अब्दुल कलाम हे आपल्या देशाला मिळालेली अशी प्रेरणा आहे जी भारतवासीयांना देशासाठी आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सतत प्रेरित करते. वृत्तपत्र विक्रेता ते मिसाईल मॅन, राष्ट्रपती हा प्रवास कायम प्रेरनादाई आहे. Dr Apj Abdul Kalam Indian Scientist Information Biography in Marathi language
Dr Apj Abdul Kalam Indian Scientist Information Biography in Marathi language
शास्त्रज्ञ डॉ ए पी जे अब्दुल कलाम निबंध माहिती मराठी
अस बोलतात की ज्याच “DESIRE” जितकं मोठं त्याच “SUCCESS” तितकंच मोठं असत.
ही गोष्ट आहे रामेश्वरम या छोट्या खेड्यात राहणाऱ्या मुलाची ज्याला लहानपणी आकाशात उडणाऱ्या विमानाचं आणि पक्षांचं कुतूहल वाटायचं आणि तो बोलायचा मी पण एक दिवस असाच उडणार आकाशात.
ही कहाणी आहे एका पेपर विकणाऱ्या मुलाची जो पुढं जाऊन भारताचा “MISSILE MAN” म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या महान शास्रज्ञाची.
ही कहाणी आहे विद्यार्थ्यांसाठी जगात सर्वात मोठी “INSPIRATION” असणाऱ्या तत्वज्ञाची.
ज्याचे चरित्र वाचताना आणि ऐकताना आजही लाखो धेयवेड्या तरुणांच्या नसानसांत ध्येय साध्य करण्याची स्फूर्ती जागते अश्या तरुणांचे स्फूर्तीस्थान असणाऱ्या असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या एका सामान्य माणसाची.
ही कहाणी आहे भारताच्या सर्वात लोकप्रिय माझी राष्ट्रपतींची आणि भारताच्या एका महान वैद्यानिकाची ज्यांच्या कष्टाची फळे आज आपण खात आहोत.
ही कहाणी आहे माझ्यासारख्या लाखो ध्येयवेड्या तरुणांचे प्रेरणास्त्रोत असणाऱ्या डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम साहेबांची.
Essay on my Favourite Scientist Apj Abdul Kalam in Marathi language
डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांचे बालपण
15 ऑक्टोबर 1931 रामेश्वरम येथे एका मध्यमवर्गीय तमिळ परिवारात त्यांचा जन्म झाला.
त्यांचे मूळ नाव “Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam ” असे होते.
रामेश्वरम मध्ये त्यांच्या खानदानी घरात ते राहत होते.
त्यांचे वडील त्यांना सांगत असत जेव्हा अडचण येईल तेव्हा अडचणीचे कारण समजून घ्यायला शिक अडचणी कायम स्वतःला ओळखायला शिकवतात.
कलाम ह्या गोष्टींवर विश्वास ठेवायचे की आपल्यावर पण एक शक्ती आहे जी आपल्याला कायम अडचणींतून मुक्त करते आणि स्वतःला ओळखायला मदत करते.
त्यांच्या बहिणीचे पती अहमद जलालूद्दीन कालामांपेक्ष 15 वर्षांनी मोठे होते तरी त्यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री झाली होती.
जलालूद्दीन जास्त शिकलेले नव्हते पण त्या काळी त्यांच्या इलाख्यात फक्त त्यांनाच इंग्रजी लिहिता आणि वाचता येत होतं.
कलमांच्या चाचाचा मुलगा शमसुद्दीन यांच्याकडे रामेश्वरम मध्ये पेपरचे दुकान होते.
तो सगळे काम एकटाच करत होता दर सकाळी पेपर रामेश्वरम स्टेशन वर ट्रेनने येत होते पण 1939 ला दुसरे महायुद्ध चालू झाले त्यावेळी कलाम 8 वर्षांचे होते आणि रामेश्वरम मध्ये ट्रेन थांबणं बंद झालं आणि पेपरचा गठ्ठा हा रामेश्वरम आणि धनुषपुडीच्या मधल्या रस्त्यावर चालत्या गाडीतून टाकला जात असे शमसुद्दीनला आता मदतीची गरज लागू लागली आणि ते काम कलामांना मिळाले आणि अश्या तर्हेने शमसुद्दीन कलामांच्या पहिल्या कमाईचा मार्ग झाला.
