आठ ओवरची रोमांचक मँच भारताने ६ धावांनी जिंकली
पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरु झालेली तिसरी टी- ट्वेंटी मँच भारताने जिंकली. भारताने टाँस
हरल्यानंतर नुझीलंडने गोलंदाजी निवडून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारतीय
क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील आगोदर गोलंदाजी करण्यास पसंती दाखवली होती.
परंतु टाँस हरल्यानंतर भारत फलंदाजीची सुरवातीला रोहित शर्मा ८ रण व शिखर धवन आउट झले.
भारताने आठ ओवर मध्ये ६७ धावा केल्या. कमी षटकाच्या तुलनेत धावा कमी वाटत होत्या पण
भारतीय गोलंदाजानी नुझीलंडच्या फलंदाजीला सुरुंग लावत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
भारताच्या विजयाचा शिल्पकार जसप्रीत बुमराहने २ षटकात नऊ धावा देऊन २ विकेट मिळवल्या.
अप्रतिम कामगिरीच्या जोरावर जसप्रीत बुमराह मँन आँफ मँच तसेच मँन आँफ सिरीजचा मान
मिळवला. चहल, हार्दिक पंड्याने व भुवनेश्वर कुमारने देखील अप्रतिम गोलंदाजी करत नुझीलंडला
कोंडीत पकडलं. उत्तम क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम झेल हे या मँचचे वैशिष्ट्य.
ही रोमांचक मँच भारताने ६ धावांनी जिंकली. भारताने टी- ट्वेंटी सिरीज २-१ ने जिंकली.
Leave a Reply