देवगिरी दौलताबाद किल्ला का अजिंक्य होता त्या किल्याची काय रणनीती होती जाणून घ्या Devgiri Daulatabad fort information history in Marathi देवगिरी दौलताबाद किल्ला माहिती इतिहास मराठी
महाराष्ट्रातील किती जणांना माहीत आहे की दौलताबाद काही काळ भारताची राजधानी राहीला आहे. खुप कमी लोकांना माहीत आहे पण मुहम्मद तुघलक याने काही काळ आपली राजधानी दौलताबादला हलवली होती. कारण हे ठिकाण मध्यवर्ती होते म्हणून. याचा दौलताबाद किल्याचा इतिहास आज बघू.
देवगिरी किल्ला कोणत्या साम्राज्याचे प्रतीक आहे
दौलताबाद किल्ल्याच नाव ऐकल्यावर आपल्याला यादवांचे साम्राज्य आणि अल्लाउद्दीन खिलजी यांचीच नावे आठवतात सहाजिकच आहे दौलताबाद ही यादवांची राजधानी होती आणि त्यावर आल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाचा इतिहास तर सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.
देवगिरी किल्ला कुठे आहे
भौगोलिक स्थानामुळे हा किल्ला दख्खनचे दार मानला जात होता. औरंगाबाद शहराच्या १६ किमी पश्चिमेला आपल्या इतिहासाची साक्ष देत आजही हा उभा आहे.
या अजिंक्य गडावर अनेक राजांनी राज्य केले पण याचे वैशिष्ठ्य म्हणजे सैनीकांच्या किंवा युद्धसामग्रिच्या बळावर हा किल्ला कधीही कोणाला जिंकता आला नाही. त्यासाठी प्रत्येक वेळी फितूरी, विश्वासघात, आणि रक्तपातच करावा लागला.
दौलताबादचा हा किल्ला राजा भिल्लमराजा याने बांधला अशी ऐतिहासात नोंद आहे. ११८७ मध्ये त्याचे नामकरण देवगिरी असे केले गेले. पन्नास हजार सैन्याचा पराभव अवघ्या दोन हजार सैन्याने केल्याचा इतिहास आपणास बऱ्याच वेळा ऐकवयास भेटतो.
Devgiri Daulatabad fort information history in Marathi
देवगिरी दौलताबाद किल्ला माहिती इतिहास मराठी
१९२४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने अशीच आक्रमनाची हुल उठवून आणि फसवणूक करून राजा रामदेवरायाकडून किल्ला जिंकून घेतला तो आला होता राजाचा सन्मान करायचा बहाना करून त्याचा सरदार मलिक काफूरने तर राजाच्या जावयाला हरपालला जीवंत सोलुन वेशिवर उलटे टांगल्याचा देखील इतिहास आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याने याला आपली राजधानी बनविले व देवगिरिचे नामांतरण “दौलताबाद” झाले.
किल्ल्याची रचना अतिशय वैशिष्ट्यपुर्ण अशीच आहे. बळकट आणि अभेद्य भिंतिच्या अनेक पातळ्या आणि हत्तीहि फोडू शकणार नाहीत असे बेलगाम दरवाजे यांनी परिपूर्ण असा हा किल्ला पराक्रमाने जिंकणे कोणत्याच शत्रुला कधीही सहज शक्य झाले नसते म्हणून फंदफितुरिच्या मार्गाचा अवलंब केल्याचे आपणास दिसते.
देवगिरी किल्ला का अजिक्य होता?
समजा शत्रू पहिल्या भिंती आणि दरवाजे तोडून आत घुसलाच तर पुढे चाळीस फूटी खंदक. पाण्याने भरलेला. शिवाय पाण्यात सुसरी मगरी. खंदक ओलांडून यायला एकच पूल तो शत्रू आला की उचलून घेतला जायचा. शिवाय पूल उचलायला समजा वेळ मिळाला नाही तर पुलावरून येणार्या सैनिकांचे स्वागत व्हायचे किल्ल्याच्या बुरूजांवर लपलेल्या सैनिकांच्या विषारी बाणांनी. त्यातूनच शत्रू पुढे आलाच तर तो येणार निमुळत्या अरूंद पॅसेजमध्ये. एकावेळी दोन जण जाऊ शकणार नाहीत इतक्या अरूंद या वाटा. शिवाय कुठली वाट कुठे जाते याचा पत्ता लागणे अशक्यच.
या किल्ल्याची अजुन १ खासियत म्हणजे वाटांचा भूलभुलैया माणूस कितीही फिरला तरीही पहिल्याच जागी येणार त्यामुळे शत्रुला हे समजणे अतिशय अवघड होऊन बसते. शत्रू फारच हुषार असला आणि या भुलभुलैय्यातून सुटला तर ज्या वाटेवर येणार तेथे विष लावलेले काटे पसरलेले. त्यात अंधार. रस्ता दिसावा म्हणून मशाल पेटवावी तर शत्रूच सैनिकांना दिसणार आणि ते ऐतेच त्याला टिपणार. बरं मशाली विझवाव्या तर शत्रूचेच सैनिक रस्ता चुकून एकमेकांसमोर येणार आणि आपल्याच सैनिकांना मारणार. इतके कमी की काय म्हणून बोळाच्या तोंडाला उजेड दिसतोय असे वाटून शत्रू पुढे वाट सापडेल म्हणून जाणार तर तिथे उकळते तेल शत्रू सैनिकांच्या अंगावर. तिथले रस्ते इतके निसरडे की पुन्हा आपले खंदकात पडायला होणार. शिवाय सल्फरच्या विषारी धुराचा प्रसाद मिळणार तो वेगळाच. त्यातूनही बचावलात आणि किल्यात घुसलात की आधीच बरीच हानी झालेल्या शत्रू सैनिकांशी लढायला ताज्या दमाची राजाच्या सैनिकांची तुकडी तयार.
दौलताबाद किल्ल्यातील मेंढा तोफ
या किल्ल्यावर पंचधातुंनी बनवलेली एक विशाल तोफ आहे. विशेष म्हणजे ही तोफ याच किल्यावर बनवलेली आहे. या तोफेमध्ये १ पूर्ण शहर उध्वस्त करण्याची शक्ति आहे विचार करा कशी असेल ती तोफ.
या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतमाता मंदिराजवळ तीन मजली मिनार आहे अहमदशाह बहामनीने हा उत्तुंग मनोरा बांधला होता. दिल्लीच्या कुतुबमीनार नंतर उंच मिनारांमध्ये या तीन मजली चाँद मिनारचा दूसरा क्रमांक लागतो त्याच्याकडे पाहिल्यानंतर दिल्लीच्या कुतुबमीनार ची आठवण नक्कीच होते.
महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला शिवरायांच्या गड किल्ल्यांविषयी संपूर्ण माहिती आहे पण एकेकाळी यादवांच्या वैभवशाली साम्राज्याची साक्ष देणारा हा देवगिरिचा किल्ला आज दुर्लक्षितच आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ला हा लढाऊ किल्ला आहे त्यातीलच हा एक देवगिरिचा किल्ला.
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
Devgiri Daulatabad fort information history in Marathi
देवगिरी दौलताबाद किल्ला माहिती इतिहास मराठी
दौलताबाद किल्ल्याची संपूर्ण माहिती दाखवा मराठी मध्ये
देवगिरी किल्ला माहिती इतिहास मराठी
देवगिरी किल्ला कुठे आहे
देवगिरी किल्ला कोणत्या साम्राज्याचे प्रतीक आहे
देवगिरी किल्ल्याची माहिती मराठीत
Leave a Reply