Best Articles to Read in Marathi Good Marathi Articles . Read marathi blogs . Marathi lekh Marathi Blog katta . lekh in Marathi language .
कोणी चहा घेणार का चहा?
Best Articles to Read in Marathi Good Marathi Articles
एवढी थंडी असताना मित्राने चहा घ्यायला नकार दिल्यावर मला तो स्वत: वर अन्याय करतोय असं वाटे. चहा म्हणजे काय? आनंद!! एक कप भरुन. काही लोक घेतात काही या आनंदाला मुकतात, किंबवना त्यांना तो नको असतो. स्वत:ची मरगळ चहाच्या पत्ती बरोबर पाण्यात उकळून काढावी, दुध ओतलं की आयुष्याला नव्याने रंग फुटतील. जशी झाडांना नवीन पालवी फुटते! नवीन उमेद तयार होईल. जसा चवदार चहाचा सुगंध दरवळतो तसं आपणही दरवळाव. जीवनाचा आनंद कसा चहाच्या भरल्या कपा प्रमाणे भरभरून घ्यायला हवा, ताजा ताजा, चहाच्या प्रत्येक घोटा बरोबर आपणही ताजं व्हाव. स्वत:च्या रक्तात एकदा चहा उतरुद्या मग नव्यान उब मिळते, तरुणपणा जानवतो. काहीतरी हरवलेलं आठवत आणि आपण बोलायला लागतो. मग मित्रांबरोबर चहा घेत तासनतास गप्पा अगदी चहाची पत्ती जीभेला लागेपर्यंत!! कितीही प्रयत्न करा रिकाम्या कपात चहाचा एक थेंब तसाच राहतो आणि सोबतीला चहाच्या आठवणी. जश्या आयुष्यभराच्या आठवणी. आयुष्याचा चहा काहींना पोळलेला तर काहींना कडू, जास्तच गोड! ज्याचा त्याचा अनुभव वेगळा. काही फुंकून पितात तर काहींना उशीर झाल्याने थंड चहा प्यावा लागतो. काही चहाच्या फेसाचे बुडबुडे येतील इतपत काम करतात पण त्यांना साधा चहा घ्यायला देखील वेळ नसतो आणि ज्याचा चहाचा ग्लास रिकामा होणार नाही त्याच्या कपात आठवणींना जागा कशी असणार? आयुष्य कसं चहाच्या रंगा सारखं गढूळ असाव, प्रत्येक रंग हवा! नवनवीन नाती जोडावीत. भरपूर मित्र असावेत म्हणजे तुमचा चहाचा ग्लास जरी रिकामा झाला तरी आठवणींचा ग्लास कायम भरलेला राहील.
चहाचा रिकामा ग्लास
-अभिजीत हजारे.
Articles in Marathi on life . Marathi Articles on life friendship Read marathi blogs . Marathi lekh . Marathi Blogs on life
हल्ली सगळं बदलतय
Best Articles to Read in Marathi Good Marathi Articles
आज सकाळी शाळेत जाणारी मुलं बघितली. इवडुशी. पाठीवर भली मोठी बॅग , त्यात एक लिटर पाण्याची बाटली . त्याच्या आकारापेक्षा बॅगचा आकारच मोठा दिसत होता . थांबून विचारलं बाळ कितविला रे? “जुनियर केजी” मनात आलं विचाराव जुनियर केजी काय प्रकार आहे पण स्वत:ला थांबवलं अचानक पाऊस सुरू झाला आणि आडोशाला आलो. फेब्रुवारी महिना आणि पाऊस ! मला हसु आलं. हल्ली पावसाळा सोडून कधीही पाऊस पडतो, कलियुग आहे ना.
लहान होतो त्यावेळेस आमच्याकडे फक्त पाटी पेन्सिल होती. काहींकडे खापराची पाटी . त्यावर लिहताना हाताला मऊ मऊ वाचायचं आणि अक्षरही ठळक दिसायचे. खापराची पाटी फार जपून वापरावी लागे कारण थोडी जरी पडली की लगेच फुटायची . मग नाईलाजाने पुट्याची पाटी वापरावी लागे . पाटीवर पाटपोट लिहण्यात एक वेगळीच गंमत होती . हळूहळू पुढच्या इयत्तेत जाताना आमच्याकडे दप्तर आलं. त्यात एक-दोन पुस्तकं आणि पाटी. पुढे यात वही-शिसपेन्सिल-खोडरबर-पेन याची भर पडली. काहींच दप्तर म्हणजे वायरची पिशवी!
शाळा सुटली की आम्ही मित्र मनसोक्त खेळायचो बॅट-बाॅल (क्रिकेट) , शिवनापाणी, रात्र होईपर्यंत हुदडायचो जाम भुक लागायची गिळलं की झोपायचो. होमवर्क नावाचा प्रकार माहीत नव्हता कधी-कधी रात्री आजी गोष्टी सांगायची फार मजा यायची.
शाळेत लघवीच्या सुट्टीत आईकडून पैसे घेऊन चिक्की , बुढ्ढीके बाल खायचो .
पावसाळ्यात चिक्कार धो-धो पाऊस पडायचा . पत्र्याचे वर्ग गळायचे, वर्गात पाणी साठायचं. मग सुट्टी! गुरूजींनी सुट्टी सांगितली की आम्ही आनंदाच्या भरात पावसातच घरी निघायचो. घरी जाईपर्यंत पुर्ण भिजायचो. कधी-कधी सकाळीच रिमझिम पाऊस सुरू व्हायचा मग अाज शाळेला सुट्टी मिळणार असं वाटून खुष व्हायचो पण मग आई कोप-यात अडगळीला पडलेली छत्री हातात देऊन शाळेचा रस्ता दाखवायची . मी छत्री घेऊन निघालेलो बघून माझा मित्र देखील छत्रीत यायचा मग दोघंही खांदे भिजवत शाळेत जायचो . वाटेत एखाद्या पन्हाळ्याखाली मुद्दाम छत्री घेऊन उभे रहायचो . वेगळीच मज्जा यायची. पाण्यात खड्याचा अंदाज न आल्याने पाय बुडून खाकी चड्डी भिजायची. नदीला पुर आला की तो बघायला आम्ही सगळे घोळका करून जायचो आणि वेसीतल्या मारुती मंदीराच्या कट्ट्यावरून पुर बघायचो. पाऊस भरपूर व्हायचा नदीला बारमही पाणी असायचं दस-यापुर्वी कपडे धुण्यासाठी सर्व लोक नदीवर यायचे. आई कपडे धुवायची आणि आम्ही भावंड वाळूत पाण्यात मनसोक्त खेळायचो.
