रूढीवादी विचारांचा पगडा असलेल्या काळात गॅलिलिओ ने सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते अस ठणकावून सांगितल्यावर त्याला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा दिली. वाचा काय किस्सा आहे… Galileo Galilei Information Biography in Marathi शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली शोध मराठी माहिती
Galileo Galilei Information Biography in Marathi
शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली शोध मराठी माहिती
“All truths are easy to understand once they are discovered; the point is to discover them”.
वरील वाक्यप्रमानेच गॅलिलिओ यांनी अवकाशातील शोध घेण्यासाठी आधुनिक दुर्बीन बनवली. व अवकशाचे न उलगडलेलं रहस्य मानवाला उलगडायला मदत झाली.
गैलीलियो गैलिली हे इटली या देशांतील एक महान भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म सन १५ फेब्रुवारी १५६४ साली इटली देशांतील पिसा नावाच्या शहरात झाला होता. गैलीलियो यांचा ज्या वर्षी जन्म झाला होता त्या वर्षी विल्यम शेक्सपिअर यांचा देखील जन्म झाला होता आणि मायकल ॲन्जेलो यांचे निधन झाले होते. त्यामुळे सन १५६४ या वर्षाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं आहे.
गॅलिलिओ हे आपल्या सात भावडांपैकी सर्वात मोठे होते. तसचं, त्यांचे वडिल एक प्रसिद्ध संगीतकार होते. गैलीलियो यांच्या वडिलांनीच त्यांना मुक्त विचार करण्याची महत्वपूर्ण शिकवण दिली. त्यामुळेच ते एक महान वैज्ञानिक बनू शकले. अनेक लोक गैलीलियो यांना एक महान खगोलतज्ञ म्हणून ओळखतात. ज्यांनी खगोलीय दुर्बिणीमध्ये सुधार करून तिला आधुनिक स्वरूप प्राप्त करून दिले. तसचं, आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी खगोल विज्ञान क्षेत्राला एक नविन दिशा दिली.
Galileo Galilei Information Biography in Marathi
शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली शोध मराठी माहिती
गॅलीलियो गॅलिली यांच्या बाबत बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की, ते एक खगोल शास्त्रज्ञ असण्याबरोबरच एक कुशल गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, आणि तत्त्वज्ञ देखील होते. ज्यांनी युरोप देशांत वैज्ञानिक क्रांती करिता खूप महत्वपूर्ण योगदान दिले. म्हणून, ‘गॅलीलियो गॅलिल’ यांना ‘आधुनिक खगोल विज्ञानाचे जनक’ आणि ‘आधुनिक भौतिकशास्त्राचे जनक’ म्हटल जाते. गॅलीलियो यांनी तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला होता, तरी सुद्धा त्यांची वृत्ती धार्मिक भावनांसोबत जोडल्या गेली होती. असे असले तरी ते आपल्या प्रयोगाच्या प्रात्यक्षिकरण करतांना आपल्या जुन्या मान्यताच्या विरुद्ध जावून त्यांची पूर्णपणे व्याख्या करीत असत.
इटली येथील सागरी किनाऱ्यावर बसून तासोन तास समुद्राच्या लाटांचे निरक्षण करीत असतं. कश्या प्रकारे समुद्राच्या लाटांची उंची वाढते किंवा घटते तसचं, कश्या प्रकारे समुद्राला भरती आणि आहोटी येते.या सर्व गोष्टींचे ते खूप बारकाईने निरक्षण करत असतं. समुद्राला येत असलेल्या भरती आणि आहोटीच्या निरीक्षणाच्या माध्यमातून त्यांनी पुर्थ्वीचे परिवलन आणि परिभ्रमणाचा सिद्धांत मांडला. आपल्या या सिद्धांताबाबत त्यांचे असे मत होते की, समुद्राच्या पाण्याला येत असलेली भरती आणि आहोटी ही पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमणामुळेच होते. परंतु, जर्मन खगोल शास्त्रज्ञ जोहान्स केपलर यांनी गॅलीलियो गॅलिली यांचा समुद्राच्या बाबतीत असलेला सिद्धांत मोडीत काढून समुद्राला भरती आणि आहोटी ही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
गॅलिलिओने दुर्बिणीतून असंख्य गोष्टी अभ्यासल्या. शुक्राच्या कला पाहिल्या. गुरू आणि गुरूभोवती फिरणारे चार चंद्र पाहिले. खरे तर गॅलिलिओला नेपच्यूनच्या शोधाचा मानही मिळाला असता. गुरूजवळ तेव्हा नेपच्यून होता. पण सूर्यमालिकेत असे काही अज्ञात ग्रह असतील असा विचारही तेव्हा शिवला नव्हता. इतकेच कशाला, पृथ्वी सूर्याभोवती फिरते यावरच कोणाचा विश्वास नव्हता. त्यामुळे सूर्याभोवती फिरणारा ग्रह अस्तित्वात असण्याचा प्रश्नच नव्हता. आपल्या या निरीक्षणांवर आधारित ‘स्टारी मेसेंजर’ नावाचे पुस्तक 1610 मध्ये गॅलिलिओने प्रसिद्ध केले. शुक्राला कला कशा काय असतात? गुरूभोवती छोटे गोल फिरू शकतात? मग सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह का फिरू शकणार नाहीत?असे प्रश्न त्यामध्ये उपस्थित केले होते
पृथ्वी सूर्याभोवती का सूर्य पृथ्वी भोवती फिरतो ?
