अहमदनगर शहराचा तारणहार कोण होणार?
अहमदनगर शहराचा तारणहार कोण होणार?
अहमदनगर शहराचा तारणहार कोण होणार? अहमदनगरचा सध्याचा परिस्थितीला जबाबदार कोण? राजकारणी की तेथील अन्याय सहन करणारी जनता? अहमदनगर शहराला ऐतिहासिक वारसा आहे सहकार क्षेत्र प्रबळ आहे पण या गुंडगिरीला जबाबदार कोण?
अहमदनगर हां ऐतिहासिक जिल्हा म्हणून पूर्वी ओळखला जायचा कारण तेव्हा शिवरायांनी घेतलेल्या कष्टाची पार्श्वभूमि तसेच अनेक समाजसुधारकांचे वाखानन्याजोगे कार्य या जिल्ह्याची एक ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळख करवून देत होते. पण सध्याची स्थिती जर पाहिली तर वाटत नाही की ऐतिहासिकता इथे उरली आहे. न्याय ,समता, बंधुता यांसारखी अनेक मूल्ये आपण पाठ्य पुस्तकात शिकलो आहे, फक्त शिकलोच, वापरन्याची अक्कल आमच्यात नहीं ना उरली.
इथेच जिजाऊ होत्या आणि आज इथेच चिमूरडीवर अत्याचारही होतात.
याच महाराष्ट्रात स्वराज्यसाठी जिवाला जिवाला जिव देणारे बाजीप्रभु लढले, आणि याच महाराष्ट्रात सत्तेसाठी कोयता आणि पिस्तुलने जिव घेतला जातो. उदाहारण म्हणजे केडगांवचा प्रकरण
याच नगर मध्ये प्रसिद्द शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला कचर्यामुळे आग लागतें, आणि तरी आपण थाटाने म्हणतो आम्ही महापालिका हद्दीत राहतो, अहो यांनीच तर हद्द पार केलि आहे, इथे फक्त सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी थोड्या फार सुविधा करन हां मोठा धंदा चालतो. माध्यम प्रतिनिधि जेव्हा इथल्या महापौरांना प्रश्न विचारतो की आग का लागली तर उत्तर नसते त्यांच्याकडे द्यायला. एक 50 शी ओलंडलेला कलाकार जेव्हा आपल कलाजगत डोळ्यासमोर जळताना पाहतो तेव्हा तो आतून किती जळतो. याचा काही हिशोब.
याच नगर जिल्ह्यात प्रेमप्रकरणातुन नितिन आगे सारख्या तरुणांची हत्या होते. आणि दोषी मोकाट फिरतात. मग प्रेम ही गुन्हाच की इथ. मुर्दाड जगात मुर्देच पडणार ना ओ. केडगाव हत्याकांडात झाली ना 2 ते 3 वर्षाची मूल पोरकी,, बीनबापांच आयुष्य जगुन बघा म्हणावा मारणाऱ्यानो.
याच नगर मधल्या कोपर्डी गावात मुलीवर अत्याचार करून तिला मारल जात. हाच का आपला यापुढचा इतिहास? आता तर मुलांच्या अभ्यासक्रमात ही पक्ष राजकारण आले आहे. म्हणजे जो सत्तेय त्यांचच शिक्षण मुलांनी घ्यायच? अवघड आहे तरुणाईच भविष्य.
याच नगर जिल्ह्यात श्रीपाद सारखा माणूस शिवरायांना अपशब्द घालतो, असे खुप दाखले नगरच्या सध्याच्या स्थितीचे देता येतील.
या सध्य परिस्थितीला जबाबदार कोण? राजकारणी? काहीही झालं की सरकारचा माथ्यावर घालणारी लोकं भरपूर आहेत पण अशा लोकप्रतिनिधींना निवडून कोण देतं जनताच ना मग तुम्ही का निवडून देता या लोकानां? मतदानाचा वेळेस सगळेच उमेदवार धुतल्या तांदळासारखे होतात? आणि एकही उमेदवार चांगला नसेल तर मतदार का नोटा, वरीलपैकी कोणीही नाहीचा पर्याय निवडत नाहीत. मग नगरचा सध्य परस्थितीला जबाबदार कोण फक्त राजकारणी? छे छे नगरचे लोक देखील तितकेच जबाबदार आहेत, किंबहुना नगरचा मतदाराला हेच उमेदवार आवडतात म्हणून ते यांना वर्षानुवर्ष सत्ता देत आहेत मग या सत्तेचा वापर कसा करायचा हे याना ठाऊक आहे. नगरचा तारणहार कोण होणार? इथली गुंडशाही कोण संपवणार आणि आता ठरवा काय म्हंनण योग्य वाटेल नगरला…
राजकारण्यांच दहशतवादी नगर की आपलं नगर.
-प्रियांका पुंड.
अहमदनगर शहराचा तारणहार कोण होणार?
Leave a Reply