पण हल्ली सगळं बदलतय ना पुर्वीसारखा पाऊस पडतो ना नदी वाहते. एखाद्यावर्षी तर पावसाळयात देखील नदीचा घसा कोरडाच असतो. आता शाळा सुटल्यावर मुलांना खाजगी शिकवण्यातुन खेळायला वेळच मिळत नाही . घरात आजी-आजोबाच नसतील तर त्याच्या गोष्टी कुठून येणार आणि पुरेसा पाऊस जर पडत नाही तर छत्री कशाला लागेल असच चालू राहील तर कदाचित छत्रीच उत्पादन बंद होईल आणि पाटी-पेन्सिल …?
भानावर आलो तेव्हा पाऊस सडा शिंपून गेला होता… चला निघायला हवं.
-अभिजीत हजारे.
Good Articles on life Marathi Read marathi blogs . Marathi lekh . Marathi Blog katta . lekh in Marathi language
“ हेल्मेट का वापरावे ”
Marathi Blog Jagat . Best Articles to Read in Marathi Good Marathi Articles
एवढ्यात पुन्हा एकदा नगरमध्ये हेल्मेट सक्ती लागू केली. बातमी वाचून जरा बर वाटलं पण रस्त्यावर नेहमीचीच उघडी डोकी दिसली. एक दोन लोकं हेल्मेट घातलेली दिसली पण बाकीचे मस्तपैकी चष्मा लाऊन केस उडवत गाडी चालवताना दिसले. वाटेत कोपऱ्यात ट्राफिक पोलीस आपल दुकान मांडून होता. ही लोकं दिवसभर उभी राहिली तर किती फाईन गोळा होऊ शकतो या कल्पनेने मनात उभारी घेतली.
हेल्मेट वापरायला लोकांना लाज वाटते, म्हणतात, “ इथे तर जायचं आहे. मग कशाला पाहिजे हेल्मेट. ” काहींचा गोड गैरसमज आहे कि हेल्मेट हे फक्त लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीच वापराव लागतं. हे बर आहे कि बाथरूमला जायला इथल्या इथे देखील गाडी वापरलेली चालते मग हेल्मेट का नाही ?
आजकाल मावा-गोवा खात गाडी चालावानारऱ्यांच प्रमाण जास्त आहे. हेल्मेट घातलं तर थुंकायचं कसं ? कारण मावा खाण हा त्यांचा जन्मसिद्ध (मुलभूत) हक्क किंवा अधिकार आहे आणि हा अधिकार त्यांनी जोपासलाच पाहिजे यासाठी ते हजारदा हेल्मेटचा त्याग करतील. पण आज नवीन डिझाईनचे हेल्मेट बाजारात उपलब्ध आहेत, जे घालून थुंकता ही येऊ शकत, पण मग असं केल्यावर त्यांच्या निधड्या, बिनधास्त आणि स्वयंघोषित नेत्याच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल घाबरट, पोरकट, अशी प्रतिमा तयार होऊ शकते म्हणून गाडी चालवताना हेल्मेट वापरण्याचा विचारदेखील त्यांच्या केसाला धक्का लावत नाही. बुलेट किंवा राजदूत वापरणाऱ्या पांढऱ्या कपड्यावर कला चष्मा घालणाऱ्या पुढारी व्यक्तीमत्वांना ट्राफिक पोलिसांनी कधी हटकल तर नवलच! आणि त्यांना अडवायचं तरी कशाला कारण नियम हे फक्त सर्वसामन्यांसाठीच असतात.
काहींच्या मते हेल्मेट वापरायला काहीच अडचण नाही पण ते सारख-सारख घालायचं, एखाद्या ठिकाणी उतरल कि पुन्हा काढायचं, गाडीला लॉंक करायचं किंवा बरोबर वागवायच यापेक्षा नकोच ना हेल्मेट वापरायला ! आणि हेल्मेट वापरून स्वत:ला गुदमरून घेण्यापेक्षा मोकळ्या हवेत वेगाने गाडी चालवताना श्वासोचावासाचा व्यायामही होतो.
गाडी चालवताना किती महत्वाचे फोन येतात, आणि आपण हेल्मेट घातल तर ? फोन आल्यावर गाडी साईटला घ्या, हेल्मेट काढा मग फोन (मोबाईल) उचलता येईल. एवढ सगळ कराव लागणार ! कल्पना सुध्दा करवत नाही. यापेक्षा फोन आला कि लावला मोबाईल कानाला यासाठी कशाला गाडी थांबवायला हवी. वेळ नसतो.
कॉलेजकुमारांची अडचण तर विचारात घेण्यासारखीच आहे करान हेल्मेट वापरल तर त्यांची हेअर स्टाईल खराब होते मग मुली कश्या इम्प्रेस होतील. यापेक्षा नकोच ते हेल्मेट आणि हेल्मेट न वापरणाऱ्या मुलिंच देखील बरोबर आहे कि स्कार्फ असताना हेल्मेट कशाला वापरायच आणि कधी चुकून वापरलच तर हेल्मेटच्या काचेतून सूर्याची अतिनीदेखील तुम्हाला अतिनील किरणे त्यांच्या चेहऱ्यावर पडली तर केवढा मोठा अनर्थ होईल. पुन्हा ब्युटीपार्लर मध्ये जा, यापेक्षा स्कार्फ अगदी उत्तम. घट्ट बांधल्यावर ऑक्सिजन देखील फिल्टर होऊन येतो. मग अतिनील किरणांचा तर प्रश्नच नाही.