कलामांना वडिलांकडून स्वशिस्त आणि स्वाभिमानाचे धडे मिळाले होते तर आईकडुन चांगल्या कर्मावर विश्वास आणि संवेदनशीलतेचा वारसा मिळाला होता त्यांचा कलामांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला.
शमसुद्दीनच्या सोबतीचा त्यांच्यावर जो परिणाम झाला त्याने त्यांचे फक्त बालपणच नाही तर संपूर्ण जीवन बदलले.
दुसरे महायुद्ध समाप्त झाले आणि भारताचे स्वातंत्र्य आता निश्चित झाले कलामांनी त्यांच्या वडिलांकडून रामेश्वरम सोडायची परवानगी घेतली त्यांना डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर रामनाथपुरम ला जाऊन पुढील शिक्षण घ्यायचे होते शमसुद्दीन आणि जलालूद्दीन त्यांना सोडवायला गेले रामनाथपुरम ला गेले SCHWARTZ Higher secondary school मध्ये कलामांचे शिक्षण चालू झाले.
तिकडचे नवीन वातावरण कलामांना जास्त आवडले नाही त्यांना घरची आठवण यायची जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा ते घरी जायचे.
त्यांचे शिक्षक ऐय्यादुराई सोलमन एक चांगले मार्गदर्शक होते तेथे त्यांचे संबंध गुरू शिष्या पेक्षा पुढं गेले होते.
ऐय्यादुराई बोलत असत जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर 3 गोष्टी लागतात इच्छा, विश्वास आणि आशा.
1950 मध्ये ते Saint Joseph’s College, Tiruchirappalli मध्ये BSC करण्यासाठी गेले.
BSC पास होई पर्यंत त्यांना माहितीच नवते आपल्याला काय करायचे आहे ते BSC पास केल्यावर त्यांना कळाले की PHYSICS त्यांचा विषय नाही.
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला engineering मध्ये जायला पाहिजे होत असे त्यांना वाटले.
एम आय टी मधील शैक्षणिक प्रवास
कस तरी ते MIT (Madrass Institute of Technology) च्या उमेदवारांच्या यादित आले.
पण तिथं प्रवेश घ्यायला जास्त पैसे लागत कमीत कमी 1000 रुपयांची गरज होती पण त्यांच्या वडीलांकडे तेवढे पैसे नव्हते त्यावेळी त्यांची बहीन झोहरा ने स्वतःचे सोन्याचे कडे आणि चैन विकून त्यांच्या प्रवेशासाठी लागणारे पैसे भरले.
MIT मध्ये 2 विमान ठेवलेली होती जेव्हा सगळी मुलं घरी जात तेव्हा कलाम किती तरी वेळ त्या विमानांकडे बघत बसायचे.
पहिल्या वर्षानंतर जेव्हा त्यांना special branch निवडायची होती तेव्हा त्यांनी कोणताही विचार न करता Aeronautical Engineering निवडली.
MIT मध्ये त्यांना प्रो.स्पॉंडेर, प्रो.के.ए. वि.मंडले, प्रो.नरसिंहराव या तिघांनी त्यांना खूप प्रभावित केले.
अब्दुल कलाम यांचा वैज्ञानिक प्रवास
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र अग्निपंख जरूर वाचा
त्यांनतर ते बंगलोर मध्ये Hindusthan Aeronautics Limited(HAL) मध्ये Trainee म्हणून गेले.
HAL मधून जेव्हा ते Aeronautical engineering graduate म्हणून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या पुढं 2 मार्ग होते आणि ते दोन्ही मार्ग त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्ती कडे घेऊन जाणारे होते.
एक होता Air Force चा आणि दुसरा होता ministry of defence मध्ये director of technical development production चा कलामांनी दोन्हीकडे अर्ज पाठवून दिला आणि दोन्हीकडून मुलाखतिसाठी बोलवलं गेले.
