जीडीपी काय आहे जीडीपी कशा पद्धतीने मोजला जातो. भारताच्या एकूण जीडीपी पैकी या क्षेत्राचा जीडीपी जास्त आहे जाणून घ्या GDP information in marathi
जीडीपी माहिती जीडीपी म्हणजे काय ?
कोरोनाच्या काळात आपण रोज ऐकत आलोय भारताचा जीडीपी घसरला. पुढील तिमाही मध्ये जीडीपी मध्ये इतक्या टक्यांची वाढ अपेक्षित आहे. सर्वसामान्य माणूस रोज अश्या गोष्टी ऐकत आलाय पण जीडीपी म्हणजे नक्की काय तो कसा मोजतात देशावर त्याचा काय परिणाम होतो या भानगडित सामान्य माणूस पडत नाही. एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्था आणि तिच्या परिणामकतेचं हे एक अतिशय महत्वाचं समग्र आर्थिक एकक आहे. अंतर किंवा वेग किंवा वेळ मोजण्यासाठी जसे जागतिक पातळीवर आपण मेट्रिक पद्धत वापरतो त्यानुसारच अर्थव्यवस्थेची तब्येत समजून घेण्यासाठी जीडीपी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरले जाणारे एक मानक आहे. याचा थेट संबंध गरिबी, आरोग्य व्यवस्था, साक्षरता, बेरोजगारी अश्या अर्थव्यवस्थेच्या महत्वाच्या घटकांशी आहे. कोणतीही अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी तिच्या ‘जीडीपी’चा अभ्यास गरजेचं ठरतो.
GDP full form in Marathi Gross Domestic Product
सेवा क्षेत्रात भारतीय जीडीपी चा किती टक्के वाटा आहे
सेवा क्षेत्र 53.89%, औद्योगिक क्षेत्र 25.92% , कृषी 20.19%, यांचा क्रमाने भारतच्या जीडीपी मध्ये वाटा आहे
जीडीपी’ची गणना करताना अर्थव्यवस्थेच्या आठ महत्वाच्या विभागातून माहिती गोळा केली जाते, यात, कृषी; खाणकाम; उत्पादन; जंगले आणि मासेमारी; वीज आणि गॅस पुरवठा; बांधकाम, व्यापारउदीम, हॉटेल, वाहतूक आणि संपर्क; वित्त, स्थावर मालमत्ता क्षेत्र आणि विमा, व्यापारविषयक, सामाजिक आणि सार्वजनिक सेवा यांचा समावेश होतो.
भारतात जीडीपी मोजण्यासाठी कोणते मंत्रालय जबाबदार आहे
जीडीपी दोन पद्धतीचे असतात एक नॉमिनल जीडीपी आणि दुसरा असतो तो रियल जीडीपी होय.
- नॉमिनल जीडीपीमध्ये सर्व आकडे सध्याच्या किमतीचा विचार करून मांडले जातात. तर रियल जीडीपीमधील आकडेवारी ही महागाईचा परिणाम विचारात घेऊन त्यानुसार त्यात घट वजा करून सांगितले जातात.
- एखाद्या राष्ट्राचा जीडीपी हा त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पादन (Production), राष्ट्रीय उत्पन्न (Income) किंवा राष्ट्रीय खर्च (Expenditure) यावरून ठरवता येतो.
