हिंदूहृदय सम्राट!!! ज्यांनी मराठी माणसांमध्ये स्वाभिमान जागा केला, स्वतःचा हक्कासाठी लढायला शिकवले, असे बाळासाहेब ठाकरे युगपुरुष होते. Balasaheb Thakre Information Biography Jivani in Marathi language
Balasaheb Thakre Information Biography Jivani in Marathi language
Balasaheb Thakre Essay speech Marathi language
“गोष्ट एका वाघाची”
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे”
बाळासाहेब ठाकरे निबंध भाषण माहिती मराठी
एक अस नाव ज्याला महाराष्ट्रातच काय पण संपूर्ण हिंदुस्थानात परिचयाची गरज नाही माननीय “बाळासाहेब ठाकरे”.
ही कहाणी आहे शिवसेना नावाच्या संघटनेच्या निर्मात्याची.ही कहाणी आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला लढाऊ आवाज देणाऱ्या लोकनेत्याची.
ही कहाणी आहे स्वतःकडे कोणतंही पद न घेता महाराष्ट्रतल्या सर्वात लढवय्या संघटनेचं निर्विवाद नेतृत्व करणाऱ्या असामान्य माणसाची.
ही कहाणी आहे असामान्य माणसांची जगप्रसिध्द व्यंगचित्र काढणाऱ्या आणि सामान्य कार्यकर्त्याला असामान्य पदावर बसवणाऱ्या राजकीय नेत्याची.
ही कहाणी आहे हिटलरच्या ज्यू द्वेषाचा निषेध करणाऱ्या पण त्याच्या संघटन कौशल्य आणि राष्ट्रप्रेमाचे उघड कौतुक करणाऱ्या माणसाची.
ही कहाणी आहे त्या राजकीय नेत्याची ज्याने स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच हिंदूंचे तेज राजकीय शक्तीत परावर्तित करून दाखवले.
ही कहाणी आहे एका स्पष्टवक्ता आणि जे बोललोय त्यावरून कधीच मागे हटणार नाही असं निर्भीड व्यक्तिमत्त्व असणाऱ्या असामान्य माणसाची.
ही कहाणी आहे कारारीपणा आणि मराठी माणसाच्या अखंड स्वाभिमानाचा जिवंत उदाहरण असणाऱ्या माणसाची.
ही कहाणी आहे “बाळ केशव ठाकरे” या माणसाची ही कहाणी आहे “बाळासाहेब ठाकरे” या वादळाची.
“येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो आणि मातांनो” या एका वाक्याने पाच दशके महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे राजकारण हलवून टाकले.
Balasaheb Thakre Information Biography Jivani in Marathi language
बाळासाहेबांबद्दल काय आणि किती लिहायचं पण त्याचं कार्यच अस आहे की माझ्यासारख्या मराठीचा प्रचंड अभिमान असणाऱ्या माणसाला त्यांच्याविषयी आकर्षण असंण आणि त्यांच्याबद्दल लिहावंसं वाटणे साहजिकच आहे त्याचाच हा प्रयत्न करत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे बालपण
बाळासाहेबांचा जन्म समाजसेवेचा आणि प्रबोधनाचा वारसा असणाऱ्या “प्रबोधनकार” म्हणून ओळख असणाऱ्या केशव ठाकरे यांच्या पोटी पुण्यात 23 जानेवारी 1926 रोजी झाला. समाजकार्याची जाणीव रक्तातच होती ती बाहेरून शिकवायची गरज नव्हती.
प्रबोधनकारांना वाटत होतं बाळासाहेबांनी संगीत क्षेत्रात योगदान द्यावे पण बाळासाहेबांना ते काही जमलं नाही ते काम त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी केले.
त्या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात चालू होते आपल्या स्वतःच्या मुंबईसाठी मराठी माणूस रस्त्यावर उतरला होता त्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरे महत्वाचे नेते होते.
त्याचाच प्रभाव बाळासाहेबांवर खूप पडला प्रबोधनकारांचा प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक विचारांचा वारसा बाळासाहेबांमध्ये कळत नकळत उतरला.
एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली.
Balasaheb Thakre Essay speech Marathi language
व्यंगचित्रकार म्हणून करियर
- 1950 मध्ये ते “फ्री प्रेस जर्नल” मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करू लागले.
- पुढे त्यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्यासोबतही काम केले.
- बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला.
- ऑगस्ट 1960 मध्ये त्यांनी “मार्मिक” हे साप्ताहिक सुरू केले.
हे मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. संयुक्त महाराष्ट्र तर स्थापन झाला होता पण मुंबईत मराठी माणसावर अन्याय हा होतच होता मराठी माणसाच्या प्रश्नावर बाळासाहेबांनी मार्मिक मधून आवाज उठवला.
मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्या परप्रांतीयांना बाळासाहेबांनी वठणीवर आणले. मराठी माणसावर अन्याय हा होतच होता फक्त व्यंगचित्र काढून काही होणार नाही मराठी माणसाचा स्वाभिमान आणि अभिमान जागा करायला पाहिजे हे बाळासाहेबांना कळाले.
मराठी माणसांसाठी लढा
“हर हर महादेव” ची गर्जना परत एकदा संपूर्ण महाराष्ट्रात घुमायला पाहिजे असं त्यांना वाटले.
एकदा प्रबोधनकारांनी विचारलं “बाळ लोक तर जमतायेत गर्दी तर वाढतीये पण यांना संघटनेचं रूप देणार की नाही? काही नाव सुचलय का नाही?”
बाळसाहेब बोलले “विचार तर चालू आहे पण संघटनेला नाव..” त्यांना थांबवून प्रबोधनकांर बोलले “मी सांगतो नाव…शिवसेना” आणि 19 जून 1966 रोजी भारतातला सर्वात लढवय्या राजकीय पक्ष शिवसेना स्थापन झाली.
समाजसुधारकांची जेवढी मोठी परंपरा या महाराष्ट्राला आहे तितकी हिंदुस्थानात काय पण जगात दुसऱ्या कोणत्याच राज्याला नाही. तरीही मराठी माणूस हा मागे होता निपचित पडला होता अन्याय होतोय हे माहीत असून देखील लढत नव्हता. महाराष्ट्रात सुविधा आहेत पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत पण मराठी तरुण बेरोजगार आहे. महाराष्ट्रात पैसा तर आहे पण मराठी माणूस गरीब आहे अशी परिस्थिती होती.
बाळासाहेबांनी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा ठरवलं. शिवरायांचा वारसदार असणाऱ्या मराठी माणसाला स्वराज्य तर मिळालं होतं पण या आपल्याच स्वराज्यात तो परका झाला होता. सगळे उद्योग परप्रांतीयांचे आणि त्यांनी माणसे पण परप्रांतीयच कामाला ठेवली.
मुंबई होती मराठी माणसाची पण आपल्या या मुंबईतुन मराठी माणूस हद्दपार होण्याच्या मार्गावर होता. या अश्या परिस्थितीत बाळासाहेबांनी 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवाजी पार्क म्हणजेच “शिवतीर्थावर” पहिला दसरा मेळावा घ्यायचं ठरवलं आणि मराठी माणसाला एकत्र आणण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. पहिल्या वहिल्या दसऱ्या मेळाव्याला अखंड महाराष्ट्रातून 5 लाख लोक आले होते. इतके लोक महाराष्ट्रानेच काय पण संपूर्ण हिंदुस्थानने स्वातंत्र्यानंतर राजकीय सभेला पहिल्यांदाच बघितले असतील. त्याच मेळाव्यात बाळासाहेबांनी “बजावो पुंगी हटाव लुंगी” चा नारा दिला. एकत्र आलेला मराठी माणूस पेटून उठला “मुंबई आमच्या हक्काची! नाही कुणाच्या बापाची!” अश्या घोषणा करत मुंबईच्या रस्त्यांवर घुमू लागल्या आणि मराठी माणसाला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होऊन मराठी माणूस पेटून उठला.
अवघ्या दोनच वर्षात ठाणे महानगरपालिकेवर भगवा फडकला पुढच्या एका वर्षात भारताची आर्थिक राजधानी असणारी मुंबई शिवसेनेने काबीज केली. शिवसेना, शिवतीर्थ आणि मराठी माणूस यांचं हे अतूट नाते आजतागत टिकून आहे.
आपल्या भाषणाबरोबरच मराठी माणसाचा आवाज हा तळागाळात जावा यासाठी त्यांनी “सामना” हे वृत्तपत्र सुरू केले. सामना हे केवळ शिवसेनेचं मुखपत्र नसून तो जिवंत झालेल्या मराठी माणसाचा हुंकार आहे असं बोलल्यास वावग ठरणार नाही. संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट बघत असे.
बाळासाहेबांची भाषणाची शैली युवकांना आकर्षित करत होती देशाच्या राजकारणाने बाळासाहेबांइतका आक्रमक नेता तेव्हा तरी बघितला नव्हता. प्रक्षोभक भाषणामुळे बाळासाहेबांना 1969 साली पहिल्यांदा अटक झाली मुंबईला आपल्या एका शब्दावर बंद पडणाऱ्या या वाघाला अटक झाली मराठी माणूस आणखीनच पेटून उठला मुंबई मध्ये दंगली सुरू झाल्या जाळपोळ झाली बाळासाहेबांना सोडून दिले.
1984 मध्ये भिवंडीत दंगल झाली आणि बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. 90 च्या दशकात हिंदुत्वाचा मुद्दा देशात पेटला होता शिवसेनेनं भाजपा सोबत युती केली काश्मिरमध्ये हिंसाचार वाढत होता काश्मिरी पंडितांना काश्मीर मधून पळवून लावले जात होते आणि त्यातच आतंकवाद्यांनी आमरनाथ यात्रा बंद पडण्याची धमकी दिली. बाळासाहेबांनी त्याला आपल्या भाषेत उत्तर दिले मुंबईतुन निघणारी हज यात्रा बंद पाडली. पुढच्या 24 तासातच आमरनाथ यात्रा परत सुरु झाली देशाच्या राजकारणात बाळासाहेब पहिल्यांदाच उतरले होते.
90च्या दशकात बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखर पणे उचलून धरला त्याच दशकात बाबरी पडली बाळासाहेब गर्वाने सांगत जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्या शिवसैनिकांचा गर्व आहे.
बाळासाहेबांनी त्यांची हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट सांगितली होती जो कोणी या देशात राहतो आणि ज्याला या देशाविषयी अभिमान आहे मग तो मुसलमान असो नाहीतर हिंदू माझ्यासाठी तो हिंदूच आहे. ते त्यांच्या भाषणात बोलत असत ज्या “हिंदूंना आपल्या देशाविषयी प्रेम नाही त्यांच्यापेक्षा मला अब्दुल कलाम, झहीर खान आणि इरफान पठाण यांसारखे मुसलमान अधिक प्रिय आहेत”.
1995 मध्ये जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार आले तेव्हा बाळासाहेबांच्या सांगण्यावरून अनेक चांगली कामे झाली बाळासाहेबांनी उड्डाणपुलांची कामे केली मुंबई सुशोभित करण्याचे काम केले. बाळासाहेब मुंबईचे राजे आहेत असं वाटत होते इतकं प्रेम मराठी माणसाने त्यांना दिल होतं.
बाळासाहेबांच्या एका शब्दावर मुंबई बंद होत होती. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तेव्हा भारताने पाकिस्थान सोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेऊ नयेत ही भूमिका बाळासाहेबांनी मांडली त्यांनी तर वानखेडेची खेळपट्टी पण खोदून काढली शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या सांगण्यावरून.
1999 मध्ये बाळासाहेबांवर मतदान करण्यावर आणि निवडणूक लढवण्यावर 6 वर्षांची बंदी घालण्यात आली. बाळासाहेब कधीच निवडणूक लढले नाहीत त्यांनी नगरसेवक बनवले, आमदार बनवले, मंत्रीच काय पण मुख्यमंत्री देखील बनवले.
बाळासाहेब सांगत, “लोक बोलतात माझ्या हातात सरकारचा रिमोट कंट्रोल आहे आणि जर चांगली काम होत असेल तर आहे माझ्याकडं रिमोट कंट्रोल.”
आपल्या आख्या हयातीत ते कधीच एकदा बोललेल्या विधानावरून मागे हटले नाहीत भले ते चुकीचं असो मी बोललो ना बोललो कोणाला काय करायचं ते करा असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब जेव्हा कधी कोणाचा विरोध करायचे तेव्हा दुष्मणासारखे आणि कोणाची बाजू घ्यायचे ती अशी की त्यांच्या सारखा कोणी मित्र नाही. बाळासाहेब ना तर मुख्यमंत्री होते नाही पंतप्रधान पण त्यांचा रुतबा कधीच कमी नाही झाला!
बाळासाहेब हिटलरच्या ज्यू विरोधाचे समर्थक नव्हते पण ते हिटलरच्या देशप्रेमाचे समर्थक होते ते बोलायचे भारताला सुधरवायला हितलरसारख्याचीच गरज आहे.
ते एकदा बोलले होते भारतीय सैन्याला माझ्याकडं द्या मी भारताला सरळ करतो. त्यांनी इंदिरा गांधींनि घोषित केलेल्या आणीबाणीचेही समर्थन केले होते त्या काळात आणीबानीचे समर्थन फक्त बाळासाहेबच करू शकत होते.
बाळासाहेब ठाकरे निबंध भाषण चरित्र माहिती मराठी
बाळासाहेबांना त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनात अनेक दुःखद प्रसंगांना सामोरे जावे लागले. त्यांच्या पत्नीच निधन झालं मोठा मुलगा अपघातात वारला आणि राजकीय जीवनात ज्यांनी शिवसेना वाढवली असे संजय निरूपण, छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक आणि स्वतःचा पुतण्या राज ठाकरे शिवसेना सोडून निघून गेले. हे बाळासाहेबांच्या जीवनातील मोठे धक्के होते. तरीही बाळासाहेब डगमगले नाहीत शिवसेना कोणा नेत्यावर नाही तर ती तळागाळातल्या शिवसैनिकांवर उभी आहे असं बाळासाहेबांनी सांगितलं शिवसैनिक अजूनच पेटून उठले शिवसेना स्थापन झाल्या नंतर मुंबई महानगरपालिकेवर जो शिवसेनेचा भगवा आहे तो आजतागायत तसाच आहे.
बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांवर मुलासारखे प्रेम केलं. आणि म्हणूनच शिवसैनिकांनी बाळासाहेबांना देव मानूण त्यांची मनापासून सेवा केली.
बाळासाहेबांनी तळागतल्या माणसाला राजकारणात आणलं भाजी विकणाऱ्या छगन भुजबळांना बाळासाहेबांनी महापौर केलं. त्यांनी वडापावची गाडी चालवणाऱ्या माणसाला शाखाप्रमुख केलं आणि यामुळेच शिवसेना घराघरात पोहचली लोकांना वाटू लागले अरे इथं तर आपली माणसे आहेत निम्म्या रात्रीला कोणाला गरज लागली तर प्रत्येक गोष्टीत शिवसैनिक पुढं होता. बाळासाहेबांनी समाजकारणातून राजकारण साधलं.
स्वतःच्या मित्रपक्ष असणाऱ्या भाजपालाही बाळासाहेबांनी अनेक गोष्टींवर विरोध केला प्रतिभाताई पाटलांच्या राष्ट्रपती पदाच्या वेळी माझ्या महाराष्ट्रतील एक मराठी स्त्री देशाच्या सर्वोच्य पदावर बसणार म्हणून त्यांनी मित्रपक्ष भाजपाच्या उमेदवाराला विरोध करून प्रतिभाताईंना पाठिंबा जाहीर केला.
बाळासाहेबांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे विरोधक हे शरद पवार मानले जातात पण अनेक मुद्यांवर बाळासाहेबांनी शरद पवारांना पाठिंबा दिलाय मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा मुद्दा असेल तरीही बाळासाहेबांनी पवारसाहेबांना पाठिंबाच दिलाय. आमच्यात मतभेद आणि मतभेद अजिबात नाहीत उलट काही असेलच तर तो पोटभेद आहे असं बाळासाहेब मिश्किल पणे सांगत असत.
बाळासाहेब बोलले होते या महाराष्ट्राच देशपातळीवर कोणी नेतृत्व करू शकेल तर ते शरद पवार आहे आणि ते पंतप्रधान झाले तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल. बाळासाहेबांचे विरोधकही बाळासाहेबांचा सन्मान करत असत. मुंबईचीच काय पण महाराष्ट्राची सत्ताकेंद्र कायम बाळासाहेबांकडेच राहिली.
बाळासाहेबांचा मृत्यू 17 नोव्हेम्बर 2012 रोजी झाला.
आपल्या जहाल भाषणांनी अखंड महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या ढाण्या वाघाचा आवाज कायमचा शांत झाला.आपल्या एका शब्दावर आर्थिक राजधानी मुंबई बंद पडणाऱ्या बाळासाहेबांनी एकही शब्द न काढता अखेर परत एकदा मुंबई थांबवलीच. 5 लाख लोक आपल्या देवाच अंतिम दर्शन घेण्यासाठी शिवाजीपार्कवर जमले होते “बाळासाहेब परत या” “बाळासाहेब अमर रहे” अश्या घोषणांनी मुंबई रडत होती. बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना 21 तोफांची सलामी दिली गेली. जी आजवर कोणत्याही शासकीय पद न भूषवलेल्या व्यक्तिला दिली गेली नव्हती. तो मान फक्त बाळासाहेंबाना मिळाला. साहेबांच्या प्रत्येक भाषणातून, लेखनातून ते किती समग्र होते याचे दर्शन घडते. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला लढाऊ आवाज देणारा लोकनेता बाळसाहेब ठाकरे. देशातील सर्वात आक्रमक अशी “शिवसेना” ही राजकीय संघटना स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे… मराठी माणसाला स्वतःच्या हक्कासाठी लढायला शिकवलं बाळासाहेबांनी!
“तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवू पण न्याय हा मिळालाच पाहिजे” असा हुंकार देणारे बाळासाहेब ठाकरे होते.
जय महाराष्ट्र!
अक्षय जाधव.
कडूस राजगुरूनगर.
मित्रांनो, Balasaheb Thakre Information Biography Jivani in Marathi language Balasaheb Thakre Essay speech Marathi language बाळासाहेब ठाकरे निबंध भाषण माहिती मराठी
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा.
या प्रकारची महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी कॉलेज कट्टा “college Catta” या आपल्या आवडत्या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या. College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply