Bhondu Baba आसाराम बापुजी, बाबा राम रहीम आणि यानंतर श्रीकृष्ण पाटील बाबा
सध्या देशात १४ भोंदू बाबांची यादी भारतीय अखाड़ा परिषदचे अध्यक्ष महंत धर्मेन्द्र गिरि यांनी जाहीर केलेलीच आहे. तरीसुद्धा भोळ्या लोकांचे डोळे उघडलेले नाहीत. त्यांचा अशा भोंदू बाबावर आजही विश्वास आहे. पूज्य आसाराम आणि राम राहिम बाबा जेल मध्ये असले तरी त्यांच्या भक्तांचा त्यांच्यावर विश्वास आजही आहे . यात भर म्हणजे रत्नागिरीचे श्रीकृष्ण पाटील बाबा
Bhondu Baba श्रीकृष्ण पाटील बाबा
भारत देशाला संतांची भूमी म्हणून ओळखलं जात आहे. जगदगुरु संत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ,संत सावता माळी, संत चोखामेळायांसारख्या संतांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जनकल्याणासाठी कसा देता येईल हे पहिले. आपल्या आयुष्यातील कदाचितच काही काळ स्वतःसाठी जगले असतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे.परंतु आज आजचे स्वतःला संत म्हणवून घेण्याची उच्चकोटीची आस असलेले भोंदू बाबा किंवा आपण त्यांना ठग देखील म्हणू शकतो असे ,जे दिवसाढवळ्या वाट्टेल तशी मनमानी करत जनतेच्या भावनांशी त्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत, पण यालाही आपणच काहीअंशी जबाबदार असल्यासारखं वाटत आहे. कारण काही दिवसांपूर्वी यांचा भांडाफोड झाली अशी ते अटकेपुर्वी सामान्य जनतेच्या मनात देवाचे स्थान निर्माण केलं ते आसाराम बापू असो किंवा त्यानंतर ज्याच पितळ उघडं पडलं तो राम रहीम असो नाहीतर आत्ताच ज्याची वाट लावली जात आहे असा स्वतःला श्री स्वामी समर्थांचा अवतार समजत असलेल्या किंवा लोकांना तसे सांगत असलेला आणि लोकांनाही ते आजपर्यंत डोळे झाकून विश्वास ठेवत असलेला हा श्रीकृष्ण पाटील बाबा ! हा पाटील बाबा लोक जे त्याचे भक्तगण आहेत, तो त्यांना शिव्या देत होता आणि ही माणसं त्यांची बुद्धी गहाण ठेवल्यागत जर त्याला त्याचा प्रसाद जर समजत असतील…तर आपण माणूस आहोत आणि आपल्याला विचार करण्याची ताकत आहे ? आणि असेलच तर मग कुठे आहे ती तिला गंज वगैरे तर नाही ना लागला ? आपणच याचं उत्तर आपल्याच मनाला विचारलं पाहिजे !Bhondu Baba
आजपर्यंतच्या संतांनी आपल्या ऐश-आरामी जीवनाची कधीच आस उराशी बाळगली नाही पण आजचे हे पाखंडी बाबा प्रत्येक तासाला नवनवीन कपडे घालायची हौस ठेवतात.त्याचबरोबर आपण कसे चांगले दिसू यासाठी ज्याप्रमाणे देवाचा अभिषेक दुधाने केला जातो. त्याचप्रमाणे हा श्रीकृष्ण पाटीलबाबा स्वतःचे श्रीमुख धुण्यासाठी दुधाचा वापर करत होता, एवढेच नाहीतर या बाबाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तमंडळींना त्याच्याकडून खूप खालच्या दर्जाची वागणूक मिळत होती तरीही भोळे भक्त आपल्या बाबा विषयी तेवढीच आस्था मनात ठेवत असतील तर याला काय म्हणता येईल?
या बाबाच्या सेवेसाठी जर फक्त सुंदर स्रिया आणि मुलीच पाहिजेत मग काय हे तर पाणी डोक्याच्या वर गेल्यासारखंच आहे. पण तरीही यापूर्वी अशा गोष्टी सर्रास झाल्या आहेतच. पण कधीतरी माणसाने आपली सद्सदविवेकबुद्धिचा वापर करून आपल्या अंतरमनास विचारलं पाहिजे की हे जे चालू आहे ते कितपत योग्य आहे?
-सागर गोरखे.
Leave a Reply