- राष्ट्रीय उत्पादनांवरून जीडीपी मोजताना फक्त शेवटचे/अंतिम व्यवहारच ग्राह्य़ धरले जातात. इतर मधले (Intermediate) व्यवहार वगळून जी वस्तू आणि सेवांच्या उत्पादनांची किंमत राहते, तोच जीडीपी. उदा. कापसापासून बनवलेले कापड, कापडापासून बनवलेले कपडे आणि कपडय़ांची विक्री यांत अंतिम व्यवहार हा कपडय़ांच्या विक्रीचा असतो; म्हणून तोच फक्त जीडीपीमध्ये पकडला जातो. तसे न केल्यास, किंमत दोनदा जीडीपीमध्ये मोजली जाण्याचा धोका असतो. राष्ट्रीय उत्पन्नावरून जीडीपी मोजताना राष्ट्रातल्या सर्व लोकांचे त्या वर्षांचे उत्पन्न मोजले जाते. उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचे पगार, जमिनीचे व उपकरणांचे भाडे, दिलेल्या कर्जावर मिळणारे व्याज आणि उद्योगातून होणारा नफा.. अशा सर्व उत्पन्नांना मिळून जीडीपी मोजला जातो. राष्ट्रीय खर्चाच्या दृष्टीने जेव्हा जीडीपी मोजला जातो तेव्हा त्यात ग्राहकांचा खर्च (Consumption), उद्योगांनी केलेली गुंतवणूक (Investment) आणि सरकारी खर्च (Government Spending) यांचा विचार केला जातो. तसेच आयातीमुळे राष्ट्राचा खर्च वाढतो (त्याचा फायदा राष्ट्रातील कोणालाच उत्पन्नाच्या स्वरूपात मिळत नाही) आणि निर्यातीमुळे राष्ट्राचे उत्पन्न वाढते (राष्ट्रातील कोणाचाच खर्च न वाढता); त्यामुळे हा आयात-निर्यातीतील फरक (निर्यात-आयात) जीडीपीमध्ये धरावा लागतो. राष्ट्रीय खर्च विचारात घेऊन जीडीपी मोजण्यासाठी
जीडीपी = खाजगी वापर+ एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात – आयात) महागाई दराचा सूचक असल्या कारणाने, यामध्ये जीडीपी डिफ्लेटर अतिशय महत्वाचा असतो. जीडीपी डिफ्लेटर= {(नॉमिनल जीडीपी) / (रिअल जीडीपी) } * 100.
राष्ट्रीय उत्पन्नावरून जीडीपी मोजताना राष्ट्रातल्या सर्व लोकांचे त्या वर्षांचे उत्पन्न मोजले जाते. उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचे पगार, जमिनीचे व उपकरणांचे भाडे, दिलेल्या कर्जावर मिळणारे व्याज आणि उद्योगातून होणारा नफा.. अशा सर्व उत्पन्नांना मिळून जीडीपी मोजला जातो.
राष्ट्रीय खर्चाच्या दृष्टीने जेव्हा जीडीपी मोजला जातो तेव्हा त्यात ग्राहकांचा खर्च (Consumption), उद्योगांनी केलेली गुंतवणूक (Investment) आणि सरकारी खर्च (Government Spending) यांचा विचार केला जातो. तसेच आयातीमुळे राष्ट्राचा खर्च वाढतो (त्याचा फायदा राष्ट्रातील कोणालाच उत्पन्नाच्या स्वरूपात मिळत नाही) आणि निर्यातीमुळे राष्ट्राचे उत्पन्न वाढते (राष्ट्रातील कोणाचाच खर्च न वाढता); त्यामुळे हा आयात-निर्यातीतील फरक (निर्यात-आयात) जीडीपीमध्ये धरावा लागतो. राष्ट्रीय खर्च विचारात घेऊन जीडीपी मोजण्यासाठी :
C (Consumption ) + I (Investment) + G (Government Spending) + (X (Export) – M (Import )) असे समीकरण वापरण्यात येते. सोप्या शब्दांत सांगायचे, तर या पद्धतीत अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांवर झालेला खर्च मोजण्यात येतो.
आता ही गणिती समीकरणे आणि मोजमापातील गुंतागुंत बघून थोडं घाबरायला होत असेल, तर साहजिकच हे सर्व मोजतं कोण, असा प्रश्न पडतो. भारतात ‘केंद्रीय सांख्यिकी संस्था’ (Central Statistics Office – CSO) या सरकारी संस्थेची ही जबाबदारी आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षणांवरून आणि निर्देशाकांवरून (Indexes) माहिती गोळा केली जाते आणि त्यावरून वार्षिक व तिमाही जीडीपी घोषित केला जातो. वर सांगितलेल्या पद्धतीवरून काढण्यात आलेल्या जीडीपीला ‘नॉमिनल जीडीपी’ असे म्हणतात. एखाद्या वर्षी महागाईमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या, तर या वाढलेल्या किमतीमुळे जीडीपीही वाढलेला दिसतो- जरी इतर कोणत्याही प्रकारे अर्थव्यवस्था वाढली नाही तरीही! अशा वेळेस महागाईचा परिणाम जीडीपीमध्ये मोजला जाऊन ‘खरा’ जीडीपी काढला जातो- ज्याला ‘रिअल जीडीपी’ असे म्हणतात.