- कोपर्निकसने(1473-1543) मांडलेल्या सूर्यकेंद्री सिद्धांतात तथ्य असले पाहिजे, असे गॅलिलिओला वाटू लागले.
- 1615 च्या दरम्यान त्याने या सिद्धांताला उघडपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि इथेच समाज आणि व्यक्ती हा संघर्ष सुरू झाला. समाजाची वैचारिक धारणा प्रस्थापितावर विश्वास ठेवणारी असते. नव्या कल्पना, नवे विचार जर प्रस्थापितांविरुद्ध असतील तर ते समाजाला मुळीच खपत नाही. शास्त्रीयच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही हे घडते. नव्या विचारांना हाणून पाडण्यासाठी मग धर्म आणि धर्मग्रंथांचा आधार घेतला जातो. या गोष्टी धर्ममार्तंडांना सोयीच्या असतात. कारण याआधारे सामान्य जनतेला नवविचारांपासून दूर ठेवता येते.
- कॅथॉलिक चर्चने गॅलिलिओला पाखंडी ठरवले आणि त्याने सूर्यकेंद्री सिद्धांताचा प्रचार करू नये असे फर्मान काढले.
- 1624 नंतर आलेला पोप आपल्या विचारांना अनुकूल आहे असे वाटल्यावरून गॅलिलिओने पुन्हा एक पुस्तक लिहिले. पण पुस्तकाचा कल सूर्यकेंद्री रचनेकडे झुकतो आहे असे वाटल्यावरून पुन्हा एकदा त्याच्या पुस्तकावर बंदी आणली गेली.
- 69 वर्षांच्या गॅलिलिओला दम देण्यात आला. पाखंडी मताचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. त्याला तुरुंगात डांबण्यात आले आणि तेसुद्धा मरेपर्यंत. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही हे त्याच्याकडून बळजबरीने वदवून घेण्यात आले.
- गॅलिलिओवरचे हे आरोप 31 ऑक्टोबर 1992 या दिवशी चर्चने अधिकृतपणे मागे घेतले. वास्तववादी विचार मान्य करण्याची घोषणा करण्यास 350 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला आणि तेही गॅलिलिओच्या त्यागानंतर. केवळ विचाराने आणि तर्काने या विश्वाचे नियम उलगडून दाखवता येतात या अॅरिस्टॉटलच्या मतांना धक्का देणारा आणि या तत्त्वज्ञानाला विरोध करणारा माणूस म्हणून गॅलिलिओने केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे.
आपल्याला सगळ्यांना आज पण वाटते की जर एखादी जड आणि हलकी वस्तु ऊँचीवरून सोबत खाली सोडली तर जड वस्तु आधी जमिनीवर पोहचेल पण गैलिलियो ने हे प्रोयोगाने चुकीचे ठरवले पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने वस्तू खाली खेचल्या जातात. त्यांचा वेग वाढत जातो, पण वेगातील ही वाढ त्या वस्तूंच्या आकारावर किंवा वस्तुमानावर अवलंबून नसते हे सिद्ध करायला फार मोठा आटापिटा करावा लागत नाही. साध्या प्रयोगाने गॅलिलिओने हे सिद्ध केले. आपल्याला सत्य वाटणा-या गोष्टींची सत्यता प्रयोगाने पडताळून पाहण्याची मानसिकता निर्माण करणे हे गॅलिलिओचे मोठे योगदान आहे.
अशा प्रकारे ज्या काळी प्रचलित गोष्टींविरुद्ध बोलणे हे जोखमीचे काम होते नवीन विचार आणि तर्क समाजात स्विकारले जात नसत. त्यावेळी गैलिलियो सारख्या लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोण जगापुढे ठेवला व लोकांना विचार करण्यास प्रव्रुत्त केले. त्यांच्या खगोल शास्रातील योगदान महत्वाचे आहेच पण लोकांच्या मानसिकतेत आणि विचार करण्याच्या पद्धतित या लोकांनी जो बदल केला ना तो खुप महत्वाचा आहे.
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
Galileo Galilei Information Biography in Marathi
शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली शोध मराठी माहिती
Galileo Galilei Essay Speech in Marathi
Leave a Reply