Air Force साठी डेहराडून ला बोलावलं होत तर Defence साठी दिल्लीला.
त्यांची दोन्ही स्वप्न एकमेकांपासून 2000 किलोमीटरच्या अंतरावर होती ही त्यांची पहिलीच वेळ होती आपल्या पवित्र आणि विशाल अश्या भारत देशाला बघण्याची ते एक आठवडा दिल्ली मध्ये थांबले Defence ची मुलाखत दिली मुलाखत चांगली गेली तेथून ते डेहराडूनला गेले Air Force Selection Board च्या मुलाखतीला 25 उमेदवारांमधून ते 9 नंबरला आले त्यांना खूप दुःख झाले खूप वाईट वाटले की Air Force मध्ये जाण्याचा मार्ग त्यांच्या हातातून गेला.
तिथून ते हृषीकेशला गेले येणारे दिवस फार कठीण असणार याची त्यांना आता जाणीव झाली होती.
गंगेत आंघोळ करून शिवानंद आश्रमात गेले तेथे स्वामी शिवानंदांशी त्यांची भेट झाली ते दिसायला गौतम बुद्ध वाटत होते कलामांनी त्यांना सांगितले की कसे ते Air Force मध्ये जाण्यापासून राहिले त्यांची हवेत उडण्याची इच्छा कशी अपूर्ण राहिली त्यावर शिवानंद हसून बोलले जर इच्छा मनातून असेल आणि पवित्र असेल तर काही केल्या ती पूर्ण होणारच.
त्यांनतर ते दिल्लीला गेले Defence च्या झालेल्या मुलाखतीचा निकाल मागितला तर त्यांना निवडीचे पत्र मिळाले आणि पुढच्या दिवसापासून Senior Scientific Assistant म्हणून नोकरी मिळाली 250 रुपयाच्या मासिक पगारावर.
3 वर्ष झाले त्याच दिवसात बंगलोर मध्ये ADE चालू झाली आणि त्यांची नियुक्ती तिथं करण्यात आली.
पहिल्या वर्षी ADE मध्ये जास्त काम नव्हते एक प्रोजेक्ट टीम तयार गेली होती की एक स्वदेशी होवर क्राफ्ट तयार करायचा आणि ते काम वेळे आधीच पूर्ण झालं भगवान शिवच्या वाहनावरून त्याच नाव नंदी ठेवलं गेलं त्याच Design खूप चांगलं होत पण कलाम खूप नाराज झाले की आपापसातल्या मतभेदांमुळे तो प्रोजेक्ट बाजूला ठेवला गेला.
प्रो.एम.जि. के.मेनन Tata Institution Of Fundamentl Research चे Director एके दिवशी अचानक त्यांच्या भेटीसाठी आले नंदीचा विषय निघाला त्यांनी कालामांकडे इच्छा व्यक्त केली की 10 मिनिटांसाठी उडवण्याची.
त्याच्या एक आठवड्यानंतर लगेचच कलामांना Indian Committee For Space Research मधून बोलावणं आले Rocket Engineer साठी मुलाखत देण्यासाठी त्यांची मुलाखत घ्यायला होते डॉ.विक्रम साराभाई,एम.जि. के. मेनन आणि मी.सराफ होते.
सारभाईनच्या स्वभावाने पहिल्याच भेटीत कलामांना मोहित केलं दुसऱ्याच दिवशी त्यांना कळवलं की त्यांची निवड झालीत म्हणून.
शास्त्रज्ञ डॉ ए पी जे अब्दुल कलाम निबंध माहिती मराठी
1962 मध्ये थुंबा मध्ये Eqetorial Rocket launching Station बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 6 महिन्यातच त्यांना अमेरिकेत पाठवण्यात आलं NASA मध्ये Rocket Launching Training साठी.
अमेरिकेत जायच्या आधी ते थोडा वेळ काढून रामेश्वरमला गेले त्यांचे वडील त्यांची ही कामयाबी पाहून खुश झाले.
