छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अनेकांनी चुकीची माहिती पसरवली, पराक्रमी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हे सलग ९ वर्ष युद्ध करत होते. यासाठी वाघाचं काळीज आणि स्वराज्याबद्दल आतोनात प्रेम असावं लागतं… Chhatrapati Sambhaji Maharaj information in Marathi
छत्रपती संभाजी महाराज इतिहास माहिती निबंध भाषण मराठी
छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या वटव्रुक्षाखाली आपले स्वतःचे असे अस्तित्व निर्माण करने ही काही साधी गोष्ट नाही. स्वराज्य निर्माण करने जशी अवघड गोष्ट होती तितकीच अवघड स्वराज्य टिकविनेही होती. संभाजी महाराजांची महाराष्ट्राला करून दिलेली चुकीची ओळख म्हणजे अत्यंत रागिट, तापट, रंगेल आणि रगिल, मुघलांना जाऊन मिळालेला युवराज अशी होती.
पण संभाजी महाराज हे माँसाहेब जिजाऊ आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारात वाढलेले होते हे आपण विसरता कामा नये.
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वात खुप भिन्नता होती. समजेल अस सांगायचं झाल तर शिवाजी महाराज जर ‘कृष्ण’ असतील तर संभाजी महाराजांमध्ये ‘रुद्र’ दिसतो. अशाच या संभाजी महाराज नावाच्या वादळाला शब्दांमध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतोय.
आई भवानीच्या कृपेने शिवाजी महाराज आणि सईबाईसाहेब यांना १४ मे १६५७ रोजी पुरंदर गडावर पुत्ररत्न प्राप्त झाले. माँसाहेबांनी आपल्या थोरल्या मुलाच्या आठवणीत त्यांचे नाव संभाजी ठेवल.
संभाजी महाराजांच्या जन्मानंतरच सईबाई यांना दुर्धर अशा अजाराने ग्रासले त्या बाळाला स्वतःच्या आईच्या दुधाचे देखील सेवन करता नाही आले माँसाहेबांनी त्यांच्या दुधासाठी धाराउ यांना बोलावून घेतले. जन्मापासुनच देवाने त्यांच्या नशीबी दुःख लिहिले होते असच दिसतय.
पण तरीही त्यांच्यासाठी सर्वांत मोठा आधार म्हणजे माँसाहेब. सईबाईंच्या निधनानंतर स्वराज्यावर अफझलखान नावाचे संकट आले लहान संभाजीला माँसाहेबांकडे सोपवून महाराज प्रतापगडावर गेले.
तेव्हापासून माँसाहेबांनी त्यांचा सांभाळ केला माँसाहेबांनी संभाजी महाराजांच्या सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय केली. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी त्यांना उत्तम शिक्षण दिले. केशवभटांनी त्यांना दंडनीती व प्रयोगरूपरामायण ऐकविले. शिवाय राजपुत्रास आवश्यक असे घोडयावर बसणे, शस्त्रविदया, तालीम, तिरंदाजी वगैरेंचे शिक्षण दिले.
Chhatrapati Sambhaji Maharaj information in Marathi
छत्रपती संभाजी महाराज इतिहास माहिती निबंध भाषण मराठी
संभाजी राजांचे संस्कृत, मराठी, इंग्रजी यासारख्या अनेक भाषांवर प्रभुत्व होते.
छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यात फक्त ताकदच नव्हती तर बुद्धीची प्रगल्भता सुद्धा होती. जसे संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ वर्षात ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला होता त्याचप्रमाणे संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान; राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती त्यांनी स्वतः लिहून घेतलेल्या तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात आहे.
अवघ्या ८ वर्षाच्या वयात मिर्जा राजे जयसिंग आणि दिलेरखानाच्या छावणित जाऊन मनसबदारी स्विकारावी लागली. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. १६६५ मध्ये संभाजी राजे यांचा विवाह राजसबाई यांच्या बरोबर झाला, प्रत्येक मराठा रूढीनुसार त्यांचे नाव येसूबाई असे ठेवण्यात आले. येसूबाई ह्या पिलाजीराजे शिर्के यांची कन्या होती.
शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय हाती घेतला तेव्हा संभाजी राजांना दिलेरखनाच्या छावणित जायला सांगितले यात महाराजांचे राजकारण होते याचा विचार न करता त्यांच्यावर स्वराज्य द्रोहाचे आरोप झाले. छत्रपतिंचा मुलगा मुघलांना सामील झाला अशी बदनामी झाली पण तरीही पित्याच्या राजकारनासाठी त्यांनी हे सहन केले.
माँसाहेबांच्या मृत्युनंतर आणि पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर संभाजी राजांभोवती कटकारस्थान सुरु झाले. ज्या पित्याला देवसमान मानले त्याला अग्नि देण्याचे भाग्य तर सोडाच पण पिता गेल्याची बातमी पण देण्यात आली नाही. यासारख दुर्दैव तर कोणते?? पण सगळे कार्यस्थान धुळीला मिळवून त्यांनी १६ जानेवारी १६८१ रोजी राज्याभिषेक केला आणि संभाजी महाराज स्वराज्याचे दूसरे छत्रपती झाले.