आज सर्वसामान्यपणे जीडीपी हे एखाद्या राष्ट्राच्या आर्थिक प्रगतिपुस्तकासारखं वापरलं जातं. अर्थव्यवस्थेची ताकत आणि वाढ त्यावरून ठरवली जाते. पण जीडीपीच्या वापरावरही काही मर्यादा आहेत. जीडीपी फक्त विक्री झालेल्या वस्तूच मोजते. काळा बाजार किंवा वस्तू विनिमय (बार्टर) यातील व्यवहार जीडीपीच्या कक्षेबाहेरच राहतात आणि त्याची कल्पना जीडीपी पाहून येत नाही. उद्योगांचा पर्यावरणावरचा परिणाम आणि वाढलेलं प्रदूषण हे जीडीपीमध्ये मोजलं जात नाही. नफेखोरीसाठी पर्यावरणाकडे दुर्लक्ष झालं तर अशी प्रगती फार काळ टिकवून ठेवता येत नाही आणि त्याचा विचार जीडीपीमध्ये होत नाही. तसेच जीडीपीचा आधार हा आर्थिक व्यवहार हाच असल्याने, वस्तू व सेवांची वाढलेली गुणवत्ता आणि त्या अनुषंगाने झालेल्या प्रगतीचे मोजमाप जीडीपी करू शकत नाही. उदाहरणार्थ, दहा वर्षांपूर्वी आपण वापरत असलेले मोबाइल फोन आजच्या स्मार्ट फोनपेक्षा गुणवत्तेने
कमी असूनसुद्धा किमतीने जास्त होते. थोडक्यात, दहा वर्षांपूर्वीच्या फोनचा जीडीपीमध्ये आजच्यापेक्षा मोठा वाटा होता. एखाद्या राष्ट्राचा जीडीपी खूप जास्त असला म्हणजे त्या राष्ट्राची सर्वागीण प्रगती होते आहे असे मानणेही चुकीचे आहे. जर संपत्ती फक्त काही लोकांकडेच जमा होत असेल, तर त्यामुळे समाजातील आर्थिक विषमता वाढते.
२०१७ – १८ च्या शेवटच्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ७.७% च्या आसपास होता आणि त्या निकषाच्या आधारे भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होती. भारतीय प्रसारमाध्यमे देखील तेलाच्या किमती, रुपयाचे मूल्य, बँकेचे एनपीए अश्या नकारात्मक आर्थिक निकषांवर बारकाईने लक्ष ठेऊन असते, पण $5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याकरता नक्की काय करावे यावर फारशी कुठे चर्चा होताना दिसत नाही. बऱ्याचदा त्याबद्दलचा सूरही नकारात्मकच असतो. फास्ट फूड आणि ब्रेकिंग न्यूजच्या आजच्या जमान्यात, कोणत्याही नकारात्मक मुद्द्यावर, राजकारण आणि अनास्थेला दोष देणे खरेतर सोपे आहे, पण भारतासारख्या खंडप्राय महाकाय देशात, मुळात कोणताही निर्णय घेणे, त्याची अंमलबजावणी करणे आणि त्याचे परिणाम दिसून येणे याला थोडातरी वेळ लागणारच, हेच आपण बऱ्याचदा विसरतो.
एकंदरीत जीडीपी केवळ आर्थिक व्यवहाराचेच मोजमाप करते. निश्चितच ते एक महत्त्वाचे साधन आहे, पण प्रगती म्हणजे केवळ आर्थिक प्रगतीच का? आरोग्य, प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि विकासाचा फायदा समाजातील सर्वाना होतो आहे का, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. जीडीपीच्या या मर्यादांमुळे Human Development Index (HDI), Genuine Progress Indicator (GPI), Happy Planet Index (HPI) असे इतर काही निर्देशांक वापरण्यात येत आहेत- जे केवळ आर्थिकच नाही, तर एकंदरीत जगण्याची गुणवत्ता मोजण्याचा प्रयत्न करतात. शेवटी या निर्देशांकांतून, आकडेमोडीतून आणि मोजमापातून आपण एकाच प्रश्नाचं उत्तर निरंतर शोधत आहोत- सुख म्हणजे नक्की काय असतं?
-अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
GDP information in marathi
GDP full form in Marathi Gross Domestic Product
जीडीपी म्हणजे काय
भारतात जीडीपी मोजण्यासाठी कोणते मंत्रालय जबाबदार आहे
सेवा क्षेत्रात भारतीय जीडीपी चा किती टक्के वाटा आहे
Leave a Reply