खरतर मित्रांनो या तोट्यापेक्षा हेल्मेट वापराचे फायदेच जास्त आहेत. हेल्मेटचा उपयोग अपघातापासून संरक्षण फक्त एवढाच नसून त्याचे इतरही बरेच फायदे आहेत. जसे कि वाऱ्यापासून, धुळीपासून, डोळ्याचे, चेहऱ्याचे संरक्षण. तुम्ही जास्त प्रवास करा तरी देखील तुम्हाला फ्रेशनेस जाणवतो म्हणजे प्रवासानंतरचा थकवा जाणवत नाही. बरीच लोकं प्रश्न करतात तू हेल्मेट का वापरतोस असं विचारणाऱ्यास तुम्ही विचारा तुम्ही हेल्मेट का वापरत नाहीत ? मग त्यांना आपोआपच उत्तर मिळेल. हेल्मेटच्या काचेतून समोर पाहण्याचा फील वेगळाच आहे तो म्हणजे रोडवर फिरणाऱ्या वाहनांकडे तुम्ही स्थिरपणे पाहता. तुम्हाला रोडवरील वाहनांचा गोंगाट जास्त जाणवत नाही. बऱ्याच तरुणांमध्ये एक फॅड आहे ते म्हणजे गाडीचे आरसे काढून टाकण्याचे ! कदाचित त्यांना मागे वळून पहायला जास्त आवडत असेल म्हणून, पण जर तुम्ही हेल्मेट वापरत असाल तर तुमच्या गाडीला आरसे असायलाच हवे, आणि आपण तरुण कितीही निधड्या छातीचे असलो तरी न हेल्मेट वापरणाऱ्याच्या तोट्यापेक्षा, हेल्मेट वापराचे फायदे जास्तच आहेत. मग दुचाकी गाडी चालकाने हेल्मेट वापरले तर कुठे चुकते ?
जगात भारतामध्ये दुचाकी वाहनाचा अपघात होण्याच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त आहे. भारतापाठोपाठ चीनचा नंबर लागतो, आणि हेल्मेट वापरले तर अपघातात मृत्यूचे प्रमाण जवळजवळ ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घटू शकते. भारतात दुचाकी चालकासाठी हेल्मेट वापरायचे नियम आहेत, पण त्याचे सक्तपणे अंमलबजावणी होत नाही. काटेकोरपणे नियम पाळले जात नाहीत. अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये दुचाकी वाहनांचे अपघातांचे प्रमाण कमी आहे. अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे, कारण तेथे हेल्मेट वापरायचे प्रमाण जास्त आहे. अमेरिका- ऑस्ट्रेलियात फक्त मोटरसायकलिंसाठीच हेल्मेट सक्ती नाही तर सायकल चालकांसाठीही हेल्मेट सक्ती आहे. तेथील लोकं हेल्मेट वापरतातही. या देशांमध्ये ट्राफिक नियमांचे सक्तपणे अंमलबजावणी केली जाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नियमांनुसार दुचाकीचालकाने हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. विकसित देशांत चारचाकी वाहनांच्या अपघाताचे प्रमाण दुचाकी वाहनाच्या अपघातापेक्षा जास्त आहे. दुचाकी अपघातात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. पण हेल्मेट वापरल्यास मृत्यूचे प्रमाण घटते.
अहमदनगर शहराचा विचार केला तर शहरात हेल्मेट वापराचे प्रमाण तुरळक आहे. दुचाकी वापरापैकी अंदाजे १०-१५ टक्केच लोकं हेल्मेट वापरतात, म्हणून अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढते.
-अभिजित हजारे.
Good Articles in Marathi . Marathi Blog katta . lekh in Marathi language .
पदवीधर
Marathi Articles on Education
आज काल पदवीधर (ग्रॅजूएट) होणे म्हणजे रोज सकाळी चहाबरोबर वर्तमानपत्र (पेपर) वाचण्याइतपत सर्वसाधारण झालं आहे. जसं दिवस संपल्यावर वर्तमानपत्राच नाविन्य संपून रद्दित जमा होतो, तशीच परिस्थिती पदवीधर लोकांची आहे. यांना नव्यान काही सुचत नाही. काही नोकरी मिळवण्यासाठी पदवीधर होतात . काहीनां पदवी मिळवली तरी समजत नाही आपण कशासाठी पदवीधर झालो!
अनेक मित्रांना विचारलं सध्या काय करता तर उत्तर मिळालं एमपीएससी करतो, युपीएससी करतो. मला प्रश्न पडला ,एमपीएससी किंवा युपीएससी करतो म्हणजे नेमकं काय करतो! कारण माझ्या माहीतीप्रमाणे जगात एकाही विद्यापीठात हा कोर्स नाही, याचं प्रमाणपत्र कुठेही मिळत नाही. मग ही लोकं अशी उत्तरं का देतात? नीट विचार केला तर जगात सर्व जण रोज काहीतरी शिकत असतात, अभ्यास करत असतात. मग ते देखील एमपीएससी, युपीएससी च करतात ना! हा काहींच वय या स्पर्धा परीक्षांच्या अटीत बसत नसेल पण ते रोज शिकत असतात .
मग ते रोजच्या वर्तमानपत्रातून असेल, रोजच्या अनुभवातून असेल. हा ही लोकं फक्त स्व:त ला मी एमपीएससी करतो किंवा युपीएससी करतो असं लेबल लावत नाहीत एवढाच फरक!
अाज सर्वजण या पदांकडे उत्तम जाॅब म्हणून पाहतात . या स्पर्धा परीक्षा पास होऊन ठराविक लोक अधिकारी बनतात पण आपल्या आयुष्यातली उमेदीची वर्ष पणाला लावणा-या इतर तरूणांच काय? वयाच्या तीशी पर्यंत प्रत्येक तरुण पाहिलेलं स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करत असतो. हेच स्वप्न साकारण्यात त्याला अपयश आल्यावर त्याला किती वाइट वाटत असेल? काहीनां तर नैराश्य येत , जगण्यातील आनंद हरवतो. मी कोणालाही नाउमेद करण्याचा प्रयत्न करत नाही. ही वस्स्तुस्थिती आहे. मग एककलमी होऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यापेक्षा इतर व्यवसाय, जाॅब करत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला तर कुठे चुकते? म्हणजे पुढे येणा-या यश-अपयशाला सामोरे जाण्याची, पचवण्याची ताकद तरी राहते. आणि प्रत्येकाने पदवीधर झाल्यानंतर एकच फिल्ड निवडीवी हे कंम्पलसरी नाहीये!
मग मेंढराच्या कळपा प्रमाणे एकामागे एक जाण्यापेक्षा प्रत्येकाने आपलं वेगळ स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला तर कुठे चुकते?
-अभिजीत हजारे.
Best Articles to Read in Marathi Good Marathi Articles
निरागस
Best Articles to Read in Marathi Good Marathi Articles
रोज त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा आला होता. दुपारी एकटा असल्यान ठरवल की थोड़ फिरुन याव. मग असाच विचार करत रस्त्याच्या बाजूनं चालू लागलो. फिरता फिरता रस्त्याच्या कडेच्या बऱ्याच गोष्टी दिसत होत्या. रस्त्यावरच्या माणसांची बड़बड़ गाड्यांचा कर्कश आवाज, रस्त्याच्या कडेच्या विक्रेत्यांचे झोपेला आलेले चेहरे या गोष्टी पाहून, या सगळ्या पासून लांब जायचं ठरवलं. एकटा असल्यामूळ कोठेही जा कोणी अडवनार नव्हतं . चालता चालता कधी गावाच्या बाहेर आलो समजलच नाही. जवळच नदी असल्याने तिच्या कडेला बसावसं वाटलं. मला पाहीजे तेवढी शांतताही तेथे होती.
नदी म्हणजे गावाच्या बाहेर वाहनारी मैला सदृश एक नालिच. या नालीच्या कडेला कही हिरवे गार गवत होते अणि शांतता तर खुपच होती. बसलो असताना अचानक तिथे काही लहान मुलं आली. साधारण 10 ते 12 वयाची. सागळ्यांच्याच अंगावर शाळेच्या गणवेश होता. त्यांचे दप्तरही सोबतच होते यावरून ते शाळा बुडवून पोहण्यासाठी अले होते अस दिसत होतं. एकुणच पाण्याचा कुठलाही विचार न करता कपडे काढून सरळ सगळ्यांनी पाण्यात उड्या मारल्या व मुक्तपनणे पोहू लागले. मी विचार केला की एवढ्या खराब पाण्यात त्यांची त्यब्येत बिघडू शकते पण याची कुठलीही कल्पना मुलांना नव्हती. त्यांना फक्त त्या वेळेचा आनंद घ्यायचा होता. यावेळी एक विचार अाला की या मुलांचा आनंद किती किती अल्प गोष्टीत समावलेला आहे. मिळेल त्या गोष्टीचा आनंद मनसोक्त घेणे ह्यांना खुप लवकर समजलं. किती निरागस . नाहीतर अपण..एखादी गोष्ट मिळाली नाहीतर अडून बसतो. हट्ट करतो आणि खऱ्या आनंदाला मुकतो.
शाळा बुडवून सर्व मुले पोहण्यासाठी आली, कोणताही विचार न करता पाण्यात पोहले, पोहण्यात त्यांना जेवढा आनंद मिळाला जेवढा आनंद त्यांना शाळेत कदापिही मिळाला नसता. खरच निसर्गाच्या शाळेत जेवढं शिकायला मिळतं ते चार भिंतीत काय मिळणार…….
-विकास गोसावी.
Read marathi blogs . Marathi lekh . Marathi Blog katta . lekh in Marathi language .
१)त्या एस.टी. मधुन त्या मोठ्या शहरात मि उतरलो. त्या माणसाच्या गर्दित मि एकटाच होतो.मला दुरुन बाई चा आवाज आला.मि त्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली.मि वरती पाहिल तिथ १ भोंगा होता त्यातून आवाज आला. १ सुचना चोरट्यानपासुन सावधान आपला मोबाइल,पर्स व महिलानी आपआपली दागीने सांभाला धन्यवाद.. अस बोलुन पुन्हा तिच सुचना ऐकू आली. मि जरा हसलो मनात म्हटल त्या बाईने तर आमच्याच माणसान पासुन सावध रहायला लावल…हल्ली सगलीकडे चोर फिरतात त्याना सुट्टी नसते वाटत…माणुस स्वत:चीच चोरी करतो. प्रत्येक जन कशाची न कशाची चोरी करतोच प्रत्येकाच्या मनात चोर लपलाय. प्रत्येक क्षेत्रात मानसातला चोर फिरतोय…आपण जर मनातला स्वार्थ काढला तर त्या चोरानपासुन सावध रहा….अशा सुचनेची गरज नाही.
२) मि रस्त्यान जाताना मला रस्त्यात १ माणुस झोपलेला दिसला.येनारी-जानारी लोक त्याच्याकडे पाहत होती.झोपलेला माणुसाचे केस वाढलेले, अंगावर फाटलेला झब्बा त्याच्या डोक्यापाशी टरबूज अगदी निवात झोपला होता. तो वेडा होता. त्याच्या कडे पाहुन वाटे कि त्याच आयुष्य खुप सुंदर आहे..त्याला कसलही टेंशन नाही. जस प्रत्येकाला परीक्षा,नोकरी,बायका पोरानच असत.तस त्याला नव्हत टेंशन. येनारी जानारी लोक त्याला पाहुन हसायची. तर काही त्याला दगड मारायची….मग वेड कोण? तो बिचारा शांत झोपलाय तो? कि त्याच्यावर हसनारी,दगड मारणारी लोक????
-विराज अवचिते.
Vaicharik lekh Read marathi blogs . Marathi lekh . Marathi Blog katta . lekh in Marathi language .
सुशिक्षीत ‘आडाणी’
आज आपल्या या देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढले असले तरी ही साक्षरता आपल्या दैनंदिन जीवनात कितपत उतरली आहे हे पाहन्याजोगे आहे. खरतर ज्या प्रमाणात जग बदलत आहे त्या वेगात आपल्या पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम, शिक्षणव्यवस्थेत बदल होत नाही.मुलांना दाहवींनंतर आपली आवडीची फिल्ड निवडता येत नही.यासाठी करियर विषयक मार्गदर्शन गरजेचे आहे. आज इंटरनेट , व्हाट्सअॅप,फेसबुक या नवीन माध्यमांचा उपयोग कोणत्या गोष्टींसाठी करायचा याचे मार्गदर्शन गरजेचे आहे.
आजच्या तरुणांमधील सामाजीक जबाबदारी, भान हरवत आहे . कधी एखादा अपघात झाला तर ही मंडळी अपघाती व्यक्तीला मदत करण्याएवजी त्याचे फ़ोटो काढून व्हाट्सऐप वर टाकतात, या ऐवजी अपघाती व्यक्तीला मदत केली तर त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात . आजचा सुशिक्षीत तरुण हा एकलकोंडा , त्याच्याच विश्वात रमनारा होत चाललाय . आज इतर व्यसनांबरोबरच व्हाट्सअॅप, फेसबुक, मोबाईल चे देखील व्यसन तरुणांना लागत आहे .फेसबुक वर आपल्या फोटोला लाइक कमी मिळाल्या तर निराश होण, या सगळ्या गोष्टी आज वाढत आहेत . याचा विचार शिक्षणव्यवस्थेने करणे गरजेचे आहे. आजच्या सुशिक्षीत तरुणांमधील क्रियेटिव्हीटी नष्ट होताना दिसतेय. त्यांना पदवी मिळवल्यानंतर फ़क्त नोकरी आणि छोकरी एवढच सूचतं. अर्थातच दैनंदिन गरजा भागवन्यासाठी पैशांची गरज आहेच पण या बरोबर आपला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करण्याची हिम्मत हा तरुण दाखवत नाही.
एकूणच काय आपल्या या तरुणांच्या देशामधील तरुण साक्षर जरी असला तरी तो आपल्या साक्षरतेचा वापर तो समाजाच्या विकासासाठी करत नही. तो आपल्याच विश्वात गुरफटलेला आहे, त्याला सामाजीक भान नाही. म्हणजेच हा एक प्रकारचा सुशिक्षीत ‘आडाणी’पणाच आहे.
-अभिजीत हजारे
Marathi Sundar Lekh Read marathi blogs . Marathi lekh
ही तर एक क्रांतीच!
काही दिवसांपूर्वी शनिशिंगणापुर येथील मंदिरात शनि देवतेच्या मुर्तीजवळ एक महिला गेल्याने किती रान पेटले होते हे नव्याने सांगायला नको. समाजात आजही स्रीयांना समान वागनूक दिली जात नाही. स्री-पुरुष समानता ही फक्त कागदापुरतीच मर्यादित आहे. आजही त्यांचावर अत्याचार होतात. हेच काय रुढी परंपरेत देखील स्रीयांना समानता नाही. पण या असमानतेच्या विरोधात सातारा मधील साेळशी येथील महिलांनी उचललेले पाउल म्हणजे एक क्रांतीच म्हणावी लागेल. येथील महिलांनी शनि मंदिरात जाऊन शनि देवतेची उपासना केली. मंदिरातील पुजारी प्रथम विरोध करत होते पण महिलांनी कायद्याची भाषा वापरल्यावर ते बाजूला झाले.
समाजावर होणे-या अन्यायाला थांबवण्याठी वेळोवेळी उठाव झाले. स्रीयांना समानता व त्यांचावरील अत्याचार थांबवण्यासाठी उठावाची गरज अाहे. बहुतांश महिला चुल आणि मुल एवढच आयुष्य जगत असल्या तरी काही अंशी मुली शिकून पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. बदल होतायत पण ठराविक गोष्टींमधेच! सुशिक्षीत महिलांवर देखील अत्याचार होत आहेत, हे थांबण्यासाठी समाजाचा स्रीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आदरयुक्त असायला हवा.
आज स्रीरुपी दुर्गेचे, देवी लक्ष्मीचे पुरुष मंदिरात जाउन दर्शन घेऊ शकतो मग स्रीयांना प्रत्येक मंदिराचे दार का उघडे नसावे? आणि असच असेल तर पुरुषांना देखील देवीच्या मंदिरांत प्रवेश नसावा.
-अभिजीत हजारे.
Best Articles to Read in Marathi Good Marathi Articles
आपण कुठे चाललोय ?
आज आपल्या संपुर्ण भारत देशात असहिष्णुतेच वारं पसरायला लागलं आहे .आपला देश सहिष्णुता पुरस्कृत धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो पण आज आपल्याच देशात हिंदू-मुस्लिम -शीख-ख्रिचन धर्मीयांमध्ये धार्मिक तेढ़ निर्माण करण्याचं काम धर्मांध शक्तिंकडून केलं जात आहे .
एकीकडे हिन्दू -मुस्लिमांमध्ये दंगली पसरवल्या जातात तर दुसरीकडे पंजबमध्ये शीख बांधवांचा धर्मग्रंथ ‘ गुरुग्रंथसाहिब’ग्रंथाची विटंबना करून धार्मिक तेढ़ वाढवली जात आहे .
