मी वास्तव जगाचा व त्यात राहणार्या जीवांचाच विचार करीत असतो. माणुसकीचे वागणे हाच मी माझा धर्म मानतो. असं सांगणारे आणि वागणारे ईश्वरचंद्र विद्यासागर यांना जाणून घेउयात… Ishwar Chandra Vidyasagar information Biography in Marathi ईश्वरचंद्र विद्यासागर मराठी माहिती

स्वातंत्र्यपूर्व काळात भारत ज्याप्रमाणे गुलामगिरिच्या साखळदंडात अडकला होता तसाच तो अनिष्ट चालिरीती,रूढि,परंपरा यांच्या दृष्टचक्रात गुरफटला होता. यातून बाहेर काढण्यासाठी भारताला फार मोठी समाजसुधारकांची परंपरा लाभली आहे. याच थोर परंपरेतील एक नाव म्हणजे ‘ईश्वरचंद विद्यासागर’ होय.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अस म्हणतात ही उक्ति ईश्वरचंद विद्यासागर यांना तंतोतंत लागू पडते विधवा पुनर्विवाहाच त्यांनी फक्त प्रचार आणि प्रसार नाही केला तर आपल्या मुलाचे लग्न देखील विधवेशी लाऊन दिले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे १८५६ साली विधवा विवाहाचा कायदा संमत झाला होता. तर आज आपण याच ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विषयी माहिती घेऊया.
Ishwar Chandra Vidyasagar information Biography in Marathi
ईश्वरचंद्र विद्यासागर मराठी माहिती
ईश्वरचंद विद्यासागर यांचे बालपण
बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक म्हणून ईश्वरचंद्र विद्यासागर यांना ओळखले जाते. २६ सप्टेंबर १८२० रोजी त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ठाकूरदास आणि आईचे नाव भगवतीदेवी असे होते. त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या जन्मगावी झाले. पुढील शिक्षणासाठी ते आपल्या वडिलांबरोबर कलकत्त्याला आले. कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयात त्यांचे उच्च शिक्षण पार पडले. हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. या परीक्षेत मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे ‘विद्यासागर’ ही उपाधी लावली होती. म्हणूनच पुढे त्यांच्या नावापुढील बंडोपाध्याय हे त्यांचे उपनाम मागे पडून विद्यासागर हेच नाव रूढ झाले.
ते अठरा वर्षांचे असतानाच त्याच महाविद्यालयात व्याकरणाचे वर्ग घेण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले. वयाच्या चौदाव्या वर्षी शत्रुघ्न भट्टाचार्य यांची कन्या दीनमयी देवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. पंडित ईश्वरचंद्र यांनी शिक्षणखात्यात शिक्षकापासून (१८४१) ते शिक्षण निरीक्षकाच्या हुद्यापर्यंत (१८५४–१८५८) काम केले. सरकारी शिक्षणखात्यात असताना त्यांनी ३५ नवीन बालिका विद्यालये उघडली. तसेच एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय व बंगालमधील प्रमुख शहरांत आदर्श (मॉडेल) विद्यालये शिक्षणखात्यातर्फे स्थापना केली. संस्कृत महाविद्यालयात पूर्वी ब्राम्हणेतर विद्यार्थांना शिक्षण मिळत नसे ते धोरण रद्द करून त्यांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांस मुक्त प्रवेश दिला.
१८५६ साली विधवाविवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
१८५८ साली अधिकाऱ्यांशी मतभेद झाल्याने शिक्षणखात्यातून ते बाहेर पडले. त्यापूर्वीच विधवांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष गेले होते. स्वतः संस्कृत पंडित असल्याने पराशर संहितेत विधवाविवाहास मान्यता असल्याचा दाखला त्यांनी काढून दाखविला.
विद्यासागर स्वतः कर्ते सुधारक होते. स्वतःच्या मुलींची लग्ने त्यांनी त्या चौदा-पंधरा वर्षांच्या होईपर्यंत केली नाहीत. आपल्या मुलाचे लग्न त्यांनी एका बालविधवेशी लावून दिले होते. कुलीन ब्राम्हणवर्गातील बहुपत्नीकत्वाची चाल, मद्यपान इ. अनिष्ट चालींविरुद्ध त्यांनी बंगालमध्ये चळवळी केल्या.
ईश्वरचंद्र विद्यासागर हे आधुनिक बंगाली गद्याचे जनक समजले जातात. त्यांची भाषा सुबोध व सामान्य जनांना सहज समजेल अशी आहे. बंगाली भाषेच्या प्रकृतीला अनुरूप अशी गद्यशैली त्यांनी प्रचलित केली आणि त्यामुळेच बंगाली गद्याच्या जनकत्वाचा मान त्यांना दिला जातो. त्यांच्या पूर्वी राजा राममोहन रॉय यांनी गद्यशैली रूढ केली होती पण ती पंडिती वळणाची होती. सर्वसामान्यांना ती सहजगम्य नव्हती. त्यांची स्वतःची प्रकृती तत्त्वचिंतकाची असल्याने भाषाशिल्पाकडे त्यांनी कधी लक्षच दिले नाही. ईश्वरचंद्रांची प्रकृती त्यांच्याहून भिन्न होती. ती जशी पंडिताची तशीच साहित्यरसिकाची व सामाजिक संस्कारकाची होती. म्हणून आजही त्यांचे साहित्य वाचले जाते. त्यांचे लेखन मुख्यतः बंगाली आणि संस्कृत भाषांत आहे. ईश्वरचंद्रांनी मुख्यतः शिक्षणाचा प्रसार, समाजसुधारणा आणि साहित्यनिर्मिती अशा त्रिविध भूमिकांतून लेखन केले.
सरकारी शिक्षण खात्यात कार्यरत असताना त्यांनी तब्बल ३५ नवीन बालिका विद्यालयांसह एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय तसेच बंगालमधील प्रमुख शहरांत आदर्श (मॉडेल) विद्यालयांची स्थापना केली. विशेष म्हणजे ज्या काळात संस्कृत महाविद्यालयांमध्ये केवळ ब्राह्मण विद्यार्थ्यांना प्रवेश होता त्या काळात त्यांनी हे धोरण मोडीत काढून समाजातील सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली. शिक्षणाप्रमाणेच समाजातील अन्य अनिष्ट रुढी-परंपरांच्या समूळ उच्चाटनासाठी पंडीत ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी काम केले. यामध्ये विधवांच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिले.
बंगालमधील अनेक अनिष्ट चालींविरुद्ध त्यांनी चळवळी उभ्या केल्या. शिक्षणतज्ज्ञ, समाज सुधारकाप्रमाणेच ते बंगालमधील नामवंत साहित्यिक सुद्धा होते. त्यांना आधुनिक बंगाली गद्याचे जनक म्हटले जाते. त्यांनी मुख्यतः बंगाली आणि संस्कृत भाषांमध्ये लेखन केले. त्यांच्या लेखनामध्येही शिक्षण प्रसार, समाजसुधारणा आणि साहित्यनिर्मिती अशा त्रिविध भूमिका दिसतात. संस्कृत भाषेचे अध्ययन सुलभ व्हावे यासाठी त्यांनी बोधोदय (१८५१), उपक्रमणिका (१८५१), ऋजुपाठ (३ भाग, १८५१-५२), व्याकरण कौमुदी (३ भाग, १८५३ व १८६२) व वर्णपरिचय (२ भाग, १८५५) हे ग्रंथ लिहिले. संस्कृत भाषेप्रमाणेच बंगाली भाषेतही त्यांनी उत्कृष्ट लेखन केले. बंगाली भाषा शिकण्यासाठी त्यांनी १८५६ मध्ये कथामाला तसेच शब्द मंजरी नावाचा शब्दकोश तयार केला. बांगलार इतिहास (१८४८), जीवन चरित (१८४९), चरितावलि (१८५६) आणि भूगोल-खगोल-वर्णन (१८९२) हे ग्रंथ त्यांनी लिहिले. १८४७ मध्ये प्रकाशित झालेली त्यांची पहिली साहित्यकृती वेताल पंचविंशति ही सुलभ बंगाली भाषेचे प्रतिक म्हणून आजही ओळखली जाते.
कलकत्त्यास भरलेल्या दरबारात त्यांना इंग्लंडच्या राणीकडून १८७७ साली बहुमानाची सनद मिळाली व पुढे ‘सी. आय्. इ.’ ही पदवीही मिळाली. वैयक्तिक आचरणात विद्यासागर अत्यंत साधे परंतु निर्भय होते. समाजसुधारणेच्या बाबतीत विद्यासागर हे राजा राममोहन रॉय यांचे वारसच म्हणावे लागतील. त्यांच्या सामाजिक कार्यामागील निकोप बुद्धिवाद त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्यापासूनच उचलला होता .ईश्वरचंद्रांनी आपल्या आयुष्यात पुष्कळ धन मिळविले पण ते सारे त्यांनी दुःखी, कष्टी, दलित, अपमानित, उपेक्षित ह्यांच्या साह्यार्थ खर्चिले. त्यांची स्वतःची राहणी अगदी साधी होती. ते अज्ञेयवादी होते. देव, धर्म, अध्यात्म इत्यादींच्या गुंत्यात त्यांनी स्वतःला कधीच अडकवून घेतले नाही. ‘मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवांचाच विचार करीत असतो. माणुसकीचे वागणे हाच मी माझा धर्म मानतो’, असे ते म्हणत. हा आपला धर्म त्यांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत निष्ठापूर्वक आचरिला आणि त्यामुळे सारे जग त्यांना ‘विद्यासागर’ म्हणून ओळखीत असले, तरी बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना ‘दयासागर’ म्हणूनच अधिक ओळखते.
स्वतःकडील धनाचा वापर पंडीत ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी समाजातील दुःखी, कष्टी, दलित, अपमानित, उपेक्षित यांच्या मदतीसाठी खर्च केला. अज्ञेयवादी असलेले ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आजीवन स्वतःला देव, धर्म, अध्यात्म यांपासून दूर ठेवले. समाजातील अनिष्ट रुढींविरोधात आजीवन कार्य केलेल्या थोर समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी २९ जुलै १८९१ रोजी जगाचा निरोप घेतला.
अक्षय जाधव.
कॉलेज कट्टा.
मित्रांनो,Ishwar Chandra Vidyasagar information Biography in Marathi ईश्वरचंद्र विद्यासागर मराठी माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ! \
Leave a Reply