” वजन ” कमी करायचेयना !! मग पुढील पोस्ट तुम्हाला मन
लाऊन पहाव्याच लागतील ..📚
ज्यावेळी आपण पोटभर जेवतो,त्यावेळी खाल्लेले अन्न पचन करण्यासाठी सुद्धा आपल्याला उर्जा खर्च करावी लागते..खाल्लेल्या चपात्या,भात पचविण्यासाठी शरीरातील सैन्य (पेशी) जीव खाऊन पळापळ करीत असते .राजाला (मेंदुला) पोटाकडे इतके सैन्य पाठवावे लागते कि,इतर लढायांसाठी राजाकडे अंगरक्षकसुद्धा शिल्लक रहात नाहीत..मग अशावेळी आपल्याला अवेळी झोप ,आळस , पित्त होणे,कामात रुची न वाटणे असे प्रकार सुरू होतात.. म्हणजेच बौद्धिक कामासाठी तुमच्याकडे काहीच सैन्य (पेशी )शिल्लक रहात नाहीत …म्हणुन मित्रांनो ,चुलीमध्ये (पोटामध्ये ) एवढेच सरपण भरा कि,जाळ व्यवस्थित लागेल , जास्त जाळ लागण्यासाठी उगीच “रेटून” सरपण घालू नका..नाहीतर “धुर” (गॕसेस) निघाल्याशिवाय राहणार नाही.
“जे लोक ओव्हरवेट आहेत व ज्यांना आपले वजन नियंत्रित ठेवायचे आहे अशा लोकांनी विशेष लक्षात ठेवा”……वजन वाढविण्याचे इमानेईतबारे काम फक्त चपात्या ,भात आणि अर्थातच सर्व पिष्टमय पदार्थ करीत असतात …तुम्ही मनाशी चंग बांधा…ठरवा कि, मी आजपासून चपात्या ,भात,भाकरी कमीतकमी किंवा अजिबात खाणार नाही…पहा दोनेक महिन्यात कसा फरक पडतोय…तुम्ही म्हणाल कि,हे कसे शक्य आहे..मला तर रात्री भाकरी खाल्ल्याशिवाय झोपच येत नाही ;पण तुम्ही स्वतःच्या शरीराला अशा सवयी लाऊन घेऊ शकता..👉🏻👉🏻(ज्यांचे वजन प्रमाणात आहे ; त्यांनी पिष्टमय पदार्थ खायला हरकत नाही ..🍪)
वजन एक दिवसात वाढलेले नसते ;मग एका दिवसांत कमी पण नाही होणार .श्रद्धा ठेवा..निसर्गाने एवढे सुंदर शरीर दिले आहे त्याला आपण बेडौल का करावे ?
पिष्टमय पदार्थ बंद करायचेत…..मग काय खायचे …??? ……….सोप्पे आहे ,आपण नेहमी जेवायला बसतो तिथे काचेच्या बरण्यामध्ये खजुर ,अंकुरित धान्य ,राजगीरा लाडु ,सिझनेबल फळे ,रात्रभर भिजलेले शेंगदाणे , फुटाणे , सॕलड ,सुकामेवा ,ताक आणि सर्वात महत्त्वाचे गरम पाणी (पुढे एक फोटो देत आहे.) असे पदार्थ खाऊ शकता.लक्षात ठेवा जेवढे वजन जास्त ;तेवढे प्रॉब्लेम्स जास्त ..
हा उपाय काहींना असुरक्षित वाटत असेल ;पण आहारशास्रानुसार सुसंगत भोजन करणे फार गरजेचे आहे .फार तर दुपारचे एक वेळचे जेवण चपाती -भाकरीचे घेऊ शकता.🥒🍅🥗🥜
चला ,नववर्षाच्या यादीत आपण सारे संकल्प करुया, “नियंत्रित” वजनाचा..पुढे दिलेली माहितीपुर्ण चलचित्रफित अवश्य पहा… संतोष सरसमकर ,जामखेड .
Leave a Reply