पद्मावती फिल्म का विरोध पद्मावती फिल्म विवाद कशामुळे पद्मावती चित्रपट वाद ज्या पद्मावती या चित्रपटावरून देशात रणकंदन माजलं, थेटर फोडले, गाड्यांची जाळपोळ केली, लहान विद्यार्थ्यांच्या बसेसची सोडल्या नाहीत त्या पद्मावत चित्रपटात नेमकं आहे तरी काय? वाचा टिव्ही नाईन मराठी चे प्रतिनीधी प्रमोद जगताप यांच समिक्षण…
कथा राणी पद्मावतीसाठी ‘येडा’ झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीची…
कथा राणी पद्मावतीची, कथा राजा रतन सिंगाची तसचं कथा राणी पद्मावतीसाठी ‘येडा’ झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीची… आपल्या पत्निसाठी हिरे आनण्यासाठी सिंगल ला गेलेले मेवाडचे राजे रतन सिंगांची अचानकपणे भेट होते ती सिंगलची राजकुमारी पद्मावतीशी… दोघांचं प्रेम होतं आणि मग राजकुमारी पद्मावतीची राणी पद्मावती होते आणि ती चित्तोडगडावर येते… दोघ एकांतात असताना त्यांच्या दरबारातील गुरू राघव चेतन त्यांना चोरून पहातो आणि राघव चेतन ला रतन सिंग दरबारातुन हाकलून देतात… या अपमानाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या हेतून राघव दिल्लीचा बादशहा अल्लाउद्दीन खिलजी कड जातो आणि राणी पद्मावतीच्या सौंदर्याबद्दल खिलजीला सांगतो आणि येथूनच सुरूवात होते ख-या चित्रपटाला…
राणीला पहाण्यासाठी खिलजी एकटा गडावर जातो त्यासाठी रतन सिंगांनी दिलेल्या सगळ्या अटी बिनशर्त मंजुर करतो… पद्मावतीच दर्शनही होत पण काही सेकंद आणि तेंव्हापासूनच पद्मावती साठी खिलजी अक्षरशः यडा होतो… रतन सिंगांना भेटीचं आमंत्रण देऊन फसवनुक करून खिलजी कैद करून दिल्लीला घेऊन जातो आणि कैद करून ठेवतो… रतनसिंगांना कैदेतुन सुडवण्यासाठी एकच अट आणि ती म्हणजे पद्मावतीन दिल्लीला येण… पतीला सोडविण्यासाठी राणीही दिल्लीला जायला तयार होते… पण काही अटी घालून… अर्थातच त्या सगळ्या अटी खिलजी बिनशर्त मंजुर करतो आणि तिथंच पहीला काट्यान काटा निघतो तो राघव चेतनचा… अटी मंजुर असल्याचं पत्र आणि राघव चेतनच मुंडकं एकत्रच चित्तोड गडावर येत… पद्मावती येते, रतनसिंगांना भेटते त्यासाठी त्यांना खिलजीची बेगमच मदत करते… रतनसिंग खिलजीला एकटे भेटतात आणि तिथून गडावर येतात…
पद्मावतीला न भेटल्यामुळ अल्लाउद्दीनच पित्त खवळत आणि तो पुन्हा चाल करुन गडावर जातो अर्थात पद्मावतीसाठीच… पुढं रतनसिंग आणि खिलजीच युद्ध होत… रतनसिंग मारले जातात तेही युध्दाचे सर्व नियम धाब्यावर बसवूनच… अल्लाउद्दीनच्या डोळ्यासमोर राणी पद्ममावती आणि इतर स्त्रिया जोहर करतात… अंगावर काटा आणणारी ही दृष्य पहाण्यासाठी नक्की पहावा असा पद्मावत… (नाव बदललं म्हणून काही फरक पडत नाही)…
संजय लिला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला, सोबत संगीत दिलेला हा सिनेमा… सिनेमाची खासियत काय असेल तर तो चित्रपटासाठी तयार केलेला सेट… आणि तो चित्रीत करण्याची वापरलेला कॅमेरा… सुंदर… अतीशय सुंदर… तसाच साजेसा असा कॉश्युम…
खिलीजीची भुमीका साकारणारा रणवीर सिंग असो, रतनसिंगांची भुमीका साकारणारा शाहिद कपूर असो की राणी पद्मावतीची भुमिका साकारणारी दिपीका पदुकोण असो… आपापल्या भुमिकांना सगळ्यांनीच योग्य न्याय दिलाय… तरीही अल्लाउद्दीनच पात्र मात्र प्रेक्षकाच्या मनात घर करून बसतोय…
चित्रपटासाठी भन्साळींनी स्वता: संगीत दिलंय ती एक चित्रपटाची जमेची बाजू आहे… अर्थात त्यातही भन्साळी स्टाईल आहेच म्हना… बाजीराव मस्तानी मधलं ‘दिवानी मस्तानी’ आणि पद्मावतीमधल ‘घुमर’ गाणं सारखंच… बाजीराव मस्तानी मधलं ‘मल्हारी’ आणि पद्मावतीमधल ‘खली बली हो गया है दिल’ सारखंच… फरक फक्त एवढाचय की मल्हारी हिरो साठी होत तर ‘खली बली’ विलनसाठी… बाकी चित्रपटातील डायलॉगला मात्र तोड नाही…
एकंदरीतच सर्वच आंगाण चांगला असणारा, तीन तास थेटरमधे बसवून ठेवणारा आणि महत्त्वाचं म्हणजे पैसा वसूल करणारा पद्मावत एकदा नक्कीच पहायला हवा… रानी पद्मावती की कहानी. पद्मावती फिल्म का विरोध
प्रमोद जगताप,
पत्रकार, टिव्ही नाईन मराठी…
9503959446
Leave a Reply