे पितृतुल्य गुरू भेटले. निल्कामेश्वर मिश्रा म्हणजे देशप्रेमाचा महामेरु, ज्याच्या छत्रछायेत लाल बहादुर घडत गेले. त्यांनी बहादुरांना स्वामी विवेकानंद, ऍनी बेसंट, महात्मा गाँधी ह्यांचे “माणूस” आणि “स्वतंत्रता” बद्दलचे विचार समजावून सांगितले. हालाखीच्या परिस्थितीत शिकण्याची जिद्द बाळगणार्या बहादुराना वेळेनिशी मिश्रांची आर्थिक मदत ही होत असे.
१९१७ साली बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कोनशिलेची स्थापना करण्यासाठी आलेले महात्मा गाँधी त्यांना दिसले. बापूंच साधारण राहणीमान, त्यांचे विचार ह्याबद्दल ऐकून, वाचून असणार्या बहदुरानी त्यांची भेट घेतली. त्यांच्या भाषनाने मंत्रमुग्ध झालेला जनसागर बघितला आणि ‘बापू’ त्यांच्या बालमनावर कोरले गेले. वयाच्या ११ व्या वर्षी देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना त्यांच्यात रुजली. १९१९ ला घटित जालियनवाला बाग़, चंपारण्या सत्याग्रह ह्या घटनांची दाहकता त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती. विदेशी वस्तुंचा बहिष्कार करण्याची मोहिम त्यांनी हाती घेतली आणि वाराणसीत कांग्रेसचा एक युवा कार्यकर्ता म्हणून ते सक्रिय झाले. त्यासाठी अनेक वेळा त्यांना तुरुंगवासात ही जावे लागले. असहकार चळवळीचा भाग म्हणून ब्रिटिश शासन निहित शाळेतील शिक्षण ही त्यांनी नाकारलं. देशाच्या तरुणांच शिक्षण वंचित होऊ नये म्हणून वाराणसीत “नॅशनलिस्ट एजुकेशन” च्या वतीने १९२१ साली जे.बी क्रिपलानी आणि व्ही.एन शर्मा ह्यानी काशी विद्यापिठाची स्थापना केली. याच विद्यापिठातुन बहदुरानी १९२५ साली फिलोसोफी आणि इथिक्स या विषयातील पदवी त्यांनी प्रथम श्रेणीत पूर्ण करून “शास्त्री” ही उपाधी प्राप्त केली. त्यानंतर लाल बहादुर शास्त्री हीच त्यांची ओळख सर्वश्रुत राहिली.
समाजातील दलित वर्ग सशक्त झाला तरच देश प्रगत होइल हे शास्त्रिनी जाणल होत व त्यासाठी त्यांनी मुजफ्फरनगर पासून सुरवात केली. लाला लाजपत राय यांच्या लोक सेवा मंडळाचे सदस्यत्व पत्करून ते मुजफ्फरनगरातील हरिजनांची स्थिती सुधारण्यासाठी कार्यरत झाले. पुढे मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केल.
Lal Bahadur Shastri Short essay Speech History in Marathi language
१९३० च्या मिठाच्या सत्याग्राहत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यासाठी तब्बल अडीच वर्षाची कारावासाची शिक्षा त्यांना भोगावी लागली. आता लाल बहादुर शास्त्री हे नाव केवळ वाराणसी पुरते मर्यादित राहिले नव्हते, कॉग्रेसच प्रादेशिक नेतृत्व बापूंनी त्यांच्याकड़ेच सुपूर्त केलं. त्या अनुशंगाने पंडित नेहरु आणि शास्त्रीजी हे समीकरणच जूळुन आले. उत्तर प्रदेशच्या जनतेचा आवाज त्यांचा नेता म्हणून शास्त्रीजींनी स्वातंत्र्य चळवळींना अग्रमान ठेवत ब्रिटिश सरकारच्या नाकी नऊ आणले होते. १९४० साली उत्तर प्रदेशच्या संसदीय बोर्डाचे आयोजक असतांना त्यांची लोकप्रियता आणि वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी सरकारने वैयक्तिक सह्भागाच कारण पुढे करत त्यांना अटक केली पण वर्ष भरातच परिणामी कारण नसल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. असीम देशभक्ती आणि त्याच बरोबर संवेदनशील वृत्ती असणारे शास्त्रीजी स्वतंत्र भारताची मागणी करत “चले जाव” चळवळीच देशभरातील नियोजन करू लागले, कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये ह्यासाठी त्यांनी प्रादेशिक नेते, कार्यकर्ते ह्यांच्या बैठका घेउन त्यांना निर्देशित केल. ह्यासाठी त्यांना सरकारने १९४2 ते पुढील ४ वर्ष करावास सुनावला. स्वातंत्र्य लढ्यात शास्त्रीजी तब्बल ९ वर्ष कारावास भोगला. ह्या शिक्षे दरम्यान देखिल त्यांनी आपल्या जागतिक सामाजिक चळवळींचा, क्रांतिकारकांचा सखोल अभ्यास केला. त्याचा पूर्ण उपयोग देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी केला. एक कुशल नेता, आयोजक, समान्य जनतेच दुःख आणि त्याचा मर्म जाणणारा संवेदनशील माणूस आणि प्रचंड इच्छाशक्तिच द्योतक आणि असणार बहुआयामी व्यक्तित्व म्हणजे “शास्त्रीजी”. 