NASA LANGLEY RESEARCH CENTRE VIRGINIA मध्ये कलामांच काम चालू झालं.
अमेरिकेच्या लोकांबद्दल अनुभव सांगताना कलाम बोलतात की अमेरिकेचे लोक बोलतात की ज्या गोष्टींपासून त्रास होतो त्यातून शिकायला पण भेटत आपल्याकडे उच्य पदावर असणाऱ्या व्यक्ती कनिष्ठ पदावरच्या लोकांचं ऐकत नाहीत पण अमेरिकेत तस नाहीये कल्पना चांगली असेल तर ते कोणताच भेदभाव करत नाहीत.
कलाम जेव्हा NASA मधून परत आले तेव्हा लगेचच भारताचे पहिले Rocket Lonch झाले 21 नोव्हेम्बर 1963 रोजी त्याच नाव होत Nike Appachi.
त्यानंतर विक्रम साराभाई यांनी ISLV चे आपले स्वप्न कलामांना सांगितले.
Dr Apj Abdul Kalam Indian Scientist Information Biography in Marathi language
भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानात जागतिक पातळीवर न्यायचे स्वप्न पंडित जवाहरलाल नेहरूंनी बघितले आणि ते स्वप्न सत्यात उतरवायचे ठरवलं ते विक्रम साराभाई यांनी खूप लोकांना वाटतं होत ज्या देशात लोकांना दोन वेळचे अन्न भेटत नाही त्यांनी Rocket आणि बाकीच्या गोष्टीत कशाला पैसे घालवायचे पण नेहरूंचे म्हणणे होते की देशाला जागतिक पातळीवर आपली ताकद सिद्ध करायची असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती झालीच पाहिजे.
पुढच्या वर्षी साराभाईंनी कलामांना दिल्लीला बोलावलं त्यांनी RATO तयार करण्याचा आपला विचार बोलून दाखवला.
लगेच ही बातमी पसरली की भारत स्वतःचे millitary aircraft तयार करणार आहे आणि कलाम त्याचे प्रमुख आहेत.
RATO मध्ये काम करताना त्यांना दोन गोष्टी जाणवल्या की आपल्या देशात पहिल्यांदाच Space Research चा 10 वर्षांचा आराखडा तयार केला गेला ज्याचे निर्माता होते डॉ.विक्रम साराभाई आणि दुसरी गोष्ट Ministry of Defence मध्ये Missile Pannel च तयार होण तेव्हा भविष्यातल्या SLV ता संपूर्ण आराखडा तयार झाला होता.
प्रो.साराभाई आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काही साथीदारांची निवड केली होती आणि त्यांचे नेतृत्व कलामांकडे दिले आणि अजून एक जबाबदारी दिली की Launch ची चौथी पायरी कलाम ठरवणार.
कलामांची ही सवय होती की प्रत्येक Missile Pannel च्या Meeting नंतर तर साराभाई यांना सगळी माहिती देत असत.
दिल्लीच्या अश्याच एका meeting नंतर कलाम 23 डिसेंबर 1971 ला कलाम त्रिवेन्त्रमला परत येत होते.
त्या दिवशी साराभाई थुंबा मध्ये SLV च काम बघायला गेले होते दिल्ली विमानतळावरून कलामांनी सारभाईनना फोन करून meeting चा तपशील सांगितलं सारभाईनी त्यांना त्रिवेन्त्रम च्या विमानतळावर वाट बघायला सांगितले जेव्हा कलाम तिथं पोहचले तेव्हा तिथले वातावरण दुःखमय झालं होतं कलामांना सांगण्यात आलं की हृदयविकाराने साराभाई या जगाचा निरोप घेऊन गेले.
कलामांना हा एक मोठा झटका होता. कलामांच्या नजरेत प्रो.साराभाई भारतीय विज्ञानाचे “राष्ट्रपिता” आहेत.
काही दिवस एम.जि.के.मेनन यांनी Space Research चे काम बघितले.
त्यांनतर प्रो.सतीश धवन यांच्याकडे ISRO ची जबाबदारी देण्यात आली.