Chhatrapati Sambhaji Maharaj information in Marathi
छत्रपती संभाजी महाराज इतिहास माहिती निबंध भाषण मराठी
बुरहानपूरचा किल्ला प्रथम बहादूर खानच्या ताब्यात होता आणि नंतर त्याने काकर खानला दिला.
नागरिकांकडून जिझिया कर वसूल करण्याचे काम त्याच्याकडे होते.
हे काम साध्य करण्यासाठी, काकर खानने बुरहानपूरच्या आसपासची १०० पेक्षा जास्त मंदिरे नष्ट केली आणि संपत्तीसाठी लोकांची लूटमार केली.
बुरहानपूर ही मोगलांची एक मोठी वैभवनगरी होती. तिची दुसरी ओळख म्हणजे “दक्षिणेचे प्रवेशद्वार”. भारतातली एक मोठी बाजारपेठ होती.
संभाजी राजे यांनी १६८१ साली बुरहानपूर वर हल्ला केला. रायगड ते बुरहानपूर हे १००० किमी पेक्षा जास्त अंतर आहे. परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज त्या ठिकाणी पोहोचले.
संभाजी महाराज स्वतः या मोहिमेत सहभागी होते. या मोहिमेत शत्रूची जीवितहानी कमीत कमी होईल याची दक्षता शंभु राजांनी घेतली.
या मोहिमेत हिरे मोती सोने नाणे अशी १ करोड हुन जास्त होनांची दौलत स्वराज्यात आणली.
महाराणी येसूबाई यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले होते, “श्री शाहु महाराज”. त्यामुळे त्यांना आशिर्वाद देण्यासाठी महादेव महाराज आले होते.
महादेव महाराज हे संतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकाराम महाराज यांचे सुपुत्र.
भेटीमागचे आणखी एक असे कारण होते, ते म्हणजे देहु ते पंढरपुर अशी संत तुकाराम महाराज यांची पालखी सुरु करावी. परंतु जागोजागी असलेले औरंगजेबाचे मुघल सैन्य या महान कार्यासाठी अडथळा ठरू पाहत होते.
छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समोर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपली व्यथा पण सांगितली. शंभू राजांनी तात्काळ या आषाढी वारीला आपली संमती दर्शवली.
स्वराज्याचे मावळे या पालखीस संरक्षण देतील अशी हमी देखील दिली. इतकेच नव्हे तर पंढरपूर वारीच्या या पालखीस आर्थिक मदत देखील देऊ केली.
संभाजी महाराजांनी तात्काळ याचा आदेश जागोजागी आपल्या सरदार आणि मावळ्यांना पाठवला. या मुळे वारकरी आणि धारकरी यांचे नाते अधिकच घट्ट झाले.
ज्यांचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल, हे शिवाजी महाराजांचे विचार होते.
आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या ४ नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली. जहाज बांधणीचे काम सुरु केले.
पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला. या आरमाराची जवाबदारी दर्या सारंग, दौलत खान आणि मायनाक भंडारी या सारख्या पराक्रमी, अनुभवी आणि मातब्बर सरदारांकडे होती.
स्वतः औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात उतरला प्रचंड फ़ौज घेऊन.
९ वर्ष संभाजी महाराज औरंगजेबाशी लढत राहिले दिवस रात्र घोड्यावर मांड घालून वादळासारखे मुघलांसोबत लढत राहीले. स्वतः औरंगजेब येऊन सुद्धा संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवून ठेवले.
विचार करा रंगेल मानुस ९ वर्ष तलवार घेऊन लढेल की ऐश करेल कोणताही रंगेल माणूस काही तरी समझौता करून आपला फायदा बघेल ऐश कशी करता येईल हे बघेल पण संभाजी महाराज लढले मृत्यु ला जवळ केले पण हार मानली नाही.
संभाजी महाराजांना कैद करण्यात आल्या नंतर काय झाले याचा इतिहास सर्वश्रुत आहे त्यविषयी काही बोलत नाही. पण संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्याना एकच सांगण आहे त्यांचा मृत्यु बघून तरी समजून जा एवढे हाल सोसुन हसत हसत स्वराज्यसाठी मरण पतत्करले त्याची बदनामी करण्यासाठी हाथ कसे धजवतात तुमचे. अरे मुघलानशी हाथ मिळवायचे असते तर मृत्यु नसता ओढवून घेतला त्यांनी ते इतके शुर होते की औरंगजेबाने त्यांना वाटेल तेवढी जहागिर दिली असती. अरे आपल्या मातिसाठी त्या देवाने असंख्य हाल सोसले असा मृत्यु इतिहासात कदाचितच कोणाला भेटला असेल तस मरण आपल्या राजाने आपल्यासाठी ओढवून घेतले.
अश्या या छात्रपतिंना मानाचा मुजरा
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
मित्रांनो, Chhatrapati Sambhaji Maharaj information in Marathi छत्रपती संभाजी महाराज इतिहास माहिती निबंध भाषण मराठी ही महत्वपूर्ण माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. अशा पद्धतीची माहिती वाचण्यासाठी कॉलेज कट्टाला सबस्क्राईब करा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Chhatrapati Sambhaji Maharaj information in Marathi
छत्रपती संभाजी महाराज इतिहास माहिती निबंध भाषण मराठी
Leave a Reply