15 ऑगस्ट १९४७ स्वंतंत्र भारतात त्यांनी गोविन्द वल्लभ पंतांच्या कबिनेट मध्ये उत्तर प्रदेशच पोलिस आणि वाहतुक विभाग मंत्रीपदाची शपत ग्रहण केली. त्याच वर्षी परिवहन मंडळात महिला वाहकांची नियुक्ती करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. हा फ़क्त निर्णय नसून ही स्वंतंत्र लोकतंत्राच्या वैचारिक क्रांतिची सुरवात आहे अस त्यांच ठाम मत होत. त्याच वर्षी उत्तर प्रदेशात जातीय वादातून उसळलेल्या दंग्यांना लगाम लावण्यात त्यांना यश आले. सामान्य जनतेवर लाठी चार्ज न करता पाण्याचे फवारे सोडून त्यांना अडवा असे निर्देश पोलिस विभागाला त्यांनी दिले आणि मोठ्या प्रमाणावर घातपात टळला. त्यांच्यातला द्रष्टा आणि प्रसंगावधान राखत योग्य निर्णय घेण्याची क्षमता हेरून लवकरच त्यांना गृहमंत्री पदाचा भारही सोपवण्यात आला. १९५१ साली त्यांना ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीच सरचिटनीस करण्यात आल. १९५२ साली ते उत्तर प्रदेश विधानसभा निवडनुकीत उत्तर सरोन आणि पश्चिम फुलुर भागातून सयुंक्तपणे जागेवरून तब्बल ६९ टक्के मते मिळवत अलौकिक विजय प्राप्त केला. देशभरातील १९५२,१९५७ आणि १९६२ सालच्या निवडणुकांमध्ये कांग्रेसच्या विजयात सर्वात मोलाच योगदान त्यांच होत. प्रचार, भाषण आणि सभा यांच पूर्व नियोजन आणि ती यशस्वीपने कशी पार पाडायची याची गुरुकिल्लीच त्यांच्याकडे होती. त्यांच्या प्रभाव जसा सामान्यांवर होता तसाच पगडा पार्टीतील कार्यकर्ते आणि नेत्यांवर देखिल होताच.१९५२ लाच त्यांची प्रतिभा जाणत त्यांना पंडित नेहरुंनी केंद्राच्या कबिनेट मध्ये बोलवून रेलवेमंत्री पदाची सूत्रे सुपूर्त केलीत.
शास्त्रीजींची “मूर्ती लहान पण कीर्ति महान” अशी ख्याती होती. अत्यंत खिलाडू वृत्तीने ते स्वतःच्या शारीरयष्टीवर विनोद करत. राजकोटला राष्ट्रीय शाळेच्या स्थापनादिनी ते प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते, तेव्हा त्यांची ओळख ‘शत्रु नसलेला गृहमंत्री’ अशी करूं देण्यात आली. बहादुर यांनी क्षणाचाही विलंब न करता हज़रजबाबीने आणि नम्रतेने उत्तर देत म्हटले ,”माझ्यासारख्या लहान माणसाला कोणाशी शत्रुता ठेवण फायद्याच ठरणार नाही किंबहुना तो हिम्मतच करणार नाही आणि सर्वत्र एकच हशा उमटले. मितभाषी पण अतिशय ठामपणे निर्णय घेणारा नेता अशी त्यांची कीर्ती होती.
Lal Bahadur Shastri Short essay Speech History in Marathi language
१९५६ सालच्या अरियालूर दुर्घटनेची पूर्णपणे जबाबदारी स्वीकारत त्यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी रेल्वेमंत्री म्हणून त्यांच्याच कारकिर्दीत रेल्वे इंजिनची निर्मिती संख्या १२० हुन ते २०० पर्यंत पोहोचली होती.
२७ में १९६४ रोजी पंडित नेहरुंचे निधन झाले आणि देशभर एकच संभ्रम निर्माण झाला. स्वतंत्र भारताचे १७ वर्ष नेहरुच्या देखरेखित सरली पण पुढे काय? ही पोकळी भरून काढण्यासाठी तितक्याच ताकदीच नेतृत्व म्हणून बहादुराना एकमताने प्रधानमंत्री करण्याचा निर्णय झाला. ह्यासाठी कॉंग्रेस तत्कालीन अध्यक्ष कामराज यांनी शर्थीचे प्रयत्न केले. २ जून १९६४ रोजी लाल बहादुर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे २ रे प्रधानमंत्री झाले. सर्वप्रथम त्यांनी देशातील परिस्थिती नियंत्रनात आणली. नेहरूंच्या जाण्याने पाकिस्तान आणि चीनला भारतावर आक्रमण करण्याची संधीच गवसली होती. एकीकडे देशातील अस्थिरता तर दुसरीकडे बाह्य धोका यातून देशाला सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्वाचे होते. ते शास्त्रीजिनी साध्य केले.
१९६५ ला पाकिस्तानने सीज फायर तोडत युद्ध पुकारले. तब्बल ४९ दिवस भारतीय सैनिकांनी हे आव्हान रोखून ठेवले आणि शेवटी युद्ध जिंकले! याच दरम्यान १९ ऑक्टूबर १९६५ ला शास्त्रीजिनी “जय जवान जय किसान” चा नारा दिला होता, या विजयामुळे देश पुन्हा एकवटला. शास्त्रीजींचे नेतृत्व सर्वतोपरी मान्य झाले.
१० जानेवारी इ.स. १९६६ च्या रात्री उजबेकिस्तानच्या राजधानी ताशकंदमध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपतती अयूब ख़ान सोबत युद्ध समाप्त करण्याच्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांचा अकस्मात मृत्यु झाला. हे गूढ़ उघड झाले नाही. शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा दावा आजही केला जातो. मृत्यूनंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते हा त्यांच्यावरील विषप्रयोगाचा पुरावाच असल्याचे अनेकांचे मत आहे.
इ.स. २००९ साली अरूण धर यांनी माहिती हक्काच्या कायद्यानुसार पंतप्रधान कार्यालयाकडे शास्त्रींच्या मृत्यूचे कारण जाहीर करण्याची विनंती केली पण पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यासाठी कारण देताना यामुळे आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता. देशात हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता आणि संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो असे नमूद करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने शास्त्रींच्या मृत्यूबाबत एक दस्ताऐवज आपल्याकडे असल्याचा दावा केला. मात्र तो उघड करण्यास नकारही दिला. तसेच त्यावेळच्या सोवियत रशियाने शास्त्रींचे पोस्टमॉर्टेम न केल्याचे मान्य केले पण शास्त्रींचे वैयक्तिक डॉक्टर आर. एन. चुग आणि काही रशियन डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचा अहवाल आपल्याजवळ असल्याचे मान्य केले. आपल्याकडील कोणताही दस्तऐवज नष्ट केलेला नाही वा गहाळ झालेला नाही हेसुद्धा पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले. मात्र भारताने त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम केले वा नाही, तसेच शास्त्रींच्या मृत्यूबाबत कोणतीही दुर्घटना घडवून आणण्यात आली होती वा कसे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जुलै, इ.स. २००९ पर्यंत तरी गृहमंत्रालयाने दिलेली नाही.
त्यांच्या देशाबद्द्लच्या योगदानाबाबत त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला. पंतप्रधानापदाचा व्याप संभाळतानां त्याना १८ तास काम कराव लागत असे. हे सगळ करतांना त्यांनी चेहर्यावरचे हसू कधीच गमावले नाही. भेटीस येणार्या प्रत्येक असामीची ते आस्थेनिशी चौकशी करत, त्यांची व्यथा जाणुन घेत आणि निरोप देताना थेट दारापर्यंत सोबत करत, आपल्या वाणीने कधीच कोणाला दुखावु नये, सत्याची वाट कधीच सोडू नये, मार्ग खडतर असेल पण कष्ट करत रहावे, जिद्द सोडू नये, शेवटी यश तुमचेच असेल. अशी शिकवण ते आपल्या मुलांना, नातवंडानां देत आले होते.
गृहमंत्री असताना त्यांचे राहते घर कर्जापाई नीलाम करण्यात आले. स्वताच्या पदाचा गैरवापर करणे त्याना कधीच मान्य नव्हते. अश्या हा भारतमातेचा “लाल” आपल्या “बहादुर” निर्णयांसाठी आणि आपल्या आदर्श आचार-विचारांसाठी सदैव स्मरणात रहिल.
दिग्विजय माने.
Lal Bahadur Shastri Short essay Speech History in Marathi language
लाल बहादूर शास्त्री निबंध भाषण माहिती मराठी
मित्रांनो, Lal Bahadur Shastri Information Biography in Marathi language Lal Bahadur Shastri Short essay Speech History in Marathi language लाल बहादूर शास्त्री निबंध भाषण माहिती मराठी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा.
या प्रकारची महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी कॉलेज कट्टा “college Catta” या आपल्या आवडत्या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या. college Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Lal Bahadur Shastri Short essay Speech History in Marathi language
लाल बहादूर शास्त्री निबंध भाषण माहिती मराठी
Pandit Jawaharlal Nehru Information Biography in Marathi Language
Leave a Reply