आषाढी एकादशी का साजरी केली जाते ? दरवर्षी आषाढी एकादशी साजरी करतो उपवास धरतो. या एकादशीचे धार्मिक सांस्कृतिक महत्व जाणून घ्या. आपल्या आवडत्या College Catta वर. ‘College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ’ जिथे दैनंदिन दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सहज सोप्या भाषेत सादर केली जाते. Ashadhi Devshayani Ekadashi Information Mahiti in Marathi language.
Ashadhi Ekadashi Mahiti Marathi Madhe
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आणि “जय जय राम कृष्ण हरी” या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. टाळ मृदुंगाचा चहुबाजुला निनाद आणि हरिनामाचा जयघोष, अंगावर रोमांच उभे राहतील असं वातावरण पाहायला मिळतं. तो सुखद सोहळा असतो वारकर्यांच्या दिंडी सोहळ्याचा. महाराष्ट्रातला सर्वात मोठया प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो.
Ashadhi Ekadashi Katha Story Importance in Marathi Language
आषाढी एकादशी देवशयानी एकादशी बद्दल माहिती महत्व मारठी
कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून भगवान शंकराकडून ‘तुझा मृत्यू फक्त एका स्त्रीच्या हातून होऊ शकतो’ असा वर मिळवला. या प्रकारे त्याने अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री म्हणजे आवळी या वृक्षाच्या तळाला एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने म्हणजे एकादशीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवी आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.
अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून निघून वारकरी पंढरपूरला जातात ते आषाढ़ी एकदशीला म्हणजेच आषाढ शुध्द एकादशीला, सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात. या दोन महत्त्वाच्या पालख्यांबरोबरच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पालखीही सासवड येथून निघून पंढरपूरकडे रवाना होत असते. महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. भगवंत या एकादशीपासुन शयन करतात. आषाढी एकादशीपासुन चातुर्मास चालु होतो. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचे रुपाचे श्रवण कीर्तन करुन भक्त विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात.
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी‘ का म्हणतात ?
आषाढी एकादशी देवशयानी एकादशी बद्दल माहिती महत्व मारठी
मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी असे म्हणतात.
आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥
Ashadhi Devshayani Ekadashi Information Mahiti in Marathi language
या उक्तिप्रमाने जणू स्वतः परमात्मा भक्ताच्या एकदम जिव्हाळयाचा विषय जणू बनून जातो. आषाढी कार्तिकीला श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन २४ तास चालु असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. वाखरी मधील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. इथुन आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळुहळु पंढरीकडे निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात. एकादशीच्या दिवशी दुपारी एक वाजता सरदार खाजगीवाले यांच्या वाडयातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीमती राधाराणी यांची सजवलेल्या रथातुन प्रदक्षिणा मार्गाने मिरवणुक निघते. आषाढ शुद्ध पोर्णिमेला गोपालकाला होऊन यात्रेची सांगता होते. गोपाळपुर येथे सार्या दिंड्या आणि पालख्या एकत्र होतात. काल्याच्या कीर्तनानंतर सार्यांना गोपालकाला वाटला जातो.
वारकऱ्यांची वारी म्हणजे येरझार. पंढरपूरची वारी करायची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यायचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात.
आषाढी एकादशी उपवास
- भगवान ठेवील त्याप्रमाणे राहण, त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून उदर निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करण.
- तहानलेल्याची तहान जाणन, भुकेल्या जीवाला अन्न द्यायचे.
- कोणत्याही जीवाचा मत्सर करायचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे,
- गीता भागवताचे वाचन करायचे, आपल्या सर्व कार्याच्या केन्द्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करायचे आणि भागवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, अस
वारक-यांचे भक्तिमय जीवन असते.
अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला‘ दिंडी’ असे म्हणतात.
वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या, देवस्थानच्या दिंडया पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करुन पंढरपूरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनास येतात. वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. असे सांगीतले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन १६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा आजतागायत अविरत चालत आलेल्या आहेत.
Ashadhi Ekadashi Importance in Marathi Language
आषाढी एकादशीचे महत्त्व आषाढी एकादशी म्हणजे काय ?
देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. आसुरी शक्तींपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी साधना करणे आवश्यक असते. त्यामुळे हा एकादशीचा उपवास केला जातो.
पूजाविधी: या दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.
पंढरपूरची वारी : वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीचे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या एकादशीनिमित्त वारकर्यांकडून पंढरपूरची वारी केली जाते. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढपूरची वारी हादेखील एक साधनामार्गच आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही कर्मकांडातील साधना आहे. वारीचे वारकरी देहाची पर्वा न करता मैलो-मैल चालतात. असे केल्याने शारीरिक तप घडते, म्हणजेच हठयोग होतो. मुळात वारकरी संप्रदायाची साधना ही भक्तियोगानुसार केली जाणारी साधना आहे. वारीच्या वेळी केले जाणारे भजन-कीर्तन, नामस्मरण यात भक्तियोग व नामसंकीर्तनयोग यांचा सहज मिलाप झालेला दिसतो.
अशी ही आषाढी वारी प्रत्येक वारकऱ्याला हवीहवीशी वाटते. सावळ्या विठ्ठलाला भेटण्याची आस देखील ही यावेळी दाटून येते. युगे ना युगे हा विठू या वारकऱ्यांची आस बनून राहतो म्हणूनच बोललं जातं,
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा.
ही आषाढी एकादशी देवशयानी एकादशी Ashadhi Devshayani Ekadashi Information Mahiti in Marathi language. Ashadhi Ekadashi Katha Story Importance in Marathi Language माहिती तुम्हाला कशी वाटली हे खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा.
राम कृष्ण हरी.
-प्रियंका पुंड.
Ashadhi Ekadashi Mahiti Marathi Madhe आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढी एकादशी उपवास Ashadhi Ekadashi Essay Nibandh in Marathi Language आषाढी एकादशी निबंध मराठी
Leave a Reply