गुरु-शिष्याची महान परंपरा भारतात आहे. ज्या महान गुरुं कडून आपण ज्ञान मार्गदर्शन प्राप्त केले. गुरूंचा प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस. Guru Purnima Information Details Mahiti in Marathi Language
Guru Purnima Information Details Mahiti in Marathi Language
गुरुपौर्णिमा विषयी माहिती निबंध भाषण मराठी
गुरु हा संतकुऴीचा राजा | गुरु हा प्राणविसावा माझा |
गुरुवीण देव दुजा | पाहता नाही त्रिलोकी |
Guru Purnima Nibandh short Essay Bhashan Speech in marathi language
वरील काव्यपंक्तीतून गुरु शब्दाची निश्चितच प्रचिती येते, कारण गुरूला आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. तसं पाहिलं तर माणूस हा जन्मताच गुरु करून येतो. आता आपल्याला प्रश्न पडेल की ते कसं? तर आई! आई आपल्या जीवनातील आद्य गुरु आहे आणि आई इतक श्रेष्ठ दैवत या जगतावर नाही असं स्वामी समर्थानी लिहिलं आहे.
याच गुरुच्या चरणी लीन होण्यासाठी आणि गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आषाढ शुद्ध पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. याच पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं देखील म्हणतात.
आपल्या भारत देशाच एक वैशिष्ट्य म्हणलं तरी वावगं ठरणार नाही ते वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. गुरुच आपणाला अज्ञानातून बाहेर काढतात. प्रथम आपण ‘गुरु’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे. गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे हे आपल्याला शिकवतात आणि प्रकाशाच्या म्हणजे योग्य वाटेवर चालण्यास प्रवृत्त करतात.
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा आहे. अंधकाराचा नाश करून प्रकाशाचा किरण देणारा गुरु असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद हे एकच होते. त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे.
आषाढ पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा का साजरी करतात ?
आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे. आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली.
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता दिसून येते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. या विभूतींनीच जगाला गुरुचे महत्व पटवून दिलंय मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. एकलव्याने गुरूचा पुतळा बनवून त्याच्यासमोर धनुर्विद्या ग्रहण केली होती. एकलव्याला शिकण्यासाठी मनाई केली होती. तरीदेखील आपल्या मनोमन मानलेल्या गुरूचा त्याने अनादर न करता धनुर्विद्या प्राप्त करून झाडाच्या फांदीवर बसलेल्या पक्षाचा डोळा फोडला आणि गुरुदक्षिणेत आपल्या उजव्या हाताचा अंगठा दिला.
भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाला गुरु मानून विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. हेच विसोबा खेचर नामदेवांच्या अंगावर पण खाऊन कितीतरी वेळा थुंकले होते. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची. तो हा दिवस होय. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे.
जलाशयात पाणी पुष्कळ आहे परंतु घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवावे. गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ? अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात. अश्या पद्धतीने गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे.
आज गुरूचा अपमान केल्याचा घटना घडत आहेत. त्याचबरोबर काही गुरु देखील आपले काम चोख पार पाडत नाहीत. या सगळ्याला कारण म्हणजे जो तो आपले उद्देश विसरला आहे पण आजही गुरु-शिष्याच नात हे महान आहे. आजीही महान गुरु आणि नम्र शिष्य आहेतच.
ज्ञान, माहिती आज सर्वत्र उपलब्ध आहे. पुस्तकांच्या, इंटरनेटच्या आणि इतर माध्यमांचा स्वरुपात पण उचित मार्गदर्शन (जे गुरुशिवाय मिळू शकत नाही) नसेल तर ज्ञानाचा उपयोग कशासाठी करायचा हे शिष्याला लवकर समाजत नाही. एक चांगला गुरु चांगला माणूस घडवत असतो.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll
गुरुपौर्णिमेचा शुभेच्छा.
मित्रांनो Guru Purnima Information Details Mahiti in Marathi Language Guru Purnima Nibandh short Essay Bhashan Speech in marathi language गुरुपौर्णिमा विषयी माहिती निबंध भाषण मराठी
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेद्वारे अवश्य कळवा. कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला आपल्या संस्कृती विषयी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी पुन्हा आवश्य भेट द्या कारण कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
-प्रियांका पुंड.
Leave a Reply