सहिष्णुतेचा पुजारी असणारा आपला देश. याच देशात विवेकवादी डॉ. नरेंद्र दाभोलकर ,कॉ.गोविंद पानसरे ,व एम. कलबुर्गी यांसारख्या विचारवंतांच्या, समाजसेवकांच्या कत्तली ,लेखकांवर,पत्रकारांवर हल्ले होत आहेत .यांमुळे लेखक ,विचारवंत ,पत्रकार यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याचबरोबर लेखकांच्या लेखनीवर गदा यायला लागली आहे .तर दुसरीकडे दलित अल्पसंख्यांक कुटुंबावर हल्ले होत आहेत .कोणी पण वाटेल ते बोलून समजमध्ये द्वेष पसरवत आहेत .
समाज माध्यमांतून अफवा पसरवल्या जात आहेत आणि आपला समाज याच थोतांडशाहिला बळी पडतो आहे .
हे कुठेतरी थांबायला हवं? व आपली वाटचाल विकासाकड़े व्हायला हवी पण आपण प्रगतिकडे जाण्याऐवजी आपण अधोगतिकडे जात आहोत का? यावर विचार करणे गरजेचे आहे.
-भरत मोहळकर.
Marathi Blog katta . lekh in Marathi language
विकास पर्यावरणाचा
निसर्गाचं चक्र फिरलं की दुष्काळ पडतो .पण निसर्गाचं चक्र का फिरतं याचा आपण साधा विचारही करत नाहीत .मानव प्राणी स्वतःची आततायी भूक भागवण्यासाठी व विकासाच्या नावाखाली जंगलेच्या जंगले नष्ट करत आहेत .व सिमेंट ची जंगले उभी करत आहेत. एकीकडे पर्यावरण वाचवा संदेश देण्यासाठी कार्यक्रम घेतले जातात तर याचं कार्यक्रमाचे झेंडे लावण्यासाठी झाडाच्याच फांद्या मोडल्या जातात. एकीकडे पर्यावरण दिन साजरा केला जातो तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली , रस्ते बांधण्यासाठी,कॉरीडोर उभरण्यासाठी,स्मार्ट सिटीच्या नावाखाली जंगले भुइसपाट केली जात आहेत. आज त्याचाच दुष्परिणाम म्हणून उन्हाळ्यात पाऊस अन् पावसाळ्यात ऊन अन् हिवाळ्यात गारा असा फटका बसतो आहे. आणि त्यामुळेच दुष्काळ , अावर्षण ,गारपीठ यांसारख्या समस्यांना सामोर जाव लागत आहे. विकासाच्या नावाखाली महाभयंकर प्रदूषण होत आहे तर एकीकडे बेसुमार वृक्षतोड़ होत आहे. पावसाने दांडी मारली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लगते. पशु- पक्षी तहानेने तड़फड़तात प्रदूषणाने अनेक नवीन रोग निर्माण होऊ लागले आहेत .हे कुठेतरी थांबायला हवं ना त्यासाठी पर्यावरण जनजागृती करणं गरजेच आहे. सर्वसमान्यांच्या मनात पर्यावर्णाविषयी आपुलकिची भावना निर्माण व्हायला हवीं . अाणि पर्यावरणाचा विकास देखील व्हावा. नाहीतर आपण जंगले भकास करुन कसला विकास साधणार
-भरत मोहळकर.
Best Articles to Read in Marathi Good Marathi Articles
वंचितांची असहिष्णुता
आज आपल्या देशात असहिष्णुतेच्या मुद्यावर रोजच फैरी झड़तात .याच मुद्यावर पुरस्कार वापस केले जातात दादरीसारख्या घटना देशात क्वचित् घडतात अन् याच मुद्यावर रान पेटवलं जातं पण रोजच आदिवासींवर पोलिसांचा खबर्या असल्याचा आरोप करुन होणार्या कत्तलीमधुन पसरणारी असहिष्णुता या सर्वांना का दिसत नाही ? पोलिसामार्फत नक्षलवादी समजून आदिवासींवर होणारे अत्याचार म्हणजे असहिष्णुता नव्हे का ?पण याकडे आपण साफ दुर्लक्ष करतोय का ?
आज असहिष्णुतेच्या मुद्यावर लेखक, विचारवंत,अभिनेते ,कलाकार ,सामाजीक कार्यकर्ते पुरस्कार परत करत आहेत .राजकीय पुढारी त्यावर बोलत आहेत पण आदिवासींच्या प्रश्नावर ,नक्षलवादावर ‘तेरी भी चुप मेरी भी चुप ‘का ?या गोष्टींवर कोणीही बोलत नाही ही दुर्दैवाची बाब .सरकारकडूनही या मुद्यांना बगल का ? सरकारकडून नक्षलवाद्यांशी चर्चेचे धाडसी निर्णय घेऊन त्यांचे प्रश्न सोडवायला हवेत.
नक्षलवाद्यांना लोकशाहीवादी भारतातील म.गांधी, स्वामी विवेकानंद ,भगवान बुद्ध,भगवान महावीर यांचे शांतता ,संयम,अहिंसा,सहिष्णुता विचार त्यांना देण्यात आपण अपयशी का ठरतोय ?
कि खरचं याही मागे कुठेतरी राजकारण दडलंय का ?
-भरत मोहळकर.
Marathi lekh on life . Marathi articles on life . Marathi Blog Jagat
अंधश्रद्धा असमानतेची
महाराष्ट्रात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. सर्वांना सामान वागणूक दिली पाहिजे , महिलांना अजूनही समान वागणूक दिली जात नाही. अाज २१ व्या शकतात देखील महिलांना काही मंदिरात प्रवेश नाही.महिलांनी जर बजरंगबली, शनिमंदिरात जाऊन पूजा केली तर काय बिघड़नार आहे. एकीकडे तुम्ही स्री-पुरुष समानतेची गीत गातात आणि दुसरीकडे समाजात स्रीयांना दुय्यम वागनूक दिली जाते. महाराष्ट्रातील शनिशिंगनापुर येथे शनिदेवाच्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही तरी पण एक महिला नकळत पणे मंदिरात गेली नंतर त्यावर मोठी चर्चा! त्यानंतर शनिमंदिरातील मूर्तिला दुधाने धुतले गेले, म्हणजेच दुधाने अभिषेक केला असे म्हटले जाते.म्हणजेच महिलांना अजुनही खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते. ही अंधश्रद्धा कधी संपणार ज्या महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकर आणि गोविन्द पानसरे या महान व्यक्तींना अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचले, तरीही लोकांच्या मनातील अंधश्रद्धा निघत नाही. जेवढे दूध त्या मूर्तिवर ओतले गेले तेवढे जरी अनाथ निराधार मुलांना दिले असते तर कमीत कमी त्याचे पोट भरले असते. असेच चालत राहिले तर कधीच सुधारना होणार नाही.पण कोण सांगणार या अंधश्रद्धाळु लोकांना, श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नका ठेऊ.
-अंकुश धवने.
यांना काय फरक पडतो ?
काय फरक पडतो रोहित हा कोणत्या जतिचा होता, समाज व राजकीय तथाकथीय यामागील खरे गुन्हेगार आहेत.. आजही समाजात रोहित सारखे हजरो लाखो जण या व्यवस्थेचे बळी आहेत.. या मगील खरे कारण शोधयचे झाले तर प्रतिष्ठा व सत्ता हे दिसून येइल.. प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वसामान्य व मागासवर्गीयांची गळचेपी चाललेली दिसून येत आहे. अगदी पहायच झाल तर मध्यमामध्ये ही हा प्रकार सर्रास चललेला दिसून येतो. बाकी क्षेत्राच तर विचारायलाच नको. का सर्वसामान्यानाही जीवन असतं हे तथाकथीत प्रतिष्ठाितांना अजुनही मान्य नाही. जीवन जगण्याचा अधिकार अम्हालाही आहे. आज रोहित आहे उद्या मी असु शकतो.
बाबासाहेबानी घटना लिहली ती फक्त कगदापुर्तीच मर्यादित आहे का? गरज आहे खरा इतिहास पुढे येण्याची. तरुणपिढीला खरा इतिहास जो पर्यंत कळत नाही तो पर्यन्त सर्वसामान्य हा गुलामगिरी मध्ये अडकून राहणार आहे. एकच सांगतो आहे , तथाकथीताना आम्ही जोपलो नाहीत. आमच्या सहनशक्तिचा अंत पाहु नका. विसरु नका ज्या ठिकाणी शिवाजी महाराज, डाॅ. अंबेडकर, शाहु-फुले जम्नले आहेत त्याच मातित अमचा जन्म झलेला आहे.
-विजय डोळे.
Popular Marathi Blogs . Marathi Blog list . Marathi Blog Sites . Marathi Blogs on life
विकासाच्या दृष्टीने विचार करा…
ज्याला दोन वेळेच्या जेवन्याची भ्रांत आहे, ज्याला इतभर कापड घालायाला नाहीत, देशातील पिडित लेकी बाळीला , ऐथील दगडाना, मातीला, झाडांना, नद्याना विचारा देशद्रोही कोण आहे ते??
राजकारणी स्वतःची पोळी भाजुन घेण्यासाठी अनुकूल परस्थिती निर्माण करतात आणि त्यात भरडला जातो तो सर्वसामान्य.. कोणा एका पक्षाला दोष देऊन उपयोग नाही…. आपण विचार करायला पाहिजे.. चांगल काय?वाईट काय? हा विचार करुन आपल स्वतःच मत केल पाहिजे. जो पर्यन्त जनता विचार करणार नाही तोपर्यंत हे राजकारणी स्वतःची पोळी भाजुन घेत राहणार. पण एकदाका हा सर्वसामान्य (coman man) विचार करायला लागला तर राजकीय पक्ष व नेतेमंडळी यांना त्यांची ध्येय धोरण बदलल्या शिवाय गत्यंतर नाही..
कारण एकंदरीत मागील काही घटनंचा अभ्यास केला तर असा निष्कर्ष पुढे येतो की जो काही जातीय व धार्मीक कलह चलला आहे, यावर तोडगा काढण्याच्या ऐवजी अधिकाधिक चिघळत जताना दिसतोय आणि विरोधी पक्ष याच गोष्टीसाठी टपुन असतात मग तो कोणताही विरोधी पक्ष असो तो फक्त स्वतःच्या फयद्याचा विचार करतो.
एकंदरीत सांगन्याचा उद्देश् हाच की सर्वसामान्यनी स्वतः विचार करावा देशभरातील सर्व समस्या निर्माण झाल्यात , देशात विकासाला गती मिळावी आणि आपण विकसनशील पासुन आपली गनणा विकसीत देश म्हणून व्हावी. नेत्याला निवडून दिलं की जनतेची जबाबदारी संपत नाही, विकास होतोय की नाही हे जनतेने बघायला पाहीजे किंबवना राजकारण्यांकडून विकासाची कामे करवून घेतली पाहीजेत.
भारतातील 50% लोकांना जात धर्म यांच काही घेन देन नाही. ते एकवेळेस स्वताच पोट भरु शकत नाहीत त्यांना काय करायचय कोण देशद्रोही आणि कोण देशभक्त…
-विजय डोळे.
Marathi Blog list . marathi websites . Good Marathi Blogs . Best Articles to Read in Marathi Good Marathi Articles .
‘शेतकर्यांना कर्जमाफी नको’ स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांची भुमिका. ‘त्या पुढे असेही म्हणाल्या कि एकदा कर्जमाफी दिल्याने त्यांची पतशिस्त बिघडते.कारण एकदा कर्जमाफी मिळाली कि शेतकरी पुढच्या कर्जमाफीकडे डोळे लावून बसतात.’ कुणीही उठावं आणि शेतकर्यावर शरसंधान करावं. या पांढरपेशी लोकांनी पोशिंद्यालाच भिकारी समजावं. खरचं शेतकर्याची एवढीही लायकी नाही का? शेतकर्याची एवढी पत ढासळली आहे!