थुंबाला Space Centre बनवण्यात आले आणि त्याला नाव Vikram Sarabhayi Space Centre (VSSC) अस नामकरण करण्यात आले.
डॉ.ब्रम्हप्रकाश VSSC चे पाहिले DIRECTOR झाले.
SLV च्या पहिल्या 3 वर्षात त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील फरक समजायला मदत झाली.
कलाम म्हणतात कोणतीही गोष्ट करताना चूक ही होणारच आणि प्रत्येक चूक ही यशाच्या दिशेने जाणारी पायरी बनत जाते.
SLV 3 मध्ये पण खूप अडचणी आल्या एके दिवशी जेव्हा कलाम आणि त्यांचे साथीदार काम करत बसले होते तेव्हा कलामांना घरून कळले की त्यांचे मित्र आणि त्यांच्या बहिणीचे पती जलालूद्दीन यांचे निधन झाले आहे हा अजून एक धक्का कलामांना त्यांच्या आयुष्यात बसला काही काळ कलाम सुन्न झाले डोळ्यांपुढं काळोख पसरला त्यांना जाणवले की जस काय त्यांच्या शरीराचा एक अंग तुटून पडले आहे.
रात्रीत ते बसने प्रवास करून रामेश्वरमला पोहचले.
थुंबाला परत आले तरी कशातच मन लागत नव्हते. सगळं काम तसच होते प्रो.धवन सांत्वन करीत होते जस जसे SLV च काम पुढं जाईल तस तस तुम्हाला बर वाटत जाईल अस सांगायचे.
1976 मध्ये त्यांच्या वडिलांचे वयाच्या 102 व्या वर्षी निधन झाले.
SLV 3 rocket चे फ्रान्स मधून उडवणार होते. अचानक काही अडचणीत आल्या. कलामांना तात्काळ फ्रान्सला जावं लागलं कलाम फ्रान्सला पोहचणार तोच त्यांच्या आईच्या निधनाची वार्ता त्यांना मिळाली एकापाठोपाठ एक अश्या तीन व्यक्ती कलामांच्या आयुष्यातून निघून गेल्या.
आता कलामांना पूर्ण लक्ष कामावर देण्याची गरज होती SLV 3चे स्वप्न 1979 मध्ये जाऊन पूर्ण झाले.
Essay on my Favourite Scientist Apj Abdul Kalam in Marathi language
SLV 3 च्या Trial चा दिवस
SLV 3 च्या Trial चा दिवस 10 ऑगस्ट 1979 ठरवला होता 23 मीटर लांब, 4 stage च Rocket
17 टन चे वजन घेऊन 7 वाजून 58 मिनिटांनी झेपावले.
पहिली stage नीट पूर्ण झाली सगळ्यांना आनंद झाला त्यांचे इतक्या वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होत होते पण अचानक सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा झाला दुसरी stage वरचे नियंत्रण सुटले होते.
317 सेकंदानंतर सगळे स्वप्न तुटले श्रीहरिकोटा पासून 517 किलोमीटर लांब Rocket समुद्रात कोसळले.
ह्या घटनेने सगळे नाराज झाले कलामांना दुःख आणि राग दोन्ही आले. कलाम सरळ आपल्या खोलीत गेले.
कलामांनी प्रमुख म्हणून झालेल्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी स्वतःवर घेतली.
जीवन हे डोंगर चढताना कळते डोंगराच्या टोकावर उतरल्यावर नाही.
कलाम परत कामाला लागले SLV 3 च्या Trial च्या 30 तास आधी वर्तमानपत्रांनी मागच्या वेळेची आठवण करून दिली आणि अपयश कस आले यावरच सगळे बोलत होते.
कलामांना माहीत होतं दुसऱ्या दिवसाचा निकाल आपल्या पुढच्या अंतराळ कार्यक्रमाची दिशा ठरवणार आहे ते.
सर्व देशाचे लक्ष आपल्याकडे लागले आहे हे कलामांना चांगलेच ठाऊक होते.
रोहिणी यान
18 जुलै 1980 सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी भारताचा पहिले Satelite Launch Vehicle अवकाशाकडे झेपावले.
कलामांनी रोहिणी यानाचे सर्व तपशील संगणकावर तपासून पाहिले पुढच्या 2 मिनिटांत रोहिणी अंतराळात होते सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
आता भारत त्या काही देशांमध्ये सामील झाला होता की ज्यांच्याकडे Satelite Launch ची क्षमता होती.
भारतीय लोकांचे एक स्वप्न पूर्ण झाले आणि भारतीय अंतराळ संशोधनात एक नवा अध्याय लिहिला गेला. प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
त्यांनतर महिन्याभरातच कलामांना दिल्लीला बोलवलं प्रधानमंत्रीना भेटायला आता कलामांपुढं प्रश्न पडला पंतप्रधानांना भेटायला जायचं म्हटल्यावर कपडे तर चांगले घालायला पाहिजे तर त्यांनी प्रो.धवन यांना विचारले तर धवन बोलले की तुमचे कर्तृत्व आधीच तिथं जाऊन पोहचले आहे तुम्ही कपड्यांचा विचार नका करू.
26 जानेवारी 1981 ला कलामांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले.
1 जून 1982 ला त्यांनी DRDL ची जबाबदारी सांभाळायला घेतली.
तेव्हा भरताने Missile Programme हातात घेतला भारताची घोडदौड अजून वेगात होऊ लागली.
जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे नाव “पृथ्वी” ठेवण्यात आले. जमीन ते हवाई क्षेपणास्त्र “आकाश” म्हणून ओळखले जाऊ लागले आणि कलामांच्या स्वप्नातील क्षेपणास्त्राला “अग्नी” असं नाव देण्यात आले सम्पूर्ण जगाचे लक्ष आता भारतावर होते जग बघत होत भारत काय आणि कसं करतोय ते.
25 फेब्रुवारी 1988 सकाळी 11 वाजून 23 मिनिटांनी पृथ्वीची पहिली चाचणी यशस्वी झाली.
पृथ्वी फक्त जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र नव्हते तर ते भारताचे Future Module होते.
पृथ्वीने भारताच्या शेजारच्या लोकांवर दहशत निर्माण केली पहिल्यांदा तर पाश्चिमात्य देशांना आश्चर्य वाटले नंतर त्यांना राग आला त्यांनी भारतावर अश्या कोणत्या पण गोष्टी आयात करण्यावर बंदी आणली की ज्यांने आपला Missile Programme पुढं जाऊ शकेल.
Dr Apj Abdul Kalam Scientist Information Biography in Marathi language
अग्नी मध्ये 500 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ सामील होते अग्नीची पहिली चाचणी 20 एप्रिल 1999 साली झाली संपूर्ण देशाच लक्ष अग्निकडे लागले होते चाचणी घेऊ नये म्हणून जग भारतावर दबाव टाकत होता पण भारताने सगळा दबाव झुगारून लावला.
चाचणीच्या 14 सेकंद आधी संगणकाने थांबायला सांगितलं कोणता तरी एक भाग काम करत नव्हता.
वर्तमान पत्रांनी ह्या अपयशावर अनेक भाष्य केली.
त्यानंतर 10 दिवसांनी परत चाचणीची तारीख जाहीर झाली पण तेव्हा पण 10 सेकंदांनी परत संगणकाने थांबायला सांगितले परत लोकांनी टिकेला सुरुवात केली.
शेवटी 22 मे ही तारीख परत अग्नीच्या चाचणीसाठी निवडण्यात आली त्याच्या आधीच्या रात्री संरक्षण मंत्र्यांसोबत फिरताना संरक्षण मंत्र्यांनी कलामांना विचारले कलाम उद्या अग्नीच्या यश साजर करायला काय पाहिजे तुम्हाला कलाम बोलले आपण 1 लाख झाडे लावू तेव्हा मंत्री बोलले म्हणजे तुम्हाला धरती आईचा आशीर्वाद पाहिजे तसच होणार.
दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी अग्नीची चाचणी झाली 5 वर्षांच्या कठीण मेहनतीनंतर आणि अनेक अपयशानंतर अग्नीची चाचणी यशस्वी झाली कलाम बोलतात तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस होता.