अनेक सरकारे आली त्यांनी लोकशाही व्यवस्थेत शेतकर्यांचा फक्त कडीपत्त्यासारखाच वापर केला. आताही झालेल्या निवडणूकित शेतकर्यांना कर्जमाफीच गाजर दाखवण्यात आलं. पण आता तेच विषय बदलत आहेत. सरकार कडे केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्यासाठी, सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी, लोकप्रतिनिधींचे वेतन वाढवण्यासाठी तरतुद आहे पण शेतकर्यांसाठी नाही.असं का?
नोटबंदीनंतर उद्योगपतींच कर्ज माफ करतांना पत ढासळली नाही , उद्योगांना बिनव्याजी कर्ज देतांनाही त्यांची पत ढासळली नाही मग शेतकर्यांच्या कर्जमाफी नंतर पत ढासळेल यात कितपत तथ्य आहे. अरूंधती भट्टाचार्य पुढे म्हणतात,’शेतकर्यांना दिलेल्या कर्जाची भविष्यातही परतफेड नसतेच.’ म्हणजे शेतकर्याला फसवे समजले का?
आयुष्यात शेती काय असते? शेतकर्यालाही मन असते हा विचार न केल्यानेच अशा comment करतात.
उघड्या आकाशाखाली आयुष्याची पुंजी ठेवून ती उघड्या डोळ्यांनी उध्वस्त होत आहे हे पाहतांना त्याला काय वाटत असेल याचा विचारही त्या बाईने करू नये यासारखी शोकांतिका ती काय?
कर्ज काढून पेरणी केली. दिवसरात्र राबला आणि तोंडात घास घालायचा तर निसर्गाचा कोप झाला आणि तोंडाशी आलेला घास हिरावून नेला. उभी पिके भुईसपाट झाली. उरलेल्या मालाला भाव नाही.
म्हणजे शेतकर्याने कोळशाचा धंदा केला आणि तोही वाया गेला अशी स्थिती शेतकर्याची झाली. तरीही शेतकरी उभा आहे
शेतकर्याला कर्जमाफी द्यायची का नाही खुशाल ठरवा पण शेतकर्याला चोर तरी ठरवू नका.
– भरत दिलीप मोहळकर.
Experts Blog Marathi . Good Articles to Read in Marathi . Marathi Katha Blog
रिअँलिटी आणि फिल्म
सध्या पाऊस झाल्यामुळे निसर्ग सर्वांगाने नटला आहे म्हणुनच निसर्गाची सुंदरता लुटण्यासाठी निसर्गनेढे तिथे पोहचतातच सेल्फी च्या काठ्या घेऊन . या काठ्या खरतर बहुउपयोगी सेल्फी तर काढतातच पण त्याचबरोबर डोंगर दऱ्यात तोल सांभाळताना यांचा भलताच उपयोग तसेच रोडवरती व जंगलातील प्राण्यांनाही या काठ्या जवळ बाळगून असलेल्या प्राण्यांपासुन चार हात लांब ऊभ राहायला पाहीजे हे लगेच समजत. नाहीतर या काठ्याच्या मोहात पडून जिवालाही दगा फटका बसू शकतोच याची भिती .
ऊन्हाळ्यात कुत्रे जसे गटारीत वगैरे लोळतात तसेच हे सेल्फी आणि काठ्यावाले पावसाळयात पाणी दिसेल तिथे लोळतात . स्वताची शुद्धी आणि पाण्याची अशुद्धी करुण मोकळे होतात
गली गली बाहुबली हे गाण हळुहळु त्याच्या कानात घुमायला लागतं . हे निसर्गावर प्रेम करणारे वेडे कधी निसर्गाला आपल्या मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतात हे त्यांनाच समजत नाही
… शेवटी तो निसर्गच कुणाच्या हाती लागणार ?
-अभिजीत हजारे.
Marathi lalit lekh Experts Blog Marathi . Best Articles to Read in Marathi Good Marathi Articles
मकरसंक्रांति निमित्त
मकरसंक्रांति येते पण काहीतरी हरवतय…
दरवर्षीपेक्षा या वर्षी थंडी जरा कमीच आहे. थंडीची लाट आली पण फक्त एक दोन दिवसच! मकरसंक्रांति म्हण्टलं की तिळगुळ अाला, थंडी आली आणि पतंग देखील. पण हल्ली हे सगळं
हरवतय.
मला आठवतंय मी लहान असताना मकरसंक्रांति दिवशी गावातलं प्रत्येक घर आम्ही सारे मित्र पिंजून काढायचो. घरातल्या वडीलधा-या व्यक्तींचे आशिर्वाद घ्यायचो. ते तिळगुळ द्यायचे असं करत आमच्या जवळची तिळगुळची छोटी पिशवी भरायची. मग ही पिशवी शाळेत आमच्या सोबत आसायची . शाळेत ही सर्व मित्र एकमेकांना तिळगुळ द्यायचे.
पण आता जसं वय वाढतय तसं बालपणाचे निरागसपण हरवत चाललंय . आता मकरसंक्रांति दिवशी गावातली घरं फिरायची लाज वाटते. हल्ली सगळं बदलतय लहान मुलं काॅम्पुटर, मोबाईल वर गेम खेळतात . मकरसंक्रांति च्या निमीत्ताने मित्रांच्या नातेवाईकाच्या गाठीभेटी व्हायच्या, पण हल्ली हे सगळं हरवतय. आता सगळे व्हाट्सअॅप, मोबाईल वर तिळगुळ घ्या गोड-गोड बोला एवढं बोलून मोकळे होतात.
– अभिजीत हजारे.
Amhi Marathi . Blogkatta . Vaicharik lekh . Marathi lalit lekh . Top Marathi Sites . Internet in Marathi . Marathi Sundar Lekh . Experts Blog Marathi . Good Articles to Read in Marathi . Read marathi blogs . Marathi lekh . Popular Marathi Blogs . Marathi Blog list . marathi websites . Good Marathi Blogs . Marathi Katha Blog . Marathi Blogs on life . Best Articles to Read in Marathi Good Marathi Articles
Leave a Reply