26 जानेवारी 1990 रोजी कलामांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.
1992-99 मध्ये पोखरण 2 च्या अनुचाचण्या झाल्या त्यामध्ये कलामांचा सहभाग होता.
त्यांनतर 2002 मध्ये कलामांची भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली हिंदू पक्ष समजल्या जाणाऱ्या भाजपाने त्यांना उमेदवारी दिली यावरून कलाम देशासाठी काय होते हे लक्षात येते.
कलाम एक लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून नावाजले जाऊ लागले 2007 मध्ये कलामांचा कार्यकाळ संपला.
त्यांनतर कलाम परत राजकारणात कधी आलेच नाही त्यांना बोलावणे आले तरीही!
कलाम आयुष्यभर तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहिले जे नैराश्यात गेलेत त्यांना आपल्या कहाणीने प्रेरणा देत राहिले.
आपले जीवन त्यांनी “अग्निपंख” या आपल्या पुस्तकात शब्दरूपाने मांडले.
आपल्या देशातील बरेच शास्त्रज्ञ आणि अभियंते इथं शिक्षण घेतात आणि जास्त पगाराची नोकरी करण्यासाठी परदेशात जातात पण कलाम याला अपवाद होते ते बोलायचे मला जास्त पैसे भेटतील पण अस प्रेम आणि असा आदर कुठेच नाही भेटणार जो माझ्या देशात मला भेटतोय कलामांनी अखंड आयुष्य देशसेवेसाठी दिले.
कलाम बोलायचे देशातील तरुणाला मार्गदर्शनाची गरज आहे आपल्या देशाकडे जितकी तरुणांची शक्ती आहे तितकी कोणाकडेच नाही याचं तरुणांच्या जोरावर कलामांनी 2020 साली भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न बघितलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी ते तरुणांना मार्गदर्शन करत देशभर फिरत होते.
असेच एक दिवशी 27 जुलै 2015 रोजी शिलॉंग मध्ये एका कार्यक्रमात व्याख्यान देताना हृदयविकाराने कलामांचा मृत्यू झाला.
भारताला क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात प्रगतीपथावर नेणारा हा अवलिया देशाला सोडून गेला.
तरुणांना रस्ता दाखवणारा हा वाटाड्या आज तरुणांना भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न देऊन निघून गेला होता.
आज देशातील तरुणांचे कर्तव्य आहे की कलामांचे हे स्वप्न सत्यात उतरवलं पाहिजे.
मेहनत आणि विश्वास असेल तर सर्वकाही साध्य होते हेच कलामांनी शिकवलं एका मध्यमवर्गीय कुटुंबातील लहान मुलगा जो कधी आकाशात उडण्याचा स्वप्न बघत होता तो देशाचा Missile Man म्हणून नावाजला.
वर्तनमानपत्र विकणारा तरुण देशाचा राष्ट्रपती झाला ही काही साधी गोष्ट नाही.
कलमांचे जीवन त्यांचे विचार आणि आचार सर्व तरुणांना नेहमीच प्रेरणा देत राहील या बाबत काही शंका नाही.
भारताचे अवकाश संशोधन कलामांचे नाव घेतल्याशिवाय पूर्णच नाही होऊ शकत.
आपल्या देशात शिकलेला आपल्या देशात राहून देशासाठी काम केलेला आणि देशातच जीवन संपवणारा असे हे कलाम.
आमचे प्रेरणास्थान आणि आमचे आदर्श त्यांच्या कार्याला आणि कर्तुत्वाला सलाम.
-अक्षय जाधव
कडूस राजगुरूनगर.
मित्रांनो, Dr Apj Abdul Kalam Indian Scientist Information Biography in Marathi language Essay on my Favourite Scientist Apj Abdul Kalam in Marathi language शास्त्रज्ञ डॉ ए पी जे अब्दुल कलाम निबंध माहिती मराठी
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा.
या प्रकारची महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी कॉलेज कट्टा “college Catta” या आपल्या आवडत